शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय बावनथडी धरणात केवळ मृतसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 01:05 IST

वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबघेडा जलाशय मोजतो अखेरची घटका : नदी काठावरील गावात भीषण जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वाढते तापमानामुळे झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे. तुमसर तालुक्यात आंतरराज्यीय बावनथडी धरणात सध्या मृतसाठा केवळ शिल्लक आहे. त्यामुळे तालुकातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय शेवटी घटका मोजत असल्याचे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.बघेडासह चिखली व नदी काठावरील गावात भीषण जलसंकटाचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत २० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. धरणाच्या मृत साठ्यातून पाणी विसर्ग करण्याची मागणी पंचकोशीत जोर धरू लागली आहे.आंतरराज्यीय बावनथडी राजीवसागर धरणावरच तुमसर तालुका व मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावांची भिस्त आहे. यापूर्वी या धरणातून रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याकरिता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आमदार चरण वाघमारे यांनी नागपूर येथे उच्च स्तरीय बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर बावनथडी धरणातून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत पाण्याचा २० दलघमी विसर्ग करण्यात आला. यात तालुक्यातील तुमसर शहरासह अनेक गावांची तृष्णा भागविण्यास मदत झाली. बघेडा, कारली जलाशय बानथडी नदीतून वैनगंगा पात्रातही पाणी धरणातून पोहोचले.सध्या सुर्य आग ओकत आहेत. धरणातील शिल्लक पाणी साठ्याचे मोठ्या प्रमाणात बास्पीभवन होत आहे. त्यामुळे धरणात केवळ मृतसाठा उपलब्ध आहे. मृतसाठ्यातून केवळ पिण्याच्या पाण्याकरीताच धरणातच विसर्ग करण्याचा नियम आहे. तालुक्यातील क्रमांक दोनचा बघेडा जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. तलावाने तळ गाठायला सुरूवात केली आहे. सदर जलाशयात बावनथडी धरणातून पाणी विसर्ग करण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले यांनी केली आहे. बावनथडी व वैनगंगा नदी काठावरील अनेक गावात सध्या भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गावांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून उपाययोजना करण्याची गरज आहे. मानवासोबतच गुरे ढोरांना पाण्याची समस्या निर्माण झाली आह.े गाव खेड्यात पहाटेपासून पाण्याकरिता वणवन भटकावे लागत आहे. मागील ४५ वर्षात इतकी भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे, असे गावातील वयोवृृद्ध सांगत आहेत.गर्रा बघेडासह तालुक्यात भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. बावनथडी धरणातून मृतसाठ्यातून किमान पिण्याकरिता पाण्याचा विसर्ग करावे. बघेडा जलाशय व इतर जलाशयात पाणी तात्काळ सोडून समस्या दूर करावी. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी.-सुरेश रहांगडाले, माजी जि.प. सदस्य तुमसर.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प