शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

समस्या असेल तर पोलीस ठाण्यात बिनधास्त जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे.

ठळक मुद्देवसंत जाधव : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश

n  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिक पोलीस ठाण्यात फिरायला येत नाही. कोणती तरी समस्या घेवूनच येतात. आपण प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना दिली असून प्रत्येकाचे गऱ्हाने ऐकून घेतले जाते. नागरिकांनी कोणतीही समस्या असेल तर बिनधास्त पोलीस ठाण्यात जावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे. गावठी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. आपण रूजू झालो तेव्हापासून ७५ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नागरिकांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक ठाणेदाराला आपण सूचना दिली आहे. ठाणेदार समस्या ऐकून घेत नसेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे जावे परंतु तेथेही समाधान होत नसेल तर थेट आपल्याकडे यावे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. लवकरच जिल्ह्यातील गुन्हेगारांचा बिमोड करून शांतताप्रीय भंडारा जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करून शांतता प्रस्थापित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.

रेतीतस्करी रोखण्यासाठी पथकभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचे खरे काम महसूल  प्रशासन आणि खनिकर्म विभागाचे आहे. पोलीस त्यांना संरक्षण देवून सहकार्य करते. यासाठी जिल्ह्यात पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

भंडारातील वाहतूक समस्या सुरळीत होईल भंडारा शहरासह जिल्ह्यातील वाहतूक समस्येवर कायम तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावयाच्या याच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Policeपोलिस