शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:41 IST

पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने सिंचनासाठी उपयुक्त जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.मध्यप्रदेशातील चौराई येथे सिंचन प्रकल्पाच्या बांधकामामुळे यावर्षी तोतलाडोह व पेंच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पातून नागपूर शहर, नगरपालिका यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सिंचनासाठी सुद्धा पाणी देण्यात येते. परंतु यावर्षी केवळ तोतलाडोह प्रकल्पात अत्यल्प टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.उपलब्ध जलसाठ्यामधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाण्याची उपलब्धता, पाणी मागणी लाभक्षेत्रातील पिकांची नाजूक अवस्था तसेच भात लावणीसाठी लागणारे अत्यावश्यक पाणी या बाबींचा विचार करता शेतीचे व पयार्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.पेंच प्रकल्पामध्ये सध्यास्थितीत पाणीसाठा कमी असलातरी पावसाळा कालावधीचे अद्याप ४० दिवस शिलल्क आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच वितरण आणि गळती थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडे