शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा जगण्याचा भाग झाल्यास अपघाताचे प्रमाण घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:54 IST

दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ, जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारला बहुउद्देशिय सभागृह पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस उपअधिक्षक बंडोपत बनसोडे, उपअभियंता धार्मिक, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडे, जनआक्रोश संस्था नागपूरचे अनिल नखाते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातात प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षीदार हे पोलीसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाही व एखाद्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीस कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जर अशी व्यक्ती ही स्वत:हून मोटार वाहन अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत असेल व स्वत:हून साक्षीदार बनण्यास तयार असेल तरच त्या व्यक्तीचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येईल. अशी व्यक्ती जबाब नोंदविण्यास तयार नसेल तर पोलीसांकडून दबाव आणला जाणार नाही. जबाब नोंदविण्यात तयार असलेल्या व्यक्तीस पोलीस तपासकरीता किंवा कोर्टात साक्षीकरीता बोलवावयाचे असल्यास केवळ एकच वेळ बोलविण्यात येईल. त्यास कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही यांची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मदत करणाºया नागरिकांना पारितोषिक देण्याची योजना परिवहन विभागाने सुरु करावी.मागील वर्षी जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण ४६२ वरुन ४१३ वर आले आहे. तर रस्ते अपघातात मृत्युची संख्या १६३ वरुन १५१ वर आली आहे. जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट असून या अपघात प्रवण स्थळाच्या दुरुस्तीचे काम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आरती देशपांडे यांनी केले तर आभार मोटार वाहन निरिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशांत झाडे, मोहन बोर्डे, गोरख शेलार, प्रमोद सरोदे, अनिल तांबडे, व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध संघटना, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.