शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:41 IST

पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने सिंचनासाठी उपयुक्त जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.मध्यप्रदेशातील चौराई येथे सिंचन प्रकल्पाच्या बांधकामामुळे यावर्षी तोतलाडोह व पेंच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पातून नागपूर शहर, नगरपालिका यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सिंचनासाठी सुद्धा पाणी देण्यात येते. परंतु यावर्षी केवळ तोतलाडोह प्रकल्पात अत्यल्प टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.उपलब्ध जलसाठ्यामधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाण्याची उपलब्धता, पाणी मागणी लाभक्षेत्रातील पिकांची नाजूक अवस्था तसेच भात लावणीसाठी लागणारे अत्यावश्यक पाणी या बाबींचा विचार करता शेतीचे व पयार्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.पेंच प्रकल्पामध्ये सध्यास्थितीत पाणीसाठा कमी असलातरी पावसाळा कालावधीचे अद्याप ४० दिवस शिलल्क आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच वितरण आणि गळती थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडे