शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाच्या सिंचन क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकरारनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून विलंब : १८०० हेक्टरवर सिंचित क्षेत्र होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानपिकाची रोवणी व सिंचनासाठी उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडण्यात आले असले तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे.सिहोरा परिसरात उजव्या कालव्यांतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धानपिकाच्या रोवणीसाठी वितरीत करण्यात येत आहे. रोटेशेन पद्धतीनुसार उजवा कालवा असल्याने पाणी वितरण करताना गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये येरली, नवेगाव, डोंगरगाव, दावेझरी, मोहगाव, मुरली, हरदोली, रुपेरा या गावांचा समावेश आहे. उन्हाळी धानपिकाकरिता पाटबंधारे विभागाचे नियोजन झाले असून १८०० हेक्टर आर सिंचित क्षेत्र पाटबंधारे विभागाकडून निर्धारीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतशिवारात रोवणीला सुरुवात केली आहे. डिमांडधारक शेतकऱ्यांना जमिनीचा सातबारा, उतारा आणि रक्कम मागविण्यात आली आहे. डिमांडची आगावू रक्कम जमा करण्याचे निर्देश देऊनही अद्याप अनेक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाही. नियोजित सिंचित क्षेत्रफळानुसार करारनामा करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी रोवणीची लगभग सुरु केली असली तरी करारनाम्यासाठी मात्र शेतकºयांची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाºयांची धावपळ होत आहे.अनेक कर्मचारी शेतकऱ्यांच्या घरी येऊन डिमांडसह करारनामे करण्यासाठी जनजागृती करीत आहेत. पाटबंधारे विभागाचे शेतकºयांकडे पाणीपट्टीकराचे ४ कोटी रुपयांचे थकबाकी आहे. त्यामुळे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. थकबाकीदार शेतकºयांची संख्या मोठी असल्याने कर्मचाऱ्यांवर वसुलीचा भार पडत आहे. .नियोजित हेक्टर आर क्षेत्रानुसार डिमांड धारक शेतकऱ्यांनी करारनामे केलेले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.-टी.डी. डिंकवार, स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक, सिहोरा.

टॅग्स :water shortageपाणीकपात