शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात गेली ४० मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात का हाेईना बाेलायला लागले. ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. या कक्षात डाॅक्टर आणि कर्मचारी उपस्थित असते तर ती निरागस चिमुकले आज आपल्या आईच्या कुशीत बागडत असती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. दहा बालकांचा बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. नेमकी घटना कशी घडली यावर कुणी बाेलायलाच सुरुवातीला तयार नव्हते. आता १३ दिवसांनंतर रुग्णालयातील स्थिती सामान्य हाेत असून या विषयावर चकार शब्द न बाेलणारे आता दबक्या आवाजात बाेलू लागले आहेत. ही घटना घडली तेव्हा कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. आग लागल्याचे कुणालातरी सर्वप्रथम माहीत झाले आणि त्यानंतर एकच गाेंधळ उडाला. हा गाेंधळ तब्बल चाळीस मिनिटे सुरू हाेता. कुणाला कळत नव्हते, दार ठाेठावणे आणि धावपळ एवढेच सुरू हाेते. घटनास्थळी हाहाकार उडाला हाेता. कर्तव्यावर असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असते तर कदाचित ही घटना टाळताही आली असती, असे आता बाेलले जात आहे. खुद्द जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही त्या रात्रीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. नेमके काेण दाेषी यावरून चर्चा हाेत आहे. या ठिकाणी नियुक्त डाॅक्टर आण परिचारिका उपस्थित असत्या तर ही घटना टाळता आली असती, असे अनेकजण सांगत आहेत.

बाॅक्स

खाली-वर जाण्यात गेला वेळ

आंतरुग्ण इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयू कक्षासमाेर एसएनसीयू कक्ष आहे. यामध्ये दाखल नवजात बालकांना दूध देण्याची वेळ ठरवून दिली असते. नेमके त्याचवेळी बाळाला दूध द्यावे लागते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माता आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी गेल्या हाेत्या. हे त्यांचे शेवटचे स्तनपान ठरले. बाळांना दूध दिल्यानंतर सर्व माता प्रसूतीपश्चात वाॅर्डात झाेपी गेल्या हाेत्या. त्यानंतर आरडाओरडा आणि धूर पाहून या कक्षाकडे धाव धेतली. मातांसाेबत असलेले नातेवाईक तळमजल्यावरच हाेते. त्यांना वर येण्यास वेळ झाला. काहींनी त्यांना अडविल्याने बालकापर्यंत पाेहाेचता आले नाही. प्रचंड आरडाओरड हो असल्याने काय हाेत आहे हे कळायच्या आत या दहा बालकांनी जगाचा कायमचा निराेप घेतला.