शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

सावित्रीबार्इंचे विचार आत्मसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:11 IST

मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे.

ठळक मुद्देराहुल डोंगरे यांचे प्रतिपादन: बोरी येथे समाजप्रबोधन कार्यक्रम

आॅनलाईन लोकमततुमसर : मोठ्या पदावरील भगिनी वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. हे आपल्या समाजाचे दु:ख आहे. तेव्हा अज्ञान न स्वीकारता विज्ञान स्वीकारावे. भारतीय स्त्रियांचा श्वास सावित्रीबाई ज्योतिबा फुले आहेत. मृतवत झालेल्या भारतीय स्त्रियाला नवसंजीवनी दिली. भारतीय स्त्रियांना सन्मान दिला. सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येकानी आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे राहुल डोंगरे यांनी प्रतिपादन केले.महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती बोरीच्या वतीने आयोजित समाजप्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सचिव बेरूरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सभापती कविता बनकर, माजी सभापती कुसुम कांबळे, सरपंच अविनाश उपरीकर, उपसरपंच अरविंद भेदे, माजी सरपंच नामदेव कांबळे, माजी सरपंच भाऊराव उपरीकर, सुगंधा राहूल डोंगरे, माजी सरपंच सुरेंद्र राऊत, ग्रा.पं. सदस्या अनिता कांबळे, लता कांबळे, रेशमा बोरकर, निशा धावडे, तंटामुक्ती अध्यक्ष रोशनलाल कांबळे, ललिता उपरीकर, सेवक उपरीकर, हसेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.राहूल डोंगरे म्हणाले, भारतात फुले दाम्पत्य जन्मास आले नसते तर शिक्षणाची गंगा समाजातील खालच्या वर्गापर्यंत पोहचली नसती आणि भारतीय समाजातील स्त्रीयांचे विश्व चूल आणि मूल एवढेच सीमित असते. पण आमच्या समाजातील स्त्रियांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या सामाजिक व शैक्षणिक चळवळीतील योगदानाची माहिती नाही. मोठ्या पदावर गेलेल्या व पगार घेणाºया भगिनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत न करता अंधश्रद्धेला बळी पडत असल्याचे दृश्य भारतीय समाजात दिसत आहे. देशाला आज सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची गरज निर्माण झाली आहे.प्रास्ताविक सरपंच अविनाश उपरीकर यांनी केले. गावाचा सर्वांगिण विकास हेच माझे ध्येय आहे, असे आवर्जून सांगितले. प्रा. सचिन वेरूळकर यांनी स्पर्धेच्या जगात टिकाव धरण्यासाठी आत्मविश्वास व चिकाटी हे गुण आत्मसात करा, असा संदेश देवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला. १० वी व १२ वीत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.हभप हिराजी पंचबुधे महाराज व हभप विक्की चन्ने महाराज धापेवाडा यांनी किर्तनातून समाजप्रबोधन केले. संचालन व आभार प्रदर्शन उत्तम नगरधने यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समिती, देवस्थान पंचकमेटी, ग्रा.पं. कमेटी जि.प. पूर्व माध्य शाळा, महात्मा ज्योतिबा फुले क्रिडामंडळ, पुरूष बचत गट, महिला बचत गट बोरी वासियांनी अथक परिश्रम घेतले.