शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

मुख कर्करुग्णांची संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:51 IST

कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय.

ठळक मुद्देभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २२३ रुग्ण : खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कॅन्सर हा शब्द उच्चारला तरी प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सरकते. त्यात डॉक्टरांनी कॅन्सरची लक्षणे असल्याचे निदान केले तर भल्याभल्यांना स्मशानाची वाट दिसते. कॅन्सर होण्याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन होय. अलीकडे खर्रा आणि तंबाखू खाण्याचे प्रमाण तरुणाईत प्रचंड वाढले असून यामुळेच भंडारा जिल्ह्यात अवघ्या चार वर्षात ५४२ कर्करुग्ण आढळले असून त्यात मुख कर्करोगाचे २२३ रुग्ण आहे. जनजागृती आणि तंबाखू विरोधी मोहीम राबवूनही तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत कुठेही कमी दिसत नाही. उलट खर्रा, तंबाखू मागणे अलीकडे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. खर्रा, तंबाखूची पुडी, मरणाच्या दारात उडी असतांनाही कुणी त्याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही.कर्करोग प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कर्क रोगग्रस्त रुग्णांची माहिती गोळा करण्यात आली. त्यात धक्कादायक वास्तव पुढे आले. २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षात जिल्ह्यात ५४२ कॅन्सरग्रस्त आढळून आले. त्यात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रुग्ण आहेत. त्यांची संख्या २२३ आहे. त्या खालोखाल स्तनकर्क रोगाचे १२० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये १२२, २०१६-१७ मध्ये १२७ आणि २०१७-१८ मध्ये १६० तर २०१८ च्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. तंबाखू, खर्रा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे त्यांना कर्करोगाची लागण झाल्याची या अहवालात म्हटले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अलीकडे तंबाखूची क्रेझ वाढली आहे. सुरुवातीला तंबाखू म्हणून खाणारे आता खर्रा घोटून खायला लागले आहे. खर्रा घोटतांना त्यात सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सुपारी आणि तंबाखूचे मिश्रण करुन खाण्याची सवय अनेकांना लागली आहे. खर्रा खाल्ला नाही तर अनेकजण बेचैन होतात. मात्र त्यातून कर्करोगाला आपसूक आमंत्रण दिले जाते.तंबाखु सेवन करणारे सर्वाधिक ३० ते ४० वयोगटातीलमुख कर्करोग तपासणी मोहिमेअंतर्गत १ ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मोखीक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात या मोहीमेअंतर्गत ४ लाख ५१ हजार ८९३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात २ लाख ४७ हजार ३५ पुरुष तर २ लाख ४ हजार ८५८ महिलांचा समावेश होता. यापैकी ४४ हजार ६३ जण तंबाखु आणि सुपारी सेवन करीत असल्याचे आढळून आले. त्यात ३१ हजार १८७ पुरुष तर १२ हजार ८८६ महिलांचा समावेश आहे. वयोगटानुसार ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक तंबाखू सेवन करणारे आढळून आले. २४ हजार २० जण तंबाखू, सुपारीचे सेवन करीत असल्याचे दिसून आले. या अहवालात जसजसे वय वाढत गेले तसतसे तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले.तंबाखू सोडण्यासाठी हवी इच्छाशक्तीतंबाखूचे सेवनाची सवय एकदा लागली की ती सुटत नाही. मात्र इच्छाशक्ती असेल तर कुणीही तंबाखु सोडू शकतो. तंबाखूपासून दूर राहण्यासाठी तंबाखू खाणाºयांपासून दुर रहा, तंबाखूची तलफ आल्यास कुरमुरे, चने, शेंगदाणे, लवंग चघळा, मनात १ ते १०० अंक मोजा, मन दुसºया कामात गुंतवा, मी एकदा तंबाखू सेवन केले तर काय फरक पडेल असा विचार करुन एकदा सोडलेला तंबाखू पुन्हा खाऊ नका.मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत अनेकांना तंबाखूचे व्यसन असल्याचे पुढे आले. यातून काहींमध्ये कर्करोगाची लक्षणेही दिसून आली. जनजागृती हाच यावरील प्रभावी उपाय असून आता तंबाखूमुक्त शाळा अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. त्यासोबतच शासकीय कार्यालय, महाविद्यालय आदी ठिकाणीही जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.-डॉ. मनीष बत्रा, दंत व मुख रोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा

टॅग्स :cancerकर्करोग