लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोना व्हायरसने भर घातली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोनदा भरणारे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठाशेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे शहरात भरत असणारा बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरला नसल्याने शेतकºयांच्या भाजीपालाचे नुकसान झालेले आहे.भाजीपाला विक्रीअभावी आर्थिक फटकाशहरात बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणांसह आठवडी बाजारावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काठणीवर आलेला भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक कमी वेळात कमी होणारा असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकºयांच्या पीकांचे मातीमोल होत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST
जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
ठळक मुद्देआठवडी बाजार बंद : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना