शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

१२०० हेक्टरवर होणार सिंचन

By admin | Updated: January 20, 2015 00:00 IST

सांसद आदर्श दत्तक ग्राम बघेडा येथील कोरडा बघेडा जलाशय तथा कारली लघु प्रकल्प भरण्याचे निर्देश राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी दिले. खासदार नाना पटोले यांनी जलसंधारणमंत्र्यांना

तुमसर : सांसद आदर्श दत्तक ग्राम बघेडा येथील कोरडा बघेडा जलाशय तथा कारली लघु प्रकल्प भरण्याचे निर्देश राज्याच्या जलसंधारण मंत्र्यांनी दिले. खासदार नाना पटोले यांनी जलसंधारणमंत्र्यांना तशी सूचना केली होती. बघेडा जलाशय तुडूंब भरला असून सांसद दत्तक ग्रामची येथे प्रचिती येत आहे. या तलावावर विदेशी स्थलांतरीत पक्ष्यांचा संचार वाढला असून उन्हाळी नियोजित सिंचन २५० हेक्टर व नियोजित १२०० हेक्टर सिंचन पुर्ण होईल.सांसद दत्तक ग्राम करीता खासदार नाना पटोले यांनी तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा या नावाची निवड केली होती. या गावात ब्रिटीशकालीन बघेडा जलाशय आहे. या तलावाची सिंचन क्षमता १४९८ हेक्टर झाली आहे. नैसर्गिक पावसाने हा तलाव यावर्षी कमी भरला. लघु पाटबंधारे विभागाने सिंचनाकरिता शेतकऱ्यांना पाणी दिले होते. त्यामुळे या तलावात केवळ १७ टक्केच पाणी शिल्लक होते. उन्हाळी धानाकरिता पाणीच शिल्लक नव्हते. २० दिवसांपूर्वी बघेडा येथे खासदार नाना पटोले तथा सर्वच विभागातील विभागप्रमुखांची बैठक बोलाविली होती. तेव्हा ग्रामस्थांनी बघेडा जलाशयात बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. बावनथडी प्रकल्पात केवळ ४३ टक्के सध्या जलसाठा आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच प्रकल्पातून पाणी सोडण्याचा अधिकार आम्हाला नाही तो केवळ शासन स्तरावर निर्णय घेतला जातो अशी माहिती दिली. प्रक्ल्पातील ४३ टक्क्यापैकी केवळ २१ टक्के पाणीच महाराष्ट्राचे आहे. उर्वरित पाण्यावर मध्यप्रदेशाचा हक्क आहे.खासदार पटोले यांनी राज्याचे जलसंधान मंत्री गिरीश महाजन यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून बावनथडी प्रकल्पाचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याची सूचना दिली. ना. गिरीश महाजन यांनी गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंताशी वैयक्तिक चर्चा केली. पत्रानुसार तसे निर्देशही दिले. बावनथडी प्रकल्पातून गुरुवारपासून पाणी सोडण्यात आले. रविवार सकाळपर्यंत बघेडा जलाशयात ४ दलघमी पाणी जमा झाले आहे. हा तलाव यामुळे तुडूंब भरला आहे. कारली जलाशयात येत्या चार दिवसात १.५० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. कारली जलाशयापर्यंत वितरीका तथा तांत्रिक अडचणी सध्या दूर करणे सुरु आहे.बघेडा जलाशयाची सिंचन क्षमता १४८९ व कारली जलाशयाची सिंचन क्षमता २६० हेक्टर आहे. आंबागड तलावातही पाणी सोडण्याचे निर्देश खासदार पटोले यांनी दिले आहेत. या तलावाची सिंचन क्षमता २१० हेक्टर आहे. पाणी सोडण्याची परवानगी केवळ याच वर्षाकरिता आहे. असे पत्रात नमूद आहे. (तालुका प्रतिनिधी)