शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सर्पदंशानंतर खबरदारी घेतल्यास वाचू शकतो जीव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 16:39 IST

पावसाळ्यात घटनांमध्ये वाढ : सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्यात विंचू व सर्पदंशाच्या घटना ग्रामीण व शहरी भागात अधिक प्रमाणात घडत असतात. सर्पदंश, विंचूदंश झाल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास व खबरदारी घेतल्यास संबंधिताचा जीव वाचू शकतो. याबाबत सर्पमित्रांकडून जिल्ह्यात जनजागृती केली जाते. विषारी सापाच्या दंशावर तातडीने उपचार न झाल्यास माणसाचा मृत्यू होतो. विंचूदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण नगण्य असले, तरी यामुळे प्रचंड त्रास होतो.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू ओलावा व अडचण असलेल्या ठिकाणी प्रामुख्याने आढळून येतात. शहरी भागातील नागरिकांनी घर व परिसरात, शेतकऱ्यांनी शेतात अशा ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील सर्पतज्ज्ञांकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

महिन्याभरात शेकडो लोकांना सर्पदंश• यावर्षी महिन्याभरात जिल्ह्यातील अनेक लोकांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या. वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच गावठी उपचाराने काही जणांना जीवही गमवावा लागला.

विंचूदंशाच्या कित्येक घटना• शेतात व परिसरात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांना विंचूदंश झाल्याच्याही कित्येक घटना घडल्याआहेत. जिल्ह्यात विचूदंश व सर्पदंशाच्या घटना अधिक आहेत.

सर्वांत आधी काय कराल?• सर्पदंशानंतर : रुग्णास झोपू देऊ नये. दंश झालेली जागा सेलपट्टी किंवा कपड्याने झाकावी; जेणेकरून विषप्रतिरोधक मिळू शकते. तातडीने औषधोपचार करावा.

• विंचूदंशानंतर : विंचूदंश झाल्यावर तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेऊन औषधोपचार करावा; जेणेकरून संबंधिताचा त्रास कमी होईल. गावठी उपचार करू नये..

तज्ज्ञ काय म्हणतात...पावसाळ्यात विषारी व बिनविषारी साप लोकवस्तीकडे येतात. साप घरात शिरू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. लोकवस्तीत साप दिसल्यास सर्पमित्रांना माहिती द्यावी.- योगेश पशीने, सर्पमित्र, भंडारा.

साप किवा विंचवाने दंश केल्यास वेळीच नजीकच्या आरोग्य केंद्रात, तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात, उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे; जेणेकरून उपचार वेळेत होईल आणि प्राण वाचतील. - डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्यचिकित्सक, भंडारा. 

टॅग्स :bhandara-acभंडारा