शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात गेली ४० मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:32 IST

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात ...

भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात का हाेईना बाेलायला लागले. ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. या कक्षात डाॅक्टर आणि कर्मचारी उपस्थित असते तर ती निरागस चिमुकले आज आपल्या आईच्या कुशीत बागडत असती.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. दहा बालकांचा बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. नेमकी घटना कशी घडली यावर कुणी बाेलायलाच सुरुवातीला तयार नव्हते. आता १३ दिवसांनंतर रुग्णालयातील स्थिती सामान्य हाेत असून या विषयावर चकार शब्द न बाेलणारे आता दबक्या आवाजात बाेलू लागले आहेत. ही घटना घडली तेव्हा कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. आग लागल्याचे कुणालातरी सर्वप्रथम माहीत झाले आणि त्यानंतर एकच गाेंधळ उडाला. हा गाेंधळ तब्बल चाळीस मिनिटे सुरू हाेता. कुणाला कळत नव्हते, दार ठाेठावणे आणि धावपळ एवढेच सुरू हाेते. घटनास्थळी हाहाकार उडाला हाेता. कर्तव्यावर असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असते तर कदाचित ही घटना टाळताही आली असती, असे आता बाेलले जात आहे. खुद्द जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही त्या रात्रीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. नेमके काेण दाेषी यावरून चर्चा हाेत आहे. या ठिकाणी नियुक्त डाॅक्टर आण परिचारिका उपस्थित असत्या तर ही घटना टाळता आली असती, असे अनेकजण सांगत आहेत.

बाॅक्स

खाली-वर जाण्यात गेला वेळ

आंतरुग्ण इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयू कक्षासमाेर एसएनसीयू कक्ष आहे. यामध्ये दाखल नवजात बालकांना दूध देण्याची वेळ ठरवून दिली असते. नेमके त्याचवेळी बाळाला दूध द्यावे लागते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माता आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी गेल्या हाेत्या. हे त्यांचे शेवटचे स्तनपान ठरले. बाळांना दूध दिल्यानंतर सर्व माता प्रसूतीपश्चात वाॅर्डात झाेपी गेल्या हाेत्या. त्यानंतर आरडाओरडा आणि धूर पाहून या कक्षाकडे धाव धेतली. मातांसाेबत असलेले नातेवाईक तळमजल्यावरच हाेते. त्यांना वर येण्यास वेळ झाला. काहींनी त्यांना अडविल्याने बालकापर्यंत पाेहाेचता आले नाही. प्रचंड आरडाओरड हो असल्याने काय हाेत आहे हे कळायच्या आत या दहा बालकांनी जगाचा कायमचा निराेप घेतला.