शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३३ गावांत ५५०० हेक्टर क्षेत्रात वाढले शेती सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 21:36 IST

जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली.

ठळक मुद्देमोहाडी तालुक्यात जलयुक्तचा परिणाम : ८६८ कामातून ६६११ टीसीएम जलसाठ्याची निर्मिती

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : जलयुक्त शिवार योजनेतून मोहाडी तालुक्यात सन २०१५ ते १८ या ती वर्षात जलसंधारण व भुजलपुनर्भरणाचे ८६८ कामे पूर्ण झाली. या कामांवर जवळपास २००४.०७७ लक्ष रूपयांचा खर्च झाला. झालेल्या कामांतनू ६६११.६७३ टीसीएम जलसाठा तयार होवून ३३ गावात सुमारे ५५०० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन तयार झाले. या पाण्यामुळे खरीपाची धानाची शेती पिकण्यास मोलाची मदत मिळाली. एका पाण्याचा दुष्काळ कायमचा संपला.मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सन २०१५ ते १८ या तीन वर्षात झालेल्या कामांमुळे पारंपारिक सिंचन क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण झाली. नवनिर्माणाबरोबर सुधारणा व जलजागृतीमुळे पाण्याचा ताळेबंद निर्माण होवून शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व व वापराचे नवे तंत्र कळले आहे. उत्पादनात मोठी वाढ पहावयास मिळाली आहे.गतवर्षी १०००१ टीसीएम जलसाठ्याची निर्मितीसन २०१७-१८ या जलयुक्त शिवार अभियानाच्या तिसºया टप्प्यात अंदाजपत्रकीय ५४० लक्ष रूपयांची २२३ कामे देऊळगाव, दवडीपार, नवेगाव बुज, जांभळापाणी, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ८ गावात करण्यात आली. या कामातून सुमारे १००१.३ टीसीएम जलसाठा तयार होण्यास मदत मिळाली. झालेल्या कामातून अंदाजे ९५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन होण्यास मदत मिळाली.२०१५-१६ मध्ये २७३९ हेक्टर सिंचन क्षेत्र वाढलेजलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सन २०१५-१६ मध्ये मोहाडी तालुक्यातील करडी, मोहगाव करडी, बोरी पांजरा, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा बुज, नरसिंगटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी, खैरलांजी आदी १५ गावात विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ३१२ कामे करण्यात आली. यावर सुमारे ९०१.६७७ लक्ष रूपयांचा खर्च करण्यात आला. यातून सुमारे ३४०४.६३४ टीसीएम जलसाठा तयार होवून २७३९.२४ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन निर्माण झाले.२०१६-१७ मध्ये १९०९ क्षेत्र सिंचन वाढलेसन २०१६-१७ मध्ये दुसºया टप्प्यात महालगाव, डोंगरगाव, हिवरा, चिचोली, आंधळगाव, पालडोंगरी, नवेगाव, धुसाळा, धोप, ताडगाव, जांब आदी १० गावांची निवड होवून ३३३ कामे करण्यात आली. याकामांवर सुमारे ५३२.४ लक्ष रूपये खर्च होवून सुमारे २२०६.३६ टीसीएम जलसाठा निर्माण होण्यास मदत मिळाली तर नवनिर्माणामुळे १९०१.६३ हेक्टर क्षेत्र सिंचनक्षम झाले.जलयुक्त शिवारमुळे शेतशिवार पाणीदार झाले. यावर्षी सप्टेंबरमध्ये धानाचे पीक फुलोºयावर असताना सुमारे २३ दिवस पावसाचा खंड पडल्याने याच पाण्याचा वापर शेतकºयांनी डिझेल इंजिनचा वापर करून केला. तसेच तलावाचे गेट सुरू करून शेतीचा दुष्काळ संपविला. यावर्षी धानाचे हेक्टरी उत्पादन वाढणार आहे.-निशिकांत इलमे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षजलयुक्त शिवार योजनेमुळे तीन वर्षात ३३ गावातील एका पाण्याचा दुष्काळ संपला. खरीपातील धानाची व ऊसाची शेती बहरली असून उर्वरित पाण्याचा उपयोग रब्बीच्या पिकासाठी होणार आहे.-निमचंद्र चांदेवार, मंडळ कृषी अधिकारी, मोहाडी