शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
3
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
4
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
5
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
6
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
7
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
8
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
9
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
10
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
11
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
12
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
13
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
14
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
15
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
16
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
18
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
19
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
20
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

वैनगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ, पाणी पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देनागनदीचे सांडपाणी । निरी म्हणते, पाण्याच्या संपर्कातील व्यक्तींवरही परिणामाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातून वाहनाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नागनदीतून येणाऱ्या सांडपाण्यामुळे दूषीत झाले असून गोसेखुर्द धरणामुळे साठवलेल्या पाण्यात जलवनस्पती व जलकिड्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नदीच्या पाण्यात गढूळपणा मोठ्या प्रमाणात वाढला असून वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यायोग्य नाही, असा अहवाल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) ने दिला आहे. मात्र त्यानंतरही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने शेती, मनुष्य आणि जनावरांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यातून विशालपात्र असलेली वैनगंगा नदी वाहते. बारमाही वाहणाºया या नदीवर गोसे येथे मोठे धरण आहे. मात्र अलिकडे नागपुरातील सांडपाणी नागनदीच्या द्वारे वैनगंगेत मिसळते. त्यामुळे वैनगंगेचे पाणी दूषीत झाले आहे. अलिकडे या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून प्रदूषणामुळे गढूळपणा वाढला आहे. तसेच ईकॉर्निया ही जलपर्नी वनस्पती आणि जलकिड्याचे प्रमाण वाढले आहे. दूषीत पाण्यात जीवानुचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आहे. त्यामुळे वैनगंगेचे पाणी शुद्धीकरण केल्याशिवाय पिण्यास अजिबात योग्य नाही, असा स्पष्ट अहवाल निरीने तयार केला आहे. निरीच्या वैज्ञानिकांनी जून २०१८ मध्ये गोसेखुर्द धरणाच्या परिसरातून नदीच्या पाण्याचे परीक्षण केले होते. त्यानुसार एकीकडे थांबलेल्या पाण्यावर ईकॉर्निया वनस्पतीचे प्रमाण वाढल्याने पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले तर दुसरीकडे नागनदीही या प्रदूषणात वाढ करीत आहे.वैनगंगेच्या तिरावरील शेतामध्ये सिंचनासाठी पाणी वापरले जाते. परंतु हे पाणी पिकांसाठी आणि या पाण्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठीही धोकादायक होण्याची भीती आहे. नदीच्या पाण्यातील पीएचस्तर, आम्लता, अ‍ॅसिडीटीचास्तर सामान्य आहे. शिवाय कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडीयम, पोटॅशियम आदी रासायनिकांचा स्तर सामान्य असून मॅग्निज वगळता जड धातूचे प्रमाणही नगन्य असल्याचा खुलासा या रिपोर्टमध्ये केला आहे. वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला दहा एनटीयु तर तळाशी १७ एनटीयु आहे. पाच एनटीयुचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वैनगंगा बचाव अभियान नागरी समितीचे नितीन तुमाने यांनी पुढाकार घेतला आहे.निरीच्या सूचनाऑरगॅनिक प्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रातील जलपर्नी वनस्पती काढणे गरजेचे आहे. पिण्यासाठी पाण्याचा वापर योग्य शुद्धीकरणानंतरच शक्य आहे. मॉयक्रोबिलियन प्रादूर्भावाचा धोका असल्याने सुरक्षित सिंचन प्रॅक्टीस आवश्यक आहे. नागनदीचे सांडपाणी वैनगंगेत सोडने, थांबविणे गरजेचे आहे.वैनगंगेच्या शुद्धीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्र्यासह पर्यावरण मंत्र्यांना पत्र देण्यात आले. परंतु समस्या कायम आहे. भंडारा जिल्ह्याचा हा वनवास केव्हा संपेल हा प्रश्न आहे.-मो.सईद शेख, संस्थापक अध्यक्ष, ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्था, भंडारा.

टॅग्स :riverनदी