शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

साकोलीच्या नवतलावात वाढले अतिक्रमण

By admin | Updated: July 27, 2015 00:43 IST

निसर्गाचा असमतोलपना व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात आणली.

शासनाचा अजब कारभार : जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची नागरिकांची मागणीसाकोली : निसर्गाचा असमतोलपना व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना अस्तित्वात आणली. यावर कोट्यवधींचा खर्च होत असताना जुन्या तलावातील अतिक्रमाणाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. साकोलीच्या नवतलावाच्या परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे या तलावाची सिंचनक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. एकोडी रोड ते नागझीरा रोडलगत नवतलाव आहे. सेंदुरवाफा, जमनापुर गावाचे पाणी नाल्याद्वारे या तलावात येते. हा तलाव भरल्यानंतर साकोली येथील गावतलाव भरल्या जातो. दोन्ही तलाव आकाराने व क्षेत्रफळाने खुप मोठे आहेत. या दोन्ही तलावाच्या पाण्याने जवळपासच्या शेतीला सिंचनाची सोय होते. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे या तलावांची सिंचन क्षमता कमी झाली आहे.सध्या नवतलावात नागझीरा रोडकडून अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अतिक्रमणाचे प्रमाण वाढतच आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी हजारो एकर शेतीला सिंचनाची होणारी सोय आता अर्ध्यावर आली आहे.शासनाने यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी नवीनच जलयुक्त शिवार योजना अस्तीत्वात आणली. यात तलाव खोलीकरण, नालेखोलीकरण, बंधारे व विहिरी खोदकाम करने, यावर कोट्यवधी रूपयाचा खर्च केल्या जात असला तरी जुन्या तलावाकडे दुर्लक्ष होत असून तलावातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे.नवतलाव परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाची दखल महसुल विभाग घेत नाही. या तलावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी व गुरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवतो. त्यामुळे या प्रकल्पाची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)