शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

धान पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:11 IST

पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे,....

ठळक मुद्देशेतकरी संकटात : कृषी अधिकाऱ्यांनी सुचविल्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पावसाचा खंड व बांध्यात पाणी नसल्याने लष्करी अळीचा हमखास प्रादुर्भाव आढळतो. अलीकडे जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु असून काही भागात धानाच्या नर्सरीत व रोवणी झालेल्या ठिकाणी लष्करी अळीचे आक्रमण आढळले आहे, अशी माहिती लाखनी तालुक्याचे कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, वरिष्ठ भात पैदामकार डॉ. जी. आर. शामकुंवर व मंडळ कृषी अधिकारी पालांदूर यांनी 'लोकमत'ला दिली आहे.धान पिकाची लागवड सुरु झालेली आहे. चुलबंद खोºयात ८० टक्के रोवणी आटोपली आहे. रोवणीनंतर बांधानात पाणी नसल्याने काही शेतात लष्करी अळी जोर मारु शकते. जुलै व आॅगस्ट महिन्यात शक्यतो लष्करी अळी हजेरी लावते. परिणामी शेतकरी संकटात सापडून उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. वातावरणात बदल होत असल्याने पालांदूर परिसरात लष्करी अळीचे आक्रमण आढळून आले आहे. शेतकºयांनी नर्सरीत व रोवणीत लक्ष पुरविण्याचे आवाहन कृषी अधिकाºयांनी केले आहे. लष्करी अळीची एक पिढी पूर्ण होण्यास ३० ते ४० दिवस लागतात. या अळ्या लष्काराप्रमाणे पिकावर हल्ला चढवतात.या अळ्या दिवसाला शांत राहत रात्रीला जोरदार आक्रमण करतात. दिवसा धानाच्या बोचक्यात, झुडात, खामल्यात, मुळाशेजारी वास्तव करतात. धिुºयावरील गवतात लपून बसतात. पाने कुरडतात. यात धानपिकाचे मोठे नुकसान शक्य आहे. या अळीचा व्यवस्थापनाकरिता शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे. धानाच्या बांधात पाणी साचवून ठेवावे. धानावरील अळ्या दोराच्या किंवा झाडाच्या फांद्याचा उपयोग करुन पाण्यात बेडकाचे संवर्धन करावे, लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता डायक्लोरोव्हास ७६ ईसी, १२५० मिली, १० लिटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळी फवारणी करावी, असे आवाहन कृषी अधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती