शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

रस्ता सुरक्षा जगण्याचा भाग झाल्यास अपघाताचे प्रमाण घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:54 IST

दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ, जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर आवश्यक आहे. मात्र आपण याकडे दुर्लक्ष करतो, यामुळे अपघात होतात. परिणामी मृत्यु ओढवू शकतो. रस्ता सुरक्षा आपल्या जगण्याचा भाग झाल्यास रस्त्यावरील अपघातात कमी येईल, असे मत जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने ३० वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह तथा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारला बहुउद्देशिय सभागृह पोलीस मुख्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस उपअधिक्षक बंडोपत बनसोडे, उपअभियंता धार्मिक, यंत्र अभियंता गजानन नागुलवार, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, पोलीस निरिक्षक बाळकृष्ण गाडे, जनआक्रोश संस्था नागपूरचे अनिल नखाते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दीप प्रज्वलन करुन रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ केला. मोटार वाहन अपघातात प्रत्यक्षदर्शी किंवा साक्षीदार हे पोलीसांचा ससेमीरा मागे लागू नये म्हणून अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अपघातातील जखमी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाही व एखाद्या व्यक्तीस आपला प्राण गमवावा लागतो. ही बाब लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने मदत करणाऱ्या व्यक्तीस कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जर अशी व्यक्ती ही स्वत:हून मोटार वाहन अपघातातील प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचे सांगत असेल व स्वत:हून साक्षीदार बनण्यास तयार असेल तरच त्या व्यक्तीचा जबाब साक्षीदार म्हणून नोंदविण्यात येईल. अशी व्यक्ती जबाब नोंदविण्यास तयार नसेल तर पोलीसांकडून दबाव आणला जाणार नाही. जबाब नोंदविण्यात तयार असलेल्या व्यक्तीस पोलीस तपासकरीता किंवा कोर्टात साक्षीकरीता बोलवावयाचे असल्यास केवळ एकच वेळ बोलविण्यात येईल. त्यास कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही यांची खबरदारी घेण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मदत करणाºया नागरिकांना पारितोषिक देण्याची योजना परिवहन विभागाने सुरु करावी.मागील वर्षी जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण ४६२ वरुन ४१३ वर आले आहे. तर रस्ते अपघातात मृत्युची संख्या १६३ वरुन १५१ वर आली आहे. जिल्ह्यात १८ ब्लॅकस्पॉट असून या अपघात प्रवण स्थळाच्या दुरुस्तीचे काम केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी प्रास्ताविकात दिली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन आरती देशपांडे यांनी केले तर आभार मोटार वाहन निरिक्षक प्रमोद सरोदे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशांत झाडे, मोहन बोर्डे, गोरख शेलार, प्रमोद सरोदे, अनिल तांबडे, व कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विविध संघटना, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.