शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:39 IST

पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ : सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विंचू व सर्पदंशाच्या घटना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रमाणात घडत असतात. सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास व खबरदारी घेतल्यास संबंधिताचा जीव वाचू शकतो. याबाबत सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. विषारी सापाच्या दंशावर तातडीने उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होतो. विंचूदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असले, तरी यामुळे प्रचंड त्रास होतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू ओलावा व अडचण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. शहरी भागातील नागरिकांनी घर व परिसरात, शेतकऱ्यांनी शेतात अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्पतज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महिन्याभरात शेकडो लोकांना सर्पदंश• यावर्षी महिन्याभरात जिल्ह्यातील अनेक लोकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच गावठी उपचाराने काही जणांना जीवही गमवावा लागला.

विंचूदंशाच्या कित्येक घटना• शेतात व परिसरात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना विंचूदंश झाल्याच्याही कित्येक घटना घडल्याआहेत. जिल्ह्यात विचूदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत.

सर्वांत आधी काय कराल?• सर्पदंशानंतर : रुग्णास झोपू देऊ नये. दंश झालेली जागा सेलपट्टी किंवा कपड्याने झाकावी; जेणेकरून विषप्रतिरोधक मिळू शकते. तातडीने औषधोपचार करावा.

• विंचूदंशानंतर : विंचूदंश झाल्यावर तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन औषधोपचार करावा; जेणेकरून संबंधिताचा त्रास कमी होईल. गावठी उपचार करू नये..

तज्ज्ञ काय म्हणतात...पावसाळ्यात विषारी व बिनविषारी साप लोकवस्तीकडे येतात. साप घरात शिरू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. लोकवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना माहिती द्यावी.- योगेश पशीने, सर्पमित्र, भंडारा.

साप किवा विंचवाने दंश केल्यास वेळीच नजीकच्या आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे; जेणेकरून उपचार वेळेत होईल आणि प्राण वाचतील. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा