शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘तो’ शासन निर्णय ठरला एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

राज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला.

जीआर रद्द करण्याची मागणी : अनेक कर्मचाऱ्यांवर ओढवले उपासमारीचे संकट सिराज शेख मोहाडीराज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील जाचक अटीमुळे एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ होण्याची पाळी अनेकावर आली. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ३ डिसेंबर २००५ च्या शासन निर्णयानुसार मार्ग तपासणीमध्ये गैरवर्तणुकीचे अपराध करताना वाहकास पकडल्यास सदर वाहक पहिल्यांदा पकडला गेल्यास त्याला निलंबित अथवा बडतर्फ न करता त्याच्या कबुलीजवाबाप्रमाणे जितक्या किमतीच्या तिकीटाचा अपहार झाला असेल. त्याच्या ५० पट किंवा किमान पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई वसुल करावी. दुसऱ्या वेळेस याच अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास त्या रकमेच्या ७५ पट किंवा किमान १० हजार इतकी नुकसान भरपाई वसुल करावी, असे महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन हे परिपत्रक काढले होते. यामागील उद्देश असा की महामंडळातील कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रलंबित अपराध प्रकरणांची भरमसाठ संख्या, त्यामुळे एकूण चलनीय कामगिरीवर होणारा परिणाम, न्यायालयीन प्रकरणात होणारा वाद, त्यावरील खर्च तसेच कामाविना न्यायालयीन निकालानुसार मागील वेतनासह करावी लागणारी पुर्नस्थापना आदी बाबी लक्षात घेऊन वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईत बदल करणारे परिपत्रक काढण्यात आले होते ते दोन वर्षापर्यंत लागु होते. मात्र १६ जानेवारी २००७ च्या नविन शासन निर्णयाप्रमाणे मागील सर्व शासन निर्णय रद्द करुन पुन्हा जुनीच प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे.१६ जानेवारी २००७ रोजी काढण्यात आलेला तो शासन निर्णय वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा आहे. अनेकदा प्रवासी गर्दीमध्ये तिकीट काढण्यास चुकतात व तपासणी आल्यावर वाहकाला बडतर्फ करण्यात येते. ही पध्दत या विभागात चुकीची असून अन्य विभागाप्रमाणे त्यांनाही सवलत देण्यात यावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे. २००७ चा शासन निर्णय रद्द केल्यास अनेक परिवारातील सदस्यांना आधार मिळेल. त्यांचे हलाखीचे जीवनमान बदलु शकण्यासाठी मदत होईल, यासाठी लोकप्रतिनिधींच आता पुढाकार घेण्याची गरज आहे.