शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

‘सक्षम’ हा विद्यार्थी-शिक्षकांच्या अंतर्मनाचा अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:54 IST

वाचन, लिखाण, वक्तृत्व संवाद, स्व:चा विकास, व सामाजिक भान या बाबी प्रचलित अभ्यासक्रमात नाविण्यपूर्ण पद्धतीने मुलांमध्ये बिंबविण्यासाठी सक्षम हा उपक्रम कार्य करणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सुहास दिवसे : उपक्रमाचा थाटात शुभारंभ, १३५ शाळा डिजिटल पब्लिक स्कूल होणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाचन, लिखाण, वक्तृत्व संवाद, स्व:चा विकास, व सामाजिक भान या बाबी प्रचलित अभ्यासक्रमात नाविण्यपूर्ण पद्धतीने मुलांमध्ये बिंबविण्यासाठी सक्षम हा उपक्रम कार्य करणार आहे. सक्षम हा विद्यार्थी व शिक्षकांच्या अंतर्मनाचा अविष्कार ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हा प्रशासन व मानव विकास कार्यक्रमच्या सहकार्याने सक्षम हा नाविण्यपूर्ण उपक्रम तयार करण्यात आला. या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारला पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, आ.चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूरच्या नगरसेविका डॉ.परिणीता फुके, शुभांगी गेंढे हे उपस्थित होते.यावेळी जि.प.अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर म्हणाल्या, सक्षममुळे जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता नक्कीच वाढणार आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून तयार झालेला सक्षम उपक्रम जिल्हा सक्षम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आ.चरण वाघमारे म्हणाले, सक्षम हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून सर्व शाळा व शिक्षकांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेची जबाबदारी स्वीकारावी. शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले हे व्हिजन वाखणण्याजोगे आहे. गृहपाठ हा सक्षमचा मुळ गाभा आहे. शिक्षक, पालक व समाजाने सक्षमला यशस्वी करण्यासाठी हृदयातून प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ.परिणीता फुके यांचेही मार्गदर्शनपर भाषण झाले.प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सूर्यवंशी म्हणाले, यशदा येथील प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करण्यासंबंधी चर्चा झाली. यानंतर जिल्ह्यातील अंगणवाडयांना भेटी दिल्या असता बौध्दीक विकासाचा उपक्रम नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्याद यांच्याशी चर्चा करुन २१ कौशल्य व १० मुल्य यावर काम करण्याचे ठरले. ही संकल्पना जिल्हाधिकारी यांना आवडली आणि त्यांच्या पुढाकाराने सक्षमची निर्मिती झाल्याचे सांगितले. आता खराशी शाळेप्रमाणे १३५ शाळा विकसित करण्यात येतील. शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. ई-ग्रंथालय निर्माण केले जातील व या शाळांना सक्षम डिजीटल पब्लीक स्कूल असे नाव दिले जाईल, असे सुर्यवंशी यांनी सांगितले.या कार्यक्रमात २५ शिक्षकांनी तयार केलेल्या सक्षम कार्यपुस्तिकेचे आणि जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या माझं सरकार या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खराशी शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांचा सत्कार करण्यात आला. संचलन सहनियोजन अधिकारी वसुंधरा फाळके यांनी तर आभारप्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.