शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजना निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:53 IST

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे.

ठळक मुद्देपश्चिम महाराष्ट्राला झुकते माप नंदूरबार व भंडारा जिल्ह्यांना सर्वात कमी

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत राज्य शासनाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या निधी मर्यादेत विदर्भावर अन्याय केला असून पश्चिम महाराष्ट्राला नेहमीप्रमाणे झुकते माप दिले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी १९६९ .८५ कोटी रूपयांची मर्यादा ठरवून सापत्न वागणूक दिली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील केवळ पाच जिल्ह्यांसाठी १५८९.६० कोटी एवढी भरीव निधी मर्यादा आहे. विशेष म्हणजे नंदुरबार आणि भंडारा जिल्ह्यांच्या वाट्याला आलेली निधी मर्यादा राज्यात सर्वात कमी आहे.जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यात विविध विकास कामांचा समावेश असतो. जिल्ह्यातील समस्या आणि जिल्ह्याची गरज पाहून कोणत्या योजनांवर किती खर्च करावयाचा याचे नियोजन केले जाते. जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या माध्यामातून हा वार्षिक योजनांचा आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला जातो. २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) तयार करण्यासाठी शासनाने कमाल नितव्यय मर्यादा ठरवून दिली आहे. राज्यातील संपूर्ण ३६ जिल्ह्यांसाठी ही मर्यादा ७३५२.३० कोटी रुपये आहे. जिल्हा निहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास मागास विदर्भावर निधी मर्यादेतही अन्याय झाल्याचे दिसून येते.विदर्भातील ११ जिल्ह्यांसाठी १९६९ कोटी ८५ लाख रूपयांची कमाल मर्यादा आहे. त्यात नागपूर जिल्हा २३४.८८ कोटी, वर्धा १०७.५७ कोटी, भंडारा ९१.४६ कोटी, चंद्रपूर १७५.७४ कोटी, गडचिरोली १४५.३२ कोटी, गोंदिया १०५.२७ कोटी, अमरावती २१२.८६ कोटी, अकोला १२१.९२ कोटी, यवतमाल २३०.९२ कोटी, बुलढाणा २१०.१३ कोटी, वाशिम १०२.८६ कोटी रूपयांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा ५०५.७६ कोटी, सातारा २५६.८६ कोटी, सांगली २२४.१७ कोटी, सोलापूर ३३९.७७ कोटी, कोल्हापूर २४३.०४ कोटींच्या निधी मर्यादेचा समावेश आहे.मागास विदर्भाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे नेहमी सांगितले जाते. विदर्भाच्या विकासासाठी निधी कमी पडून दिला जाणार नाही असे मुख्यमंत्र्यापासून वित्त मंत्र्यांपर्यंत सर्वच जण सांगतात. मात्र जिल्हा वार्षिक योजना तयार करण्यासाठी ठरवून दिलेल्या कमाल नितयव्यय मर्यादेने विदर्भाच्या विकासाला कशी चालना मिळणार असा प्रश्न आहे.

लहान जिल्ह्यांकडे दुर्लक्षच्राज्यातील लोकसंख्या आणि विस्ताराने लहान जिल्ह्याकडे जिल्हा वार्षिक योजना कमाल निधी मर्यादेत दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नंदुरबार जिल्ह्याला केवळ ६७.५५ कोटींची कमाल निधी मर्यादा ठरवून दिली असून ती राज्यात सर्वात कमी आहे. त्या खालोखाल भंडारा ९१.४६ कोटी, सिंधुदुर्ग ९२.१८ कोटी, हिंगोली ९८.७४ कोटी रूपयांची मर्यादा आहे. याचा परिणाम विकास योजनांचा कृती आराखडा तयार करताना होणार असून पर्यायाने जिल्ह्यांच्या विकासावर होणार आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ