शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; ...

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; मात्र त्यापैकी फक्त चार ते पाच तलाव शिल्लक आहेत. त्यातही मिस्किन टॅंक तलावाला अतिक्रमणधारकांनी वेढा घातला आहे; तर आता शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलावालाही ‘दृष्ट’ नजर लागली आहे. हे तलाव पूर्णतः गिळंकृत करण्याचा सपाटा काहींनी लावल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील अन्य तलवांप्रमाणे आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भंडारा शहरात सागर तलाव, नवतलाव, जोगी तलाव, खांबतलाव, मिस्किन टॅंक तलाव यासह अन्य सखल भागात लहान तलाव व डबके अस्तित्वात होते. कालानुरूप वस्ती वाढत गेल्याने या तलावांची जागा मोठमोठ्या वस्त्या व इमारतींनी घेतली. त्याला बुजवून वस्ती व आलिशान कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम जोरात सुरू झाले. पाहता-पाहता भंडारा शहरातील डझनभर तलावांची संख्या चार ते पाचवर आली आहे. आता तर चक्क तलाव बुजवून त्यावर प्लॉटस् उभारण्याचा मनसुबा काहीजणांचा असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम तलाव रिकामा करून त्यावर सूर्यफूल उगवण्याचे धाडस करण्यात आले. यानंतर तो तलाव नसून, शेतजमिनीची जागा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तर हा तलाव पूर्णतः अतिक्रमित करून त्यावर प्लॉटस् आखण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र नागरिकांच्या नजरेआड हा सगळा गोरखधंदा सुरू आहे. काही जागरूक नागरिकांनी यावर आवाज बुलंद केला असता, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. कधी दमदाटी, तर कधी बळाचा वापरही करण्यात येत असतो. मात्र जमीन तस्करांनी आता तलावांना पुन्हा एकदा टारगेट केले आहे, हीच खरी या शहराची शोकांतिका म्हणावी लागेल.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष घालणार काय?

शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलाव हा २७ एकर जागेत आहे. नियमाप्रमाणे तलावातील पाणी काढता येत नाही. अतिक्रमण करणे ही बाब तर कायद्याने गुन्हा आहे. मात्र पाणी क्षेत्र रिकामे करून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. माती टाकून हळूहळू नवतलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतील, तर या तलावाला नवसंजीवनी मिळू शकेल. अन्यथा हा तलावसुद्धा काळानुरूप नाहीसा होईल, यात शंका नाही