शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

खातेदारांची वाढ; बँक कर्मचाऱ्यांत कपात

By admin | Updated: June 28, 2014 23:26 IST

४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा

चुल्हाड (सिहोरा) : ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ, राष्ट्रीयकृत बँकात खाते उघडण्याचे शासनाचे धोरण, यामुळे सिहोरा गावात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाच्या अभावाने खातेदारांची कोंडी होत आहे. गावात बँकांच्या शाखा वाढविण्याची ओरड असताना सातत्याने दुर्लक्ष होत आहे.सिहोरा परिसरात अंदाजे पाऊण लक्ष लोकसंख्या आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने नागरिकांची वर्दळ याच गावात आहे. नागरिकांचा रोजचा संपर्क बँकेसोबत आहे. या बँकात दिसणारी गर्दी नाकीनऊ आणत आहे. परंतु नागरिकांचा नाईलाज आहे. सकाळपासून नागरिकांची गर्दी बँकाच्या दारावर दिसून येत आहे. मध्यंतरी लिंकफेल झाल्यास खातेदारांना चक्रावून सोडत आहे. यात दोष बँकेत कार्यरत कर्मचाऱ्यांचा नाही, व्यवस्थापनाचा आहे. नियोजनकर्त्यांचा आहे.बँकेत खातेदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासनाचे धोरण, योजनांची अंमलबजावणी, यामुळे एका व्यक्तीचे बँकेत ३-४ बचत खाते आहेत. या खात्याचा उपयोग योजनापुरताच आहे. नंतर मात्र राशीचा दुष्काळ आहे. एकच बचत खाता अन्य योजनांना जोडण्याचे धोरण शासन स्तरावर राबविण्यात येत नाही. यामुळे नागरिक भ्रमित आहेत. या गावात राष्ट्रीयकृत बँक आॅफ इंडिया ही एकमेव शाखा आहे. या शाखेत कर्मचारी अल्प आहेत. सुरुवातीपासून तितकेच टेबल आहेत. खातेदार वाढत असताना टेबल मात्र वाढले नाहीत. हेच खरे कारण आहे.खातेदारांची गर्दी बघून कर्मचाऱ्यांना रोज घाम फुटत आहे. परंतु कुणी गाऱ्हाणे ऐकणारे नाहीत. या बँकेत व्यावसायीक, विद्यार्थी, पेन्शनधारक, रोहयो, बचतगट तथा अन्य खातेदारांचा महापूर आहे. सकाळी ८ वाजेपासून खातेदार बँकेच्या दारावर तळ ठोकून उभे राहत असतात.अन्य बँकांची हीच अवस्था आहे. या बँकाच्या कामकाजात वाढ झाली आहे. वाढत्या कामाच्या व्यापाने विश्रांती घेणारी सुटी आता कर्मचाऱ्यांना दिसेनाशी झाली आहे. बँकांच्या बाबतीत सिहोरा परिसरावर अन्याय होत असल्याचे खुद्द कर्मचारीही ठासून सांगत आहेत. या त्रासदायक प्रश्नावर मात्र लोकप्रतिनिधी शांत आहेत. एरवी जनआंदोलनासाठी चर्चेत असलेल्या सिहोरा परिसरात मात्र बँकांच्या वाढीसाठी कधी आवाज निघाला नाही. यामुळे खातेदारांना कधी अच्छे दिन दिसणार किंवा नाही असा प्रश्न पडला आहे. तुमसरात बँकांचा पाऊस आहे. परंतु धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोऱ्यात मात्र बँकेच्या नव्या शाखेसाठी ओरड सुरू आहे. याकडे वरीष्ठांनी लक्ष द्यावे.(वार्ताहर)