शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सालई नळयोजनेच्या कामात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:29 IST

मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देऊन तसे आदेश कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांची नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकींग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी सालई खुर्द येथील नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देसात वर्षांपासून ग्रामस्थ पाण्याच्या प्रतीक्षेत : ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष

संजय मते।लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देऊन तसे आदेश कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांची नळ योजनेच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या कामाचे पाईपलाईन खोदकाम आणि पॅकींग करण्यात अनियमितता असून अंदाजपत्रकाच्या विपरीत काम होत आहे. या कामाचा तपास पूर्ण होईपर्यंत काम थांबविण्यात यावे, अशी मागणी सालई खुर्द येथील नागरिकांनी केली आहे.नळयोजनाचे काम सुरु करण्यापूर्वी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रतिनिधी व इतर पदाधिकाºयाला माहिती न कळविता आपल्या मनमर्जीने काम सुरु करण्यात आले. मनमर्जीने काम करत असल्याने पाईप लाईनचे काम कुठपर्यंत शक्य होणार? हे कळत नाही.सन २००९-१० मध्ये जलस्वराज्य प्रकल्प योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र या योजनेचा जलकुंभ तीन कि.मी. अंतरावर असून, नियमितपणे पाईप लाईनमध्ये बिघाड येत असल्याने नळ योजना कधी बंद तर कधी सुरु राहत होती. यावर्षी उन्हाळा सुरु होण्यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा योजना म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग तुमसर या विभागाअंतर्गत १ लाख ९४ हजार रुपयाची तरतूद करून दुरुस्तीच्या नावावर पैसा खर्च करून लाटण्याचा प्रकार दिसून आला होता. लाखो रुपये खर्च करूनही पाणी पुरवठा योजना सुरु झाली नाही. आतापर्यंत किती सरपंच आले आणि गेले सर्वांनी पुढाकार घेऊन पाणी पुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यात यश आले नाही. यावर्षी पुन्हा दुरुस्तीच्या नावावर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली असून या कामात अनियमितता दिसून येत आहे. सालई खुर्द हे ४५० कुटुंबाचे गाव असून एकूण लोकसंख्या दोन हजार ४०० च्या जवळपास आहे. गावात पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे. सात वर्षांपासून गावकरी नळ योजनेचे पाण्यापासून कोसो दूर आहे. पाण्याच्या सोयीकरिता नळ योजनेचे काम भंडारा येथील नितीन निर्वाण नामक कंत्राटदाराला असल्याचे दिवांजी व अधिकारी यांनी सांगितले असून त्याने नवीन पाईप लाईन तयार करताना अनियमितता आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे. राजू सव्वालाखे, प्रविण लिल्हारे व गावातील वरिष्ठ नागरिकांनी सांगितले की, पाईप लाईन ही तात्पुरती नसून दीर्घकालीन आहे. त्यामुळे पाईप लाईन घालताना काळजी घेण्याची गरज आहे. मात्र कसलीही काळजी घेतली जात नाही. पाईप लाईन घालताना कमीत कमी ३ फुटाची खोली असणे गरजेचे आहे. त्यातील माती काढून रेती घालून नंतर पाईप घालावे लागते. परंतु कंत्राटदाराने असे काहीही केले नाही. जेसीबीने माती खोदून त्याठिकाणी पाईप घातले व जेसीबीच्याच सहाय्याने पाईप बुजविण्यात आले आहेत. पाईप लाईन बुजवते वेळी त्या पाईपवर मोठे दगड पडत असल्याचे दिसून आले. भविष्यात ही पाईप लाईन संकटात येईल, पाईप लाईन टाकते वेळी खाल उंच भरारी घेवून टाकण्यात येत आहे. नागठाणा विहिरीपासून तर गावाजवळ पर्यंत अशीच स्थिती असल्याचे गावकºयांनी सांगितले. पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना दीड ते दोन फुट खोली दिसून आल्यावर नागरिकांनी खोदकाम थांबविण्याची सूचना जेसीबी चालकांना दिली. मात्र काम थांबविण्यात आले नाही.पाईपलाईन फिटींगचे काम दोनशे रुपये मजूर वर्गाकडून करत असल्याने ही पाणी पुरवठा योजना भविष्यात खंडीत झाल्याशिवाय राहणार नाही? अशी भिती नागरिकांना वाटत आहे. यात आर.राठोड कनिष्ट अभियंता पाणी पुरवठा विभाग तुमसर, कंत्राटदार नितीन निर्वाण, ग्रामसेवक, ग्रा.पं. पदाधिकारी यांची साठगाठ असल्याचा आरोप गावकºयांनी केला आहे.पी.व्ही.सी. पाईप निकृष्ट दर्जाचे वापरले जात असून खोदकामात अनियमितता, पाईप घालताना कसलीही काळजी न घेणे अशा अनेक चुका केल्या जात आहेत.याबाबत विचारल्यावर अधिकारी कंत्राटदार बेजबाबदारपणाचे उत्तरे देतात. सदर पाणी पुरवठा योजनेच्या कामात मनमानी चालत असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग तुमसर कानाडोळा करीत असल्याने जिल्हाधिकारी भंडारा व कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा हे कोणते पाऊल उचलतात, याकडे गावकºयांचे विशेष लक्ष वेधले आहे.