शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शासन साखर देणार नाही तर गोड खिचडीचे फर्मानच कशाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:20 IST

Bhandara : सरकारी गोड खिचडीत साखर पालकांची!

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, २८ जानेवारी २०२५ रोजी राज्य शासनाने पोषण आहाराच्या मेनूमध्ये बदल केले.

यात गोड खिचडीसाठी लागणाऱ्या साखरेसाठी शासनाकडून निधी दिला जाणार नाही, असे स्पष्ट मत नमूद आहे. आता या गोड खिचडीसाठी पालकांना साखर मागितली जाणार आहे. ही साखर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकवर्गणीतून गोळा करावी लागणार आहे.

साखर पालकांनाच द्यावी लागणारनव्या निर्णयानुसार खिचडीसाठी साखर शासन उपलब्ध करून देणार नाही. परिणामी, ही साखर पालकांना द्यावी लागणार आहे. याचा भुर्दंड पालकांवर बसणार आहे.

मेनूमध्ये नवनवीन बदलपोषण आहाराच्या मेनूमध्ये नवनवीन अन्नपदार्थांचा समावेश करून विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. सामान्यतः परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांना ठरलेल्या अन्नाची आवड झालेली असते. त्यामुळे ते नवीन बदल स्वीकारित नाही. त्यामुळे आता बालकांना खिचडी आवडेल का? हा प्रश्न आहे.

खिचडी बनविणे ठरणार हास्यास्पदस्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. बरेच पालक दररोज उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करतात, अशा परिस्थितीत साखर गोळा करून गोड खिचडी बनविणे हास्यास्पद असल्याचे बोलले जात आहे. शासनाने निर्णय घेतला तर त्यानुसार साखरेचाही पुरवठा करायला हवा होता, असा सूरही ऐकावयास मिळत आहे; पण शासन निर्णयात ही बाब नाहीच. आता शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने साखर गोळा करावी लागणार आहे.

साखर मागा नाही तर खिशातून पैसे टाकाखिचडी शिजविण्यासाठी पालकांकडे साखर मागावी लागणार आहे. मिळाली नाही तर मुख्याध्यापक व शिक्षकांना खिशातून पैसे द्यावे लागतील.

"शासनाने निर्णय घेतला तर साखरेचाही पुरवठा करायला हवा होता. पोषण आहारातील पूरक अन्नपुरवठ्यासाठी शासनाने आधीच तरतूद केली आहे. पण साखर गोळा करण्याचे काम ही आता करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करायचे की नाही, असे झाले आहे."- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराzp schoolजिल्हा परिषद शाळा