शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:26 IST

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; ...

भंडारा : एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या जिल्ह्यात तलावांची अधोगती होतेय. एकट्या भंडारा शहरात डझनभर तलाव अस्तित्वात होते; मात्र त्यापैकी फक्त चार ते पाच तलाव शिल्लक आहेत. त्यातही मिस्किन टॅंक तलावाला अतिक्रमणधारकांनी वेढा घातला आहे; तर आता शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलावालाही ‘दृष्ट’ नजर लागली आहे. हे तलाव पूर्णतः गिळंकृत करण्याचा सपाटा काहींनी लावल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे शहरातील अन्य तलवांप्रमाणे आली रे आली, आता नवतलावाची पाळी आली, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भंडारा शहरात सागर तलाव, नवतलाव, जोगी तलाव, खांबतलाव, मिस्किन टॅंक तलाव यासह अन्य सखल भागात लहान तलाव व डबके अस्तित्वात होते. कालानुरूप वस्ती वाढत गेल्याने या तलावांची जागा मोठमोठ्या वस्त्या व इमारतींनी घेतली. त्याला बुजवून वस्ती व आलिशान कॉम्प्लेक्स उभारण्याचे काम जोरात सुरू झाले. पाहता-पाहता भंडारा शहरातील डझनभर तलावांची संख्या चार ते पाचवर आली आहे. आता तर चक्क तलाव बुजवून त्यावर प्लॉटस् उभारण्याचा मनसुबा काहीजणांचा असल्याचे दिसून येते. सर्वप्रथम तलाव रिकामा करून त्यावर सूर्यफूल उगवण्याचे धाडस करण्यात आले. यानंतर तो तलाव नसून, शेतजमिनीची जागा असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तर हा तलाव पूर्णतः अतिक्रमित करून त्यावर प्लॉटस् आखण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. मात्र नागरिकांच्या नजरेआड हा सगळा गोरखधंदा सुरू आहे. काही जागरूक नागरिकांनी यावर आवाज बुलंद केला असता, त्यांनाही दाबण्याचे प्रयत्न करण्यात आले. कधी दमदाटी, तर कधी बळाचा वापरही करण्यात येत असतो. मात्र जमीन तस्करांनी आता तलावांना पुन्हा एकदा टारगेट केले आहे, हीच खरी या शहराची शोकांतिका म्हणावी लागेल.

बॉक्स

जिल्हाधिकारी लक्ष घालणार काय?

शास्त्रीनगर परिसराला लागून असलेल्या नवतलाव हा २७ एकर जागेत आहे. नियमाप्रमाणे तलावातील पाणी काढता येत नाही. अतिक्रमण करणे ही बाब तर कायद्याने गुन्हा आहे. मात्र पाणी क्षेत्र रिकामे करून त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. माती टाकून हळूहळू नवतलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले. आता याप्रकरणी जिल्हाधिकारी याकडे लक्ष घालतील, तर या तलावाला नवसंजीवनी मिळू शकेल. अन्यथा हा तलावसुद्धा काळानुरूप नाहीसा होईल, यात शंका नाही