शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

हातपंप व विहिरीवर वाढली गर्दी

By admin | Updated: May 20, 2017 00:55 IST

भीषण उष्णता आणि गावात असलेली पाणी टंचाईमुळे गावात आरो पाण्याची मागणीत कमालीची वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वरठी : भीषण उष्णता आणि गावात असलेली पाणी टंचाईमुळे गावात आरो पाण्याची मागणीत कमालीची वाढ झाली आहे. गावात असलेल्या सार्वजनिक व खासगी विहिरी यासह हातपंपावर गर्दी वाढली आहे. मुबलक प्रमाणात घरीच पाणी उपलब्ध होत असल्यामुळे कधीही घराबाहेर न पडणाऱ्या महिला, पुरुष आणि बच्चे कंपनी आता हातात गुंड घेऊन घराबाहेर पडताना दिसतात आहेत. मिळेल त्या साधनाने पाणी एकत्र करण्याबरोबर घराघरात आरोचे पाणी विकत घेण्याची परंपरा दिसत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून भीषण उष्णतेचा काळ सुरू आहे. सकाळपासूनच रस्ते निर्मनुष्य होतात. अशा परिस्थितीत पाण्याविना राहणे कठीणच. त्यातल्यात्यात नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे गावात पाणी टंचाई मुळे गावकरी संकटात सापडला आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सर्व स्तरावरून आपापल्या सोयीने मार्ग काढणे सुरू आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आरो पाणी उत्तम पर्याय ठरत आहे. या पाण्यामुळे गावात सरळ घरी शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे. निदान पिण्यासाठी पाणी मिळाले तर उर्वरित कामासाठी विहीर किंवा हातपंपाचे पाण्याने काम भागते असा समज रुजत आहे. एकंदरीत आरो चे घरपोच पाणी लोकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी उपयोगी पडत आहे. सध्या लग्नसराईची वेळ सुरू आहे. वरठी येथे ग्राम पंचायत मार्फत लग्न कार्यासाठी टँकरने पाणी पुरवठा होत असल्यामुळे आरामात पाण्याचे काम भागत होते. आता ही सेवा बंद झाल्यामुळे लग्न घरी चिंतेचे सावट आहे. आरो पाण्यामुळे पिण्याचा प्रश्न मिटू शकतो पण घरी इतर कामासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न उत्पन्न होत आहे. ज्यांच्याकडे विहिरी नाहीत त्यांना पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आरो पाणी वाटपात स्पर्धा वरठी येथे पाणी टंचाई असल्यामुळे भीषण संकट असल्याची माहिती सर्वदूर पोहचली आहे. यामुळे वरठी येथे आरो पाणी विकण्याच्या धंदा फर्मात आला आहे. सकाळपासून गावात आरो पाणी विकणाऱ्या वाहनांची गर्दी पहावयास मिळते. आरोचे शुद्ध पाणी विकणाऱ्या गर्दी वाढल्यामुळे गावात स्वस्त आणि सहज पाणी उपलब्ध होत आहे. हातपंपावर गर्दी गावात २५ सार्वजनिक विहीर आहेत. पण यापैकी चारच विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. त्याबरोबर २८ हातपंप असून यापैकी ६ नादुरुस्त आहेत. मोठ्या प्रमाणात इतर पाण्याचे स्रोत असूनही गावकरी चुकूनही या साधनाचा वापर करत नव्हते. पण गावात नळाला पाणी येणार नाही कळताच सार्वजनिक विहीर आणि हातपंपावर गर्दी वाढली आहे. मिळेल त्या साधनाने पाणी भरण्यासाठी रांगा वाढत असून. काहीजण सोईनुसार रात्री उशिरापर्यंत पाणी भरत असल्याचे दिसतात.