शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

‘तो’ शासन निर्णय ठरला एसटी कर्मचाऱ्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: November 23, 2015 00:31 IST

राज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला.

जीआर रद्द करण्याची मागणी : अनेक कर्मचाऱ्यांवर ओढवले उपासमारीचे संकट सिराज शेख मोहाडीराज्य परिवहन महामंडळातर्फे वर्ष २००५ मध्ये कर्मचारी हिताचा काढण्यात आलेला शासन निर्णय २००७ मध्ये रद्द करण्यात आला. त्यानंतर काढण्यात आलेल्या शासन निर्णयातील जाचक अटीमुळे एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ होण्याची पाळी अनेकावर आली. परिणामी अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ३ डिसेंबर २००५ च्या शासन निर्णयानुसार मार्ग तपासणीमध्ये गैरवर्तणुकीचे अपराध करताना वाहकास पकडल्यास सदर वाहक पहिल्यांदा पकडला गेल्यास त्याला निलंबित अथवा बडतर्फ न करता त्याच्या कबुलीजवाबाप्रमाणे जितक्या किमतीच्या तिकीटाचा अपहार झाला असेल. त्याच्या ५० पट किंवा किमान पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई वसुल करावी. दुसऱ्या वेळेस याच अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास त्या रकमेच्या ७५ पट किंवा किमान १० हजार इतकी नुकसान भरपाई वसुल करावी, असे महामंडळाच्या संचालक मंडळाने ठराव करुन हे परिपत्रक काढले होते. यामागील उद्देश असा की महामंडळातील कर्मचाऱ्यांची कमतरता, प्रलंबित अपराध प्रकरणांची भरमसाठ संख्या, त्यामुळे एकूण चलनीय कामगिरीवर होणारा परिणाम, न्यायालयीन प्रकरणात होणारा वाद, त्यावरील खर्च तसेच कामाविना न्यायालयीन निकालानुसार मागील वेतनासह करावी लागणारी पुर्नस्थापना आदी बाबी लक्षात घेऊन वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईत बदल करणारे परिपत्रक काढण्यात आले होते ते दोन वर्षापर्यंत लागु होते. मात्र १६ जानेवारी २००७ च्या नविन शासन निर्णयाप्रमाणे मागील सर्व शासन निर्णय रद्द करुन पुन्हा जुनीच प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे.१६ जानेवारी २००७ रोजी काढण्यात आलेला तो शासन निर्णय वाहक व मार्ग तपासणी कर्मचाऱ्यांच्या मुळावर घाव घालणारा आहे. अनेकदा प्रवासी गर्दीमध्ये तिकीट काढण्यास चुकतात व तपासणी आल्यावर वाहकाला बडतर्फ करण्यात येते. ही पध्दत या विभागात चुकीची असून अन्य विभागाप्रमाणे त्यांनाही सवलत देण्यात यावी, अशी मागणी वाहकांकडून होत आहे. २००७ चा शासन निर्णय रद्द केल्यास अनेक परिवारातील सदस्यांना आधार मिळेल. त्यांचे हलाखीचे जीवनमान बदलु शकण्यासाठी मदत होईल, यासाठी लोकप्रतिनिधींच आता पुढाकार घेण्याची गरज आहे.