शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शहरातील सिग्नल नावापुरतेच, यंत्रणेला लागली अखेरची घरघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. 

संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी भंडारा शहरातही सिग्नल व्यवस्था उभारली आहे. मात्र, हे सिग्नल केवळ नावालाच दिसून येत आहेत. भंडारा शहरातील नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, गांधी चौकात  सिग्नल यंत्रणा उभारली आहे. मात्र, हे सिग्नल अजूनही सुरू झालेले नाहीत. शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. वाहतूक पोलीस आपली महत्त्वाची भूमिका बजावितात. पण, सिग्नल व्यवस्था केवळ शोभेपुरतीच उरली असून, अजूनतरी धूळखात पडली आहे.

जिल्हा परिषद चौक

शहराचा वाढता विस्तार पाहता भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे येथे कार्यरत वाहतूक पोलिसांनाही अनेकदा चांगलीच कसरत करावी लागते. शिवाय, एखाद्या वाहनधारकावर कारवाई करत असताना दुसरे वाहनधारक अतिवेगाने धूम ठोकतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक येथील सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करण्याची गरज आहे. 

त्रिमूर्ती चौक 

संपूर्ण जिल्ह्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असलेला त्रिमूर्ती चौक भंडारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातच भंडारा पंचायत समितीसमोरील अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग व त्रिमूर्ती चौकातील रस्त्यालगत फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पाहता येथे भंडारा नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय, या महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद दिसत आहे. 

ना सिग्नल, ना वाहतूक पोलीस भंडारा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. मात्र, याठिकाणी ना सिग्नल दिसतात, ना वाहतूक पोलीस. येथे अनेकदा बीटीबीकडे जाणारी-येणारी वाहने व महामार्गावरील अतिवेगाने येणारी वाहने यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. हीच अवस्था भंडारा तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर दिसून येत आहे. थेट रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.

नियम तोडू नका, वाहतूक पाेलीस पाहताेय

१ भंडारा शहरातील सिग्नल सुरु नसले तरी शहरातील विविध चौकात वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई केली जाते. अतीवेगाने पाेलिसांची नजर चुकवून गेले तरी पाेलीस गाडीचा फाेटाे काढून कारवाई करतात.२ शहरातील सिग्नल सुरू झाले पाहिजे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका, राजीव गांधी, खाम तलाव चौकातील वाहतुकीची समस्या सुटू शकेल. यामुळे वाहतूक पाेलिसांनाही दिलासा मिळेल.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी