शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीच्या गडबडीत चिल्लरसाठी अडवणूक

By admin | Updated: October 26, 2016 00:44 IST

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीची गडबड सुरू असताना चिल्लर नाणी नसल्याच्या कारणावरून ग्राहकांची एकप्रकारे अडवणूक केली जात आहे.

बँकेत देवाण-घेवाण सुरू : गरज नसताना ग्राहकांना हजारोंचा भुर्दंडभंडारा : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीची गडबड सुरू असताना चिल्लर नाणी नसल्याच्या कारणावरून ग्राहकांची एकप्रकारे अडवणूक केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे या नोटेची देवाण-घेवाण पूर्णपणे ठप्प झाली आहे. चिल्लर नाणी आणि पाच रूपयांसारख्या नोटांची वाईट अवस्था यामुळे ग्राहक आणि व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. एक-दोन रुपयांच्या कागदी नोटा यापूर्वीच बाजारात दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकांनी नोटा परत घेऊन नाणे उपलब्ध करून दिल्याने काहीअंशी दिलासा मिळाला. परंतु सध्या पाच रूपयांची नोट चलनातून बाद झाल्याची अफवा सर्वांसाठी डोकेदुखी बनली आहे. व्यवहार करताना किरकोळ व्यापारी, हॉटेल, टपऱ्या, ठेले, दुकानदार, भाजी विक्रेते पाच रूपयांची नोट घेण्यासाठी सरळ नकार देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या एसटी गाड्यांमध्ये वाहक पाच रूपयांची सुस्थितीत असलेली नोटही स्वीकारत नसल्यामुळे प्रवासात प्रवाशांची पंचायत होत आहे. नोट देवान-घेवानीवरून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. अशा प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहे. शहरात प्रत्येक रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारातही भाजी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांकडून पाच रूपयांच्या नोटेऐवजी विक्रेते नाण्यांची मागणी करीत आहेत. बाजारात सुटे पैशांची चणचण असल्यामुळे ग्राहक-विक्रेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. एखाद्या ग्राहकांनी १५ रुपयांची खरेदी केल्यास विक्रेते २० रूपयांची नोट घेऊन उर्वरित पैसे परत देण्याऐवजी चॉकलेट ग्राहकांच्या माथी मारत आहेत. पाच रूपयांची नोट ग्राहकांकडे नसल्यास ग्राहकाने घेतलेला माल परत मागून अवमान केला जात आहे. यामुळे भाजी खरेदीसाठी गेलेल्या गृहिणी, वृद्घांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांना याविषयी विचारले तर आम्ही बँकेत जेव्हा पैसे जमा करण्यासाठी जातो, तेव्हा अधिकारी पाच रुपयांची नोट घेण्यासाठी नकार देतात. त्यामुळे आम्ही पाच रुपयांची नोट घेत नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. बँकेने नोट घेण्यासाठी अडवणूक करू नये, असे व्यापाऱ्यांचेही म्हणणे आहे. चलन नाकारणे हा रिझर्व्ह बँकेचा अपमान होऊन गुन्हा दाखल होऊ शकतो. परंतु काही ठिकाणी गैरसमजातून असे प्रकार घडताना दिसून येत आहे, अशा परिस्थितीत बँकांनीही वेळोवळी जनजागृती करणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)