शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:05 IST

वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबघेडा जलाशय मोजतो अखेरची घटका : नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.बघेडासह चिखली व नदी काठावरील गावात भीषण जलसंकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत २० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणाच्या मृत साठ्यातून पाणी विसर्ग करण्याची मागणी पंचकोशीत जोर धरू लागली आहे.आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर धरणावरच तुमसर तालुका व मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावांची भिस्त आहे. यापूर्वी या धरणातून रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर येथे उच्च स्तरीय बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत पाण्याचा २० दलघमी विसर्ग करण्यात आला. यात तालुक्यातील तुमसर शहरासह अनेक गावांची तृष्णा भागविण्यास मदत झाली. बघेडा, कारली जलाशय बानथडी नदीतून वैनगंगा पात्रातही पाणी धरणातून पोहोचले.सध्या सुर्य आग ओकत आहेत. धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे मोठ्या प्रमाणात बास्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणात केवळ मृतसाठा उपलब्ध आहे. मृतसाठ्यातून केवळ पिण्याच्या पाण्याकरीताच धरणातच विसर्ग करण्याचा नियम आहे. तालुक्यातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. तलावाने तळ गाठायला सुरूवात केली आहे. सदर जलाशयात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे. बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील अनेक गावात सध्या भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. मानवासोबतच गुरे ढोरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आह.े गाव खेड्यात पहाटेपासून पाण्याकरिता वणवन भटकावे लागत आहे. मागील ४५ वर्षात इतकी भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे, असे गावातील वयोवृृद्ध सांगत आहेत.गर्रा बघेडासह तालुक्यात भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडी धरणातून मृतसाठ्यातून किमान पिण्याकरिता पाण्याचा विसर्ग करावे. बघेडा जलाशय व इतर जलाशयात पाणी तात्काळ सोडून समस्या दूर करावी. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.-सुरेश रहांगडाले, माजी जि.प. सदस्य तुमसर.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प