शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

३३ गावांत ५५०० हेक्टर क्षेत्रात वाढले शेती सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:36 IST

जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली.

ठळक मुद्देमोहाडी तालुक्यात जलयुक्तचा परिणाम : ८६८ कामातून ६६११ टीसीएम जलसाठ्याची निर्मिती

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली. एका पाण्याचा दुष्काळ कायमचा संपला.मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सन २०१५ ते १८ या तीन वर्षात झालेल्या कामांमुळे पारंपारिक सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण झाली. नवनिर्माणाबरोबर सुधारणा व जलजागृतीमुळे पाण्याचा ताळेबंद निर्माण होवून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व व वापराचे नवे तंत्र कळले आहे. उत्पादनात मोठी वाढ पहावयास मिळाली आहे.गतवर्षी १०००१ टीसीएम जलसाठ्याची निर्मितीसन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसºया टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रूपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज, जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे १००१.३ टीसीएम जलसाठा तयार होण्यास मदत मिळाली. झालेल्या कामातून अंदाजे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.२०१५-१६ मध्ये २७३९ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढलेजलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सन २०१५-१६ मध्ये मोहाडी तालुक्यातील करडी, मोहगाव करडी, बोरी पांजरा, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा बुज, नरसिंगटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी, खैरलांजी आदी १५ गावात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ३१२ कामे करण्यात आली. यावर सुमारे ९०१.६७७ लक्ष रूपयांचा खर्च करण्यात आला. यातून सुमारे ३४०४.६३४ टीसीएम जलसाठा तयार होवून २७३९.२४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन निर्माण झाले.२०१६-१७ मध्ये १९०९ क्षेत्र सिंचन वाढलेसन २०१६-१७ मध्ये दुसºया टप्प्यात महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धुसाळा, धोप, ताडगाव, जांब आदी १० गावांची निवड होवून ३३३ कामे करण्यात आली. याकामांवर सुमारे ५३२.४ लक्ष रूपये खर्च होवून सुमारे २२०६.३६ टीसीएम जलसाठा निर्माण होण्यास मदत मिळाली तर नवनिर्माणामुळे १९०१.६३ हेक्टर क्षेत्र सिंचनक्षम झाले.जलयुक्त शिवारमुळे शेतशिवार पाणीदार झाले. यावर्षी सप्टेंबरमध्ये धानाचे पीक फुलोºयावर असताना सुमारे २३ दिवस पावसाचा खंड पडल्याने याच पाण्याचा वापर शेतकºयांनी डिझेल इंजिनचा वापर करून केला. तसेच तलावाचे गेट सुरू करून शेतीचा दुष्काळ संपविला. यावर्षी धानाचे हेक्टरी उत्पादन वाढणार आहे.-निशिकांत इलमे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षजलयुक्त शिवार योजनेमुळे तीन वर्षात ३३ गावातील एका पाण्याचा दुष्काळ संपला. खरीपातील धानाची व ऊसाची शेती बहरली असून उर्वरित पाण्याचा उपयोग रब्बीच्या पिकासाठी होणार आहे.-निमचंद्र चांदेवार, मंडळ कृषी अधिकारी, मोहाडी