शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मधमाश्यांचे पोळे नष्ट कराल तर होईल तुरुंगवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:19 IST

Bhandara : आग लावून, कीटकनाशक फवारून नष्ट कराल, तर बसेल जबर दंड !

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मधाच्या हव्यासापोटी व त्यातून दोन पैसे मिळतात, म्हणून मधमाश्यांच्या पोळ्याला आग लावून कीटकनाशक फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न होत असतो, मात्र हा प्रयत्न तुम्हाला महागात पडू शकतो. वन्यजीव संरक्षण अधिनियमामध्ये मधमाश्यांच्या संदर्भात उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो. आग लावून ते नष्ट करणे अयोग्य असून, तो कायद्याने गंभीर गुन्हा आहे.

निसर्गाच्या जीवनचक्रामध्ये मधमाश्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मधमाश्या परागीभवनाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परागीभवन, म्हणजे वनस्पतीमधील प्रजननाचा महत्त्वाचा भाग. परागीभवन झाले, तरच वनस्पती आपले बीज तयार करू शकतात.

मोहोळ अडचणीचे ठरल्यास जवळच्या मोहोळ होळणाऱ्या माहीतगार व्यक्तीला बोलावून त्याला उठून लावावे. एकदा दोनदा मोहळ उठून लावल्यानंतर ते पुन्हा त्या जागेवर येण्याचे टाळते. मधमाश्यांच्या परागीकरणावरच पिकांच्या उत्पादनात वाढ होते. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे अघोरीपणे नष्ट करणे कायद्याने गुन्हा ठरेल. 

"मधमाश्यांशिवाय वनस्पतीमधील परागीभवनाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. आइनस्टाईनच्या म्हणण्यानुसार पृथ्वीवरून मधमाश्या संपल्या, तर परागीभवन थांबेल आणि परागीभवन थांबले, तर वनस्पतीचे बीज तयार होणे थांबेल. सरळसरळ विचार केला, तर उत्पन्न घटेल. परिणामी, आपल्या अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन माणूस मधमाश्यांशिवाय फक्त चार वर्षे जगू शकेल."- प्रा. अशोक गायधने, कार्यवाह, ग्रीनफ्रेंड्स, लाखनी

"जर कोणी मधमाश्यांचे पोळे जाळले किंवा त्यावर औषध फवारून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर तो एक गंभीर गुन्हा आहे. या कृतीमुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच; पण मधमाशांही नष्ट होतात. शिवाय कायद्याचेही उल्लंघन होते. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये कलम २ (३१) मध्ये मधमाश्यांच्या पोळ्याच्या संदर्भात स्पष्ट उल्लेख असून, कलम ५०, ५१ नुसार तीन वर्षांचा तुरुंगवास किंवा २५ हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो." - नदीम खान, माजी मानद वन्यजीव रक्षक, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडारा