शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शासन साखर देणार नाही तर गोड खिचडीचे फर्मानच कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:20 IST

Bhandara : सरकारी गोड खिचडीत साखर पालकांची!

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, २८ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाने पोषण आहाराच्या मेनूमध्ये बदल केले.

यात गोड खिचडीसाठी लागणाऱ्या साखरेसाठी शासनाकडून निधी दिला जाणार नाही, असे स्पष्ट मत नमूद आहे. आता या गोड खिचडीसाठी पालकांना साखर मागितली जाणार आहे. ही साखर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून गोळा करावी लागणार आहे.

साखर पालकांनाच द्यावी लागणारनव्या निर्णयानुसार खिचडीसाठी साखर शासन उपलब्ध करून देणार नाही. परिणामी, ही साखर पालकांना द्यावी लागणार आहे. याचा भुर्दंड पालकांवर बसणार आहे.

मेनूमध्ये नवनवीन बदलपोषण आहाराच्या मेनूमध्ये नवनवीन अन्नपदार्थांचा समावेश करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. सामान्यतः परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना ठरलेल्या अन्नाची आवड झालेली असते. त्यामुळे ते नवीन बदल स्वीकारित नाही. त्यामुळे आता बालकांना खिचडी आवडेल का? हा प्रश्न आहे.

खिचडी बनविणे ठरणार हास्यास्पदस्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. बरेच पालक दररोज उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात, अशा परिस्थितीत साखर गोळा करून गोड खिचडी बनविणे हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे. शासनाने निर्णय घेतला तर त्यानुसार साखरेचाही पुरवठा करायला हवा होता, असा सूरही ऐकावयास मिळत आहे; पण शासन निर्णयात ही बाब नाहीच. आता शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने साखर गोळा करावी लागणार आहे.

साखर मागा नाही तर खिशातून पैसे टाकाखिचडी शिजविण्यासाठी पालकांकडे साखर मागावी लागणार आहे. मिळाली नाही तर मुख्याध्यापक व शिक्षकांना खिशातून पैसे द्यावे लागतील.

"शासनाने निर्णय घेतला तर साखरेचाही पुरवठा करायला हवा होता. पोषण आहारातील पूरक अन्नपुरवठ्यासाठी शासनाने आधीच तरतूद केली आहे. पण साखर गोळा करण्याचे काम ही आता करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करायचे की नाही, असे झाले आहे."- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराzp schoolजिल्हा परिषद शाळा