शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:39 IST

पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ : सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विंचू व सर्पदंशाच्या घटना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रमाणात घडत असतात. सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास व खबरदारी घेतल्यास संबंधिताचा जीव वाचू शकतो. याबाबत सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. विषारी सापाच्या दंशावर तातडीने उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होतो. विंचूदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असले, तरी यामुळे प्रचंड त्रास होतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू ओलावा व अडचण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. शहरी भागातील नागरिकांनी घर व परिसरात, शेतकऱ्यांनी शेतात अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्पतज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महिन्याभरात शेकडो लोकांना सर्पदंश• यावर्षी महिन्याभरात जिल्ह्यातील अनेक लोकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच गावठी उपचाराने काही जणांना जीवही गमवावा लागला.

विंचूदंशाच्या कित्येक घटना• शेतात व परिसरात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना विंचूदंश झाल्याच्याही कित्येक घटना घडल्याआहेत. जिल्ह्यात विचूदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत.

सर्वांत आधी काय कराल?• सर्पदंशानंतर : रुग्णास झोपू देऊ नये. दंश झालेली जागा सेलपट्टी किंवा कपड्याने झाकावी; जेणेकरून विषप्रतिरोधक मिळू शकते. तातडीने औषधोपचार करावा.

• विंचूदंशानंतर : विंचूदंश झाल्यावर तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन औषधोपचार करावा; जेणेकरून संबंधिताचा त्रास कमी होईल. गावठी उपचार करू नये..

तज्ज्ञ काय म्हणतात...पावसाळ्यात विषारी व बिनविषारी साप लोकवस्तीकडे येतात. साप घरात शिरू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. लोकवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना माहिती द्यावी.- योगेश पशीने, सर्पमित्र, भंडारा.

साप किवा विंचवाने दंश केल्यास वेळीच नजीकच्या आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे; जेणेकरून उपचार वेळेत होईल आणि प्राण वाचतील. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा