शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:41 IST

पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.अपुरा पाऊस व पावसाच्या खंडामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाने सिंचनासाठी उपयुक्त जलसाठ्यातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी जाहीर केले.मध्यप्रदेशातील चौराई येथे सिंचन प्रकल्पाच्या बांधकामामुळे यावर्षी तोतलाडोह व पेंच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पातून नागपूर शहर, नगरपालिका यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असून सिंचनासाठी सुद्धा पाणी देण्यात येते. परंतु यावर्षी केवळ तोतलाडोह प्रकल्पात अत्यल्प टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.उपलब्ध जलसाठ्यामधून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार १०० दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे झालेल्या बैठकीत पाण्याची उपलब्धता, पाणी मागणी लाभक्षेत्रातील पिकांची नाजूक अवस्था तसेच भात लावणीसाठी लागणारे अत्यावश्यक पाणी या बाबींचा विचार करता शेतीचे व पयार्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे खरीप हंगाम संरक्षित सिंचन आवर्तनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.पेंच प्रकल्पामध्ये सध्यास्थितीत पाणीसाठा कमी असलातरी पावसाळा कालावधीचे अद्याप ४० दिवस शिलल्क आहेत. शहरातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तसेच वितरण आणि गळती थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडे