शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून ...

मोहाडी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन : विदर्भ राज्य आंदोलन समिती सरसावली भंडारा : एप्रिल व मे महिण्यात वादळी व अवकाळी पावसामुळे मोहाडीच्या ग्रामीण भागातील घरांचे अतोनात नुकसान झाले असून जवळपास ३०० कुटुंबे बाधित झाली आहेत. आता पावसाळा लवकरच सुरु होत आहे. आणि त्यामुळे या भागातील गरीब कुटुंबाना तातडीने शासकीय मदत पुरविली जाने अतिशय गरजेचे आहे. असे असले तरी प्रशासन संथ गतीने कार्यवाही करीत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा जिल्हा याबाबत न्याय मिळवून देण्यास पुढे सरसावली असून ३ जून रोजी कोअर कमिटी सदस्य माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह मोहाडीचे तहसिलदार देशमुख यांना घेराव करण्यात आला. वाऱ्याचा वेग व पर्जन्य मापनाची व्यवस्था आमच्याकडे नाही. अशी सबब सांगून प्रकरणे निकाली काढता आले नाही असे उत्तर देताच माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी प्रत्यक्ष घरांचे पडझड होऊन मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे म्हटले. लोकांचा संसार पावसात वाहून गेल्यानंतर मदत पाठवणार आहात का? असा प्रश्न अ‍ॅड. पद्माकर टेंभुर्णीकर यांनी उपस्थित केला. प्रशासनाने कर्तव्यात दिरंगाई करु नये. अन्यथा पावसाळा सुरु झाल्यावर जन आक्रोशाचा बांध फुटेल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देवून बाधित कुटूंबांना आर्थिक व वस्तुरुप मदत पुरवावी, अशी मागणी केली. माजी आमदार मधुकर कुकडे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे तयार केले नाही. यावरुन प्रशासन कासवगतीने चालत आहे. याकडे लक्ष वेधून पावसाळा सुरु होण्याच्या आधी लोकांना शासकीय मदत उपलब्ध करुन द्या असे सांगितले.तहसिलदार देशमुख यांनी सांगितले की, ७ व २७ एप्रिल २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १९ घरांचे नुकसान झाले तर ४, ५, १२ मे २०१६ रोजीच्या वादळी पावसामुळे १०३ घरांचे नुकसान झाले. २०, २१ व २७ मे २०१६ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १५४ कुटूंबे बाधित झाली, असे एकुण २७६ कुटूंबे बाधित झाली. यात पोल्ट्रीफार्म मधील कोंबड्याचा सुध्दा समावेश आहे. वादळाचा ताशी वेग उपलब्ध नसल्यामुळे अतिवृष्टी झाली नसल्यामुळे सदर पंचनामे नियमाप्रमाणे निकाली काढता आले नाही. विशेष बाब अंतर्गत मंजूरीसाठी प्रकरणे जिल्हाधिकाऱ्याकडे ३० मे रोजी पाठविल्याचे सांगितले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने तहसिलदारांना उपरोक्त मागणीसाठी निवेदन सादर केले. यावेळी महासचिव रमाकांत पशिने, उपाध्यक्ष वासुदेवराव नेवारे, अविनाश पनके, कोषाध्यख अर्जुन सुर्यवंशी, युवाध्यक्ष तुषार हटेवार, शहर अध्यक्ष प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष केशव हुड, दामोधर क्षिरसागर, ग्रामीण अध्यक्ष प्रा. प्रेमलाल लांजेवार, देवदास गभणे, विजयकुमार दुबे, जाधवराव साठवणे, विजय पारधी, गोविंदराव चरडे व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)