शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाखनीच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: April 15, 2015 00:28 IST

लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : लाखनीवासीयांचे तहसीलदारांना निवेदनभंडारा : लाखनी येथील स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहेत. पाणी, स्वच्छता यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. समस्या सोडविण्यात याव्यात, या आशयाचे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी समस्यांचे निवेदन तहसिलदारांना दिले.लाखनी ग्रामपंचायतीचे लाखनी नगर पंचायतीत रूपांतर झाले. ज्याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. परंतु त्याचसोबत लाखनी नगरपंचायत समस्यांचे माहेरघर बनत चालली आहे.लाखनी ग्रामपंचायतीत कामावर असणाऱ्या सफाई कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. ज्यामुळे आज जवळपास दोन महिन्यांपासून लाखनी गावात नाल्यांची साफ सफाई झालेली नाही. सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य आहे. नाल्या तुडूंब भरून नाल्यांचा पाणी रस्त्यावर वाहत आहे. ज्यामुळे परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येवून विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. पथदिवे बंद असल्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो ज्यामुळे विशेषत: महिला व मुली भययुक्त वातावरणात वावरत आहेत. अनेक निर्जनस्थळी अंधार असल्यामुळे महिलांनी तेथून जाणे येणे बंद केलेले आहे. गावातील बोरवेल बंद असल्यामुळे महिलांना दूर दूरपर्यंत पिण्याच्या पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. दिवसभर काबाडकष्ट करून घरी येणाऱ्या महिलांना दूरवर जावून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शासकीय कामांसाठी लोकांना विविध दाखल्यांची आवश्यकता लागत आहे. परंतु कार्यालयात प्रशासक असल्यामुळे प्रत्येक दाखल्यांसाठी अर्ज मागत आहेत. इतकेच नव्हे तर ज्या दाखल्यांकरीता अर्जाची आवश्यकता नाही. रेकॉर्ड पाहूनही दाखले दिले जाऊ शकतात. अशा दाखल्यांकरीताही अर्ज मागविले जातात. अर्ज दिल्यानंतर २-३ दिवस लोकांना दाखले मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना नगर पंचायत कार्यालयाच्या २-३ दिवस वारंवार चकरा माराव्या लागत आहेत तरीही लोकांची कामे पूर्ण होत नाहीत. काही कर्मचारी परस्पर पैशाची देवाण घेवाण करून तात्काळ दाखले उपलब्ध करून देत आहेत.नगर पंचायतच्या गलथान व नियोजनशुन्य कारभारामुळे मागील २ महिन्यांपासून लाखनी गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मागण्या त्वरीत मंजूर करण्यात याव्यात अन्यथा तहसिल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. सर्व सफाई कामगारांना पूर्ववत कामावर बोलावण्यात यावे, बंद असलेले पथदिवे पूर्ववत सुरू करण्यात यावे, बंद असलेल्या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात यावी, साधा अर्ज घेवून त्वरीत दाखले देण्यात यावे, कार्यालयात लागणारे सर्व साहित्य कर्मचाऱ्यांना त्वरीत उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)