शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

समस्या असेल तर पोलीस ठाण्यात बिनधास्त जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे.

ठळक मुद्देवसंत जाधव : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात यश

n  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागरिक पोलीस ठाण्यात फिरायला येत नाही. कोणती तरी समस्या घेवूनच येतात. आपण प्रत्येक पोलीस ठाण्याला सूचना दिली असून प्रत्येकाचे गऱ्हाने ऐकून घेतले जाते. नागरिकांनी कोणतीही समस्या असेल तर बिनधास्त पोलीस ठाण्यात जावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून वसंत जाधव यांनी सुत्र हाती घेतल्यानंतर पोलीस दलाचा चेहरा मोहरा बदलविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबादीत राखण्यासाठी त्यांनी पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहे. सक्षम परंतु साईड ब्राँचला असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी महत्वाच्या ठिकाणी बसविले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत बोलताना पोलीस अधीक्षक जाधव म्हणाले, जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आहे. अलीकडे घरफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहे. गावठी दारू अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे. आपण रूजू झालो तेव्हापासून ७५ लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली. नागरिकांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक ठाणेदाराला आपण सूचना दिली आहे. ठाणेदार समस्या ऐकून घेत नसेल तर उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे जावे परंतु तेथेही समाधान होत नसेल तर थेट आपल्याकडे यावे, असे पोलीस अधीक्षक म्हणाले. महिला, लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याला आपण प्राधान्य दिले आहे. लवकरच जिल्ह्यातील गुन्हेगारांचा बिमोड करून शांतताप्रीय भंडारा जिल्ह्याच्या नावलौकीकात भर घालू, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करून शांतता प्रस्थापित करण्यावर आपला भर राहणार असल्याचे ते म्हणाले.

रेतीतस्करी रोखण्यासाठी पथकभंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्याचे खरे काम महसूल  प्रशासन आणि खनिकर्म विभागाचे आहे. पोलीस त्यांना संरक्षण देवून सहकार्य करते. यासाठी जिल्ह्यात पोलीस पथक नियुक्त करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

भंडारातील वाहतूक समस्या सुरळीत होईल भंडारा शहरासह जिल्ह्यातील वाहतूक समस्येवर कायम तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी काय उपाययोजना करावयाच्या याच्या सूचना दिल्यात.

टॅग्स :Policeपोलिस