शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

मुख कर्करुग्णांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:51 IST

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २२३ रुग्ण : खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय. अलीकडे खर्रा आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण तरुणाईत प्रचंड वाढले असून यामुळेच भंडारा जिल्ह्यात अवघ्या चार वर्षात ५४२ कर्करुग्ण आढळले असून त्यात मुख कर्करोगाचे २२३ रुग्ण आहे. जनजागृती आणि तंबाखू विरोधी मोहीम राबवूनही तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत कुठेही कमी दिसत नाही. उलट खर्रा, तंबाखू मागणे अलीकडे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी असतांनाही कुणी त्याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही.कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कर्क रोगग्रस्त रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात धक्कादायक वास्तव पुढे आले. २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षात जिल्ह्यात ५४२ कॅन्सरग्रस्त आढळून आले. त्यात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रुग्ण आहेत. त्यांची संख्या २२३ आहे. त्या खालोखाल स्तनकर्क रोगाचे १२० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १२२, २०१६-१७ मध्ये १२७ आणि २०१७-१८ मध्ये १६० तर २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. तंबाखू, खर्रा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे त्यांना कर्करोगाची लागण झाल्याची या अहवालात म्हटले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अलीकडे तंबाखूची क्रेझ वाढली आहे. सुरुवातीला तंबाखू म्हणून खाणारे आता खर्रा घोटून खायला लागले आहे. खर्रा घोटतांना त्यात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सुपारी आणि तंबाखूचे मिश्रण करुन खाण्याची सवय अनेकांना लागली आहे. खर्रा खाल्ला नाही तर अनेकजण बेचैन होतात. मात्र त्यातून कर्करोगाला आपसूक आमंत्रण दिले जाते.तंबाखु सेवन करणारे सर्वाधिक ३० ते ४० वयोगटातीलमुख कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत १ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मोखीक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात या मोहीमेअंतर्गत ४ लाख ५१ हजार ८९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात २ लाख ४७ हजार ३५ पुरुष तर २ लाख ४ हजार ८५८ महिलांचा समावेश होता. यापैकी ४४ हजार ६३ जण तंबाखु आणि सुपारी सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्यात ३१ हजार १८७ पुरुष तर १२ हजार ८८६ महिलांचा समावेश आहे. वयोगटानुसार ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे आढळून आले. २४ हजार २० जण तंबाखू, सुपारीचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. या अहवालात जसजसे वय वाढत गेले तसतसे तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.तंबाखू सोडण्यासाठी हवी इच्छाशक्तीतंबाखूचे सेवनाची सवय एकदा लागली की ती सुटत नाही. मात्र इच्छाशक्ती असेल तर कुणीही तंबाखु सोडू शकतो. तंबाखूपासून दूर राहण्यासाठी तंबाखू खाणाºयांपासून दुर रहा, तंबाखूची तलफ आल्यास कुरमुरे, चने, शेंगदाणे, लवंग चघळा, मनात १ ते १०० अंक मोजा, मन दुसºया कामात गुंतवा, मी एकदा तंबाखू सेवन केले तर काय फरक पडेल असा विचार करुन एकदा सोडलेला तंबाखू पुन्हा खाऊ नका.मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत अनेकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे पुढे आले. यातून काहींमध्ये कर्करोगाची लक्षणेही दिसून आली. जनजागृती हाच यावरील प्रभावी उपाय असून आता तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. त्यासोबतच शासकीय कार्यालय, महाविद्यालय आदी ठिकाणीही जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.-डॉ. मनीष बत्रा, दंत व मुख रोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा

टॅग्स :cancerकर्करोग