शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST

जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देआठवडी बाजार बंद : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी महापूर तर कधी कोरडा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे. अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोना व्हायरसने भर घातली आहे. कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरात आठवड्यातून दोनदा भरणारे आठवडी बाजार बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपली शेती करीत आहेत. या परिसरातील शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाच्या समावेश असल्याने टमाटर, वांगे, हिरवी मिरची, पालेभाज्या, फुलकोबी यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. वैनगंगा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठाशेजारील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केली आहे. कोरोनाच्या सावटामुळे शहरात भरत असणारा बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरला नसल्याने शेतकºयांच्या भाजीपालाचे नुकसान झालेले आहे.भाजीपाला विक्रीअभावी आर्थिक फटकाशहरात बुधवार व रविवार या दोन दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने शहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणत असतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणांसह आठवडी बाजारावर बंदी आणलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काठणीवर आलेला भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. भाजीपाला पीक कमी वेळात कमी होणारा असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकºयांच्या पीकांचे मातीमोल होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी