शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
3
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
4
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
5
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
6
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
7
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
8
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
9
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
10
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
11
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
12
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
13
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
14
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
15
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
16
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
17
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
18
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
19
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
20
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

शेतात राबलो नाही तर रात्री चूल कशी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. आप्त स्वकियांच्या मृत्यूच्या वार्ताही धडकत आहे. संचारबंदीने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या संकटातही शेतात राबताना दिसत आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. रखरखत्या उन्हात मजूर धानाची कापणी करीत आहे. 

ठळक मुद्देशेतमजुरांची व्यथा : कोरोना संकटातही राबतात शेतशिवारात

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : संकट अस्मानी असो की सुलतानी. पोटासाठी घराबाहेर पडावेच लागते, शेतात राबावेच लागते. हातावर पोट असले, मजूर कोरोनाच्या सावटातही शेतशिवारात राबत आहेत. कोरोनाने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरून चालेल तरी कसे. शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात राबणाऱ्या मजुरांनी सांगितली. शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज रुग्ण आढळून येत आहेत. आप्त स्वकियांच्या मृत्यूच्या वार्ताही धडकत आहे. संचारबंदीने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या संकटातही शेतात राबताना दिसत आहे. सध्या शेतशिवारात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे. रखरखत्या उन्हात मजूर धानाची कापणी करीत आहे. कोरोना नियमांचे पालन आणि ताेंडाला मास्क लावून मजूर शेतात राबत आहेत. घरी असलेल्या चिल्यापिल्यांची चिंताही त्यांना सतावत आहे. आरोग्याची काळजी घेत भीतीच्या सावटात मजूर राबत आहे. गीताबाई राऊत म्हणाल्या, कोरोना असो की आणखी काही, आम्हाला राबल्याशिवाय पर्याय नाही. गरिबीपुढे कोरोनाचेही भय संपले आहे. शेतात राबलो नाही, तर आम्हाला उपाशीच राहावे लागेल. कोरोना झाला, तर सरकारी दवाखाना आहे, परंतु आम्हाला कोरोना होणारच नाही. आम्ही नियमाचे पालन करतो, असे त्या सांगत होत्या. रमेश ठवकर म्हणाले, कोरोना संकटाने आम्ही घाबरलो, तर उपाशीच राहावे लागेल. सरकारने मदतीचा हात दिला, पण त्यात कुटुंबाचा गाढा ओढायचा कसा, शेतात राबूनच दोन घास पोटात जातील. वर्षभर राबणे हेच आमच्या नशिबी असल्याचे रमेश सांगत होता. 

वीतभर पोटासाठी कोरोनाशी दोन हात  शेतीचा आधारच मजूर आहे. मजूर शेतात राबला नाही, तर शेतातील धान्य शेतकऱ्याच्या घरी पोहोचणार नाही. सध्या शेतशिवारात धान काढणीला आला आहे. कोरोनाच्या सावटात शेतकरी मजुरांकडून काम करून घेत आहे. संकट कोणतेही असो, वीतभर पोटासाठी सामना करावाच लागतो. शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहे, परंतु या योजनांचा लाभही अनेक मजुरांना मिळत नाही. शासन आणि प्रशासनाच्या योजना अशिक्षितपणामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरी