शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:05 IST

वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबघेडा जलाशय मोजतो अखेरची घटका : नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.बघेडासह चिखली व नदी काठावरील गावात भीषण जलसंकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत २० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणाच्या मृत साठ्यातून पाणी विसर्ग करण्याची मागणी पंचकोशीत जोर धरू लागली आहे.आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर धरणावरच तुमसर तालुका व मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावांची भिस्त आहे. यापूर्वी या धरणातून रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर येथे उच्च स्तरीय बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत पाण्याचा २० दलघमी विसर्ग करण्यात आला. यात तालुक्यातील तुमसर शहरासह अनेक गावांची तृष्णा भागविण्यास मदत झाली. बघेडा, कारली जलाशय बानथडी नदीतून वैनगंगा पात्रातही पाणी धरणातून पोहोचले.सध्या सुर्य आग ओकत आहेत. धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे मोठ्या प्रमाणात बास्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणात केवळ मृतसाठा उपलब्ध आहे. मृतसाठ्यातून केवळ पिण्याच्या पाण्याकरीताच धरणातच विसर्ग करण्याचा नियम आहे. तालुक्यातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. तलावाने तळ गाठायला सुरूवात केली आहे. सदर जलाशयात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे. बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील अनेक गावात सध्या भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. मानवासोबतच गुरे ढोरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आह.े गाव खेड्यात पहाटेपासून पाण्याकरिता वणवन भटकावे लागत आहे. मागील ४५ वर्षात इतकी भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे, असे गावातील वयोवृृद्ध सांगत आहेत.गर्रा बघेडासह तालुक्यात भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडी धरणातून मृतसाठ्यातून किमान पिण्याकरिता पाण्याचा विसर्ग करावे. बघेडा जलाशय व इतर जलाशयात पाणी तात्काळ सोडून समस्या दूर करावी. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.-सुरेश रहांगडाले, माजी जि.प. सदस्य तुमसर.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प