शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

निधीअभावी पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 22:20 IST

तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देमौल्यवान वृक्ष असुरक्षित : इमारती कोसळण्याच्या मार्गावर

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाच्या हद्दीत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. या विश्रामगृहाच्या शेजारी असणारे सागवनाचे मौल्यवान वृक्ष असुरक्षित आहेत. विश्रामगृहाचा कायापालट करण्याची मागणी होत आहे.तुमसर - बपेरा राज्य मार्गावरील रनेरा गावाचे हद्दीत असणाऱ्या पाठबंधारे विभागाच्या विश्रामगृहाची जीर्ण झालेली अवस्था धोकादायक झाली आहे. या विश्रामगृहाचे आवाराला असणारे तारेचे सुरक्षा कवच पुर्णत: तुटले आहे. यामुळे विश्रामगृहाचे जागेतून रहदारी वाढली आहे. याच विश्रामगृहाचे आवारता सागवनाचे मौल्यवान वृक्ष आहेत. ही वृक्ष आता सुरक्षीत नाही. विश्रामगृहाचे स्वच्छतेकडे पाटबंधारे विभागाच्या यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. या विश्रामगृहात तिन इमारती आहे. या इमारती भंगारावस्थेत आहेत. विश्रामगृहात यंदा शेतकरी आणि पाटबंधारे विभागाचे यत्रणेमार्फत दोन बैठकी घेण्यात आलेल्या आहेत. चांदपूर जलाशयाचे सिंचनासाठी देण्यात येणाºया पाणी वाटपाचे प्रश्नावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कार्यकारी अभियंता चोपडे यांनी हजेरी लावली आहे. विश्राम गृहाचे समस्या त्यांनी अनुभवल्या आहेत. बैठकीचे निमित्ताने वर्षातून एक किंवा दोनदा या विश्रामगृहात पाटबंधारे विभागाची यंत्रणा हजेरी लावत आहे. यानंतर कुणी ढुंकून ही पाहत नाही. विश्रामगृहाचे देखभाल व दुरुस्तीकरिता स्वतंत्र नियोजन करण्यात येत नाही. अंदाजे अर्धा एकर जागेत असणाऱ्या या विश्रामगृहाचे शेजारी बगीचा तथा कायापालट करण्याचे ओरड आहे.विश्रामगृहाचे संदर्भात यंत्रणा सकारात्मक निर्णय घेत आहे. पंरतु शासन स्तरावर निधी उपलब्ध करण्यात येत नाही. याआधी विश्रामगृहाची सुरक्षा व स्वच्छता करण्यासाठी मजुर कामावर ठेवण्यात येत होते. पंरतु पाठबंधारे विभागात कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. रिक्त पदावर नियुक्त्या अडल्या असल्याने मनुष्य विरहीत विभागाकडे वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे. या विभागात पदे रिक्त असल्याने विश्रामगृहात कर्मचाºयांची नियुक्ती बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासन या विश्रामगृहाचे पुर्नजिवीत कडे गंभीर नाही. या राज्य मार्गावरुन शासनाची यंत्रणा धावत आहे. पंरतु विश्रामगृहाकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. सिहोरा गावात पाटबंधारे विभागाची मालमत्ता असून रनेरा गावात ही आहे.