शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ काळाची गरज

By admin | Updated: January 21, 2016 00:50 IST

गौरवसंपन्न इतिहास असलेल्या विदर्भाची उपेक्षा सातत्याने होत आली आहे. वेगळा विदर्भ राज्य स्थापनेची मागणी ही काल परवाची नसून फार जुनी आहे.

पत्रपरिषद : राजकुमार तिरपुडे यांनी स्थापन केला विदर्भ माझा पक्षभंडारा : गौरवसंपन्न इतिहास असलेल्या विदर्भाची उपेक्षा सातत्याने होत आली आहे. वेगळा विदर्भ राज्य स्थापनेची मागणी ही काल परवाची नसून फार जुनी आहे. नागपुराला उपराजधानीचा दर्जा देऊन नेहमी विदर्भाची उपेक्षा करण्यात आली आहे. वेगळ्या विदर्भासाठी जनमानसात जावून राजकीयदृष्ट्या या मागणीला बळ मिळाले पाहिजे, अशी माहिती विदर्भ माझा पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी दिली. येथील विश्रामगृहात दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ.गोविंद वर्मा, मंगेश तेलंग, सुरेश राऊत आदी उपस्थित होते. तिरपुडे म्हणाले भारताच्या हृदयस्थानी असलेला विदर्भ परिसर पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय व व्यवसायीक महत्व असलेला एक गौरवसंपन्न आहे. १९५६ साली राज्य पुनर्वसनेत मध्यप्रांताची राजधानी असलेल्या नागपूर शहराचे राजधानीचे स्वरुप बदलवून द्विभाषिक राज्यात विदर्भाला सामील करण्यात आले. १ मे १९६० रोजी नवनिर्मित राज्य महाराष्ट्रामध्ये नागपूर व विदर्भाचा समावेश करून नागपुरला उपराजधानीचे दुय्यम स्वरुप प्राप्त झाले. मध्यप्रांताची राजधानी ते महाराष्ट्र राज्याची उपराजधानी या आजवरच्या विदर्भाच्या विकासाच्या प्रवासाचा अभ्यास केल्यास पश्चिम महाराष्ट्रापेक्षा विदर्भाच्या वाटी सातत्याने उपेक्षा आली. आजघडीला १ लाख ५० हजार कोटींच्या घरात अनुशेष असून तो कधीही भरून न निघणारा आहे. राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री स्व.नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना करून १९८० मध्ये सर्वप्रथम विदर्भाचा अनुशेष ४० हजार कोटी असल्याची माहिती दिली होती. तसेच विदर्भ राज्य समन्वय समितीच्या माध्यमाने स्वतंत्र विदर्भासाठी मागणी रेटून धरली होती. शेतकरी आत्महत्या, उद्योग, व्यापार, आरोग्य, शिक्षण क्षेत्रात विदर्भ पिछाडीवर आहे. त्यामुळे वेगळे विदर्भराज्य या आश्वासनावर भाजपने विदर्भात यश मिळविले. परंतु या घडीला ते आश्वासन पक्ष विसरलेला आहे. परिणामी विदर्भ राज्य मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असा इशाराही तिरपुडे यांनी दिला. (प्रतिनिधी)संगणक परिचालकांची कुचंबणाभंडारा : ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांचा महाआॅनलाईनसोबत असलेला करार संपुष्टात आल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. या परिचालकांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन केले असता त्यांच्यावर लाठीमार झाला होता. (प्रतिनिधी)