शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
"प्रत्येक सनातनीला माझा संदेश...", राकेश किशोर यांच्याजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली
4
आरोग्य विमा की मेडीक्लेम? गंभीर आजार, ओपीडी आणि मॅटर्निटी कव्हरेज कशात मिळते, दोन्हीत किती फरक?
5
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
6
सात युद्धे थांबवल्याचा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल नाहीच; कुणाला मिळाला 'शांतता पुरस्कार'
7
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
8
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
9
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
10
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
11
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
12
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
13
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
14
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
15
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
16
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
17
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
18
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
19
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
20
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?

रस्ता सुरक्षा जगण्याचा भाग झाल्यास अपघाताचे प्रमाण घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:54 IST

दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ, जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारला बहुउद्देशिय सभागृह पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस उपअधिक्षक बंडोपत बनसोडे, उपअभियंता धार्मिक, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडे, जनआक्रोश संस्था नागपूरचे अनिल नखाते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातात प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षीदार हे पोलीसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाही व एखाद्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीस कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जर अशी व्यक्ती ही स्वत:हून मोटार वाहन अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत असेल व स्वत:हून साक्षीदार बनण्यास तयार असेल तरच त्या व्यक्तीचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येईल. अशी व्यक्ती जबाब नोंदविण्यास तयार नसेल तर पोलीसांकडून दबाव आणला जाणार नाही. जबाब नोंदविण्यात तयार असलेल्या व्यक्तीस पोलीस तपासकरीता किंवा कोर्टात साक्षीकरीता बोलवावयाचे असल्यास केवळ एकच वेळ बोलविण्यात येईल. त्यास कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही यांची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मदत करणाºया नागरिकांना पारितोषिक देण्याची योजना परिवहन विभागाने सुरु करावी.मागील वर्षी जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण ४६२ वरुन ४१३ वर आले आहे. तर रस्ते अपघातात मृत्युची संख्या १६३ वरुन १५१ वर आली आहे. जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट असून या अपघात प्रवण स्थळाच्या दुरुस्तीचे काम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आरती देशपांडे यांनी केले तर आभार मोटार वाहन निरिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशांत झाडे, मोहन बोर्डे, गोरख शेलार, प्रमोद सरोदे, अनिल तांबडे, व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध संघटना, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.