शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एक रुपयात विमा, तरी शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:52 IST

३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : पीक विमा उतरविण्याची शेतकऱ्यांना मिळाली संधी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाने गेल्या वर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात पीक विमा उतरण्याची सुविधा उपलब्ध करून दिले आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळत नसल्याने आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची गर्दी झाल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अडचणी यायला लागल्या. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ फिरविल्याची परिस्थिती दिसून येत आहे. आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना विमा उतरविण्याची संधी मिळाली आहे.

शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी, तसेच पिकांना संरक्षण मिळावे, याकरिता शासनाने एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याकरिता १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही सुरू करण्यात आल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता एकच गर्दी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यात अडचणी यायला लागल्याने शेतकऱ्यांनी अर्जच दाखल केले नाही. मुदतवाढीची मागणी केल्यावर शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

७९,२३३ शेतकऱ्यांनी भरला विमायावर्षी खरीप हंगामात आतापर्यंत एकूण ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनीच पीक विमा उतरविला आहे. विम्यासाठी अर्ज संख्या १,७९,१७८ इतकी आहे. ही संख्या १९ जुलैपर्यंतची असून, येत्या ३१ जुलैपर्यंत यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

८६,६५९ हेक्टरचा काढला विमाजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पिकांना संरक्षण मिळाले आहे. शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने विमा संरक्षित क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

१,१८,०९६ शेतकऱ्यांनी भरला होता विमामागील वर्षी शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा काढण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने १,१८,०९६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार ५११ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते.

विमा एक रुपयात, कागदपत्रासाठी चारशे रुपयांचा खर्चशासनाने एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे; पण त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्याकरिता किमान ४०० रुपयांपर्यंत खर्च येत आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, गावात नेटवर्कच्या अडचणी कायम आहेत. त्यांना अर्ज भरण्याकरिता तालुक्याला जावे लागते.

का घटली शेतकऱ्यांची संख्या?पीकविमा उतरवूनही शेतकऱ्यांनी पिकांची नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहेत. यामुळे शेतकरी यावर्षी पीकविमा उतरविण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.नुकतीच 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेचे अर्ज भरण्याकरिता महिलांची सेतू केंद्रावर मोठी गर्दी असल्याने पीकविमा काढण्याचे अर्ज मागे पडले आहे.

जिल्ह्यातील शेतकरी म्हणतात..."शासनाने पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पीकविमा उतरविण्याकरिता सुरुवातीला १५ जुलैपर्यंतची मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहिण योजना सुरू झाल्याने सेतू केंद्रावर अर्ज भरण्याकरिता गर्दी झाली होती. शेतकऱ्यांना अर्जासाठी संधीच मिळत नव्हती."- महादेव फुसे, शेतकरी.

"यावर्षी विविध योजनांचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीकविमा उतरविण्याकडे दुर्लक्ष झाले होते. मागील वर्षी पीकविमा उतरविला होता; परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत योजनेसंबंधी नाराजी आहे."- सुरेंद्र बागडे, शेतकरी.

"सध्या जिल्ह्यात ७९ हजार २३३ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून अर्जाची संख्या १,७९,१७८ इतकी आहे. आतापर्यंत ८६ हजार ६५९ हेक्टर क्षेत्राचा पीक विमा उतरविण्यात आला आहे. मुदतवाढीमुळे यात आणखी वाढ होणार आहे. यापूर्वी योजनेसाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. आता शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गतवर्षी इतकी नोंदणी होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत."- संगिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रbhandara-acभंडारा