शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

खरेदीच्या गडबडीत चिल्लरसाठी अडवणूक

By admin | Updated: October 26, 2016 00:44 IST

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीची गडबड सुरू असताना चिल्लर नाणी नसल्याच्या कारणावरून ग्राहकांची एकप्रकारे अडवणूक केली जात आहे.

बँकेत देवाण-घेवाण सुरू : गरज नसताना ग्राहकांना हजारोंचा भुर्दंडभंडारा : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीची गडबड सुरू असताना चिल्लर नाणी नसल्याच्या कारणावरून ग्राहकांची एकप्रकारे अडवणूक केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे या नोटेची देवाण-घेवाण पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिल्लर नाणी आणि पाच रूपयांसारख्या नोटांची वाईट अवस्था यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक-दोन रुपयांच्या कागदी नोटा यापूर्वीच बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकांनी नोटा परत घेऊन नाणे उपलब्ध करून दिल्याने काहीअंशी दिलासा मिळाला. परंतु सध्या पाच रूपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा सर्वांसाठी डोकेदुखी बनली आहे. व्यवहार करताना किरकोळ व्यापारी, हॉटेल, टपऱ्या, ठेले, दुकानदार, भाजी विक्रेते पाच रूपयांची नोट घेण्यासाठी सरळ नकार देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये वाहक पाच रूपयांची सुस्थितीत असलेली नोटही स्वीकारत नसल्यामुळे प्रवासात प्रवाशांची पंचायत होत आहे. नोट देवान-घेवानीवरून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अशा प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहे. शहरात प्रत्येक रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही भाजी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांकडून पाच रूपयांच्या नोटेऐवजी विक्रेते नाण्यांची मागणी करीत आहेत. बाजारात सुटे पैशांची चणचण असल्यामुळे ग्राहक-विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. एखाद्या ग्राहकांनी १५ रुपयांची खरेदी केल्यास विक्रेते २० रूपयांची नोट घेऊन उर्वरित पैसे परत देण्याऐवजी चॉकलेट ग्राहकांच्या माथी मारत आहेत. पाच रूपयांची नोट ग्राहकांकडे नसल्यास ग्राहकाने घेतलेला माल परत मागून अवमान केला जात आहे. यामुळे भाजी खरेदीसाठी गेलेल्या गृहिणी, वृद्घांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांना याविषयी विचारले तर आम्ही बँकेत जेव्हा पैसे जमा करण्यासाठी जातो, तेव्हा अधिकारी पाच रुपयांची नोट घेण्यासाठी नकार देतात. त्यामुळे आम्ही पाच रुपयांची नोट घेत नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. बँकेने नोट घेण्यासाठी अडवणूक करू नये, असे व्यापाऱ्यांचेही म्हणणे आहे. चलन नाकारणे हा रिझर्व्ह बँकेचा अपमान होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु काही ठिकाणी गैरसमजातून असे प्रकार घडताना दिसून येत आहे, अशा परिस्थितीत बँकांनीही वेळोवळी जनजागृती करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)