शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुली नसतील तर समाज घडणार नाही

By admin | Updated: December 11, 2014 23:02 IST

मुली नसतील तर समाज घडणार नाही. मुली याच समाजाच्या जननी आहेत. त्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनातील अडचणीतून मार्ग काढण्यास शिक्षण हे उपयोगी ठरत असते.

भंडारा : मुली नसतील तर समाज घडणार नाही. मुली याच समाजाच्या जननी आहेत. त्यासाठी मुलींनी शिक्षण घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जीवनातील अडचणीतून मार्ग काढण्यास शिक्षण हे उपयोगी ठरत असते. म्हणून मुलीनी जास्तीत जास्त शिक्षणाच्या दृष्टीने पाऊल ठेवून समोर जाण्याचा प्रयत्न करावा असे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.जी. राठोड यांनी व्यक्त केले.भारत सरकारच्या माहिती व प्रसार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार निर्देशालयाच्या वतीने ४ दिवसीय विशेष जनजागृती अभियानाचे आयोजन भंडारा तालुक्यातील बेला, कारधा, टवेपार आणि सिल्ली येथे १२ डिसेंबर पर्यंत करण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून कारधा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पी.जी. बोलत होते. यावेळी अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, इलाहाबाद बँकेचे प्रबंधक संतोष तायडे, जि.प. पाणी व स्वच्छता विभागाचे आय. ई.सी. एक्सपर्ट राजेश्वर येरणे, महिला व बाल कल्याण विभागाचे संजय मेंढे, प्राचार्य हलमारे, मुख्याध्यापक अशोक वैद्य उपस्थित होते.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड म्हणाले, मुलींच्या जन्माचे स्वागत करुन समाजात मुलींना कायम दुय्यम स्थान देवू नये. त्यासोबत किशोरवयीन मुलींच्या संदर्भात बोलतांना मुलींच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता राहू नये, म्हणून लोहयुक्त गोळ्या देण्यात येतात. परंतु बऱ्याच मुली या गोळ्या खाण्याचे टाळतात. त्यासाठी शिक्षकांनी मुलींना गोळया नियमित घेण्याचा आग्रह करावा, असेही ते म्हणाले.इलाहाबाद बँकचे प्रबंधक संतोष तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून प्रसार माध्यमाद्वारे जन-धन योजनेची माहिती मिळाल्यास जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल. जन-धन योजनेचे महत्व पटवून देतांना १ लाखाचा अपघात विमा, ३० हजार रुपयांचा जीवन विमा, रुपये कार्ड याबाबत सांगून कर्ज सुविधेच्या संदर्भात सुध्दा मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांनी आपल्या बँकेच्या वतीने कारधा येथे शिबिर लावले होते. या शिबिरात २० लोकांनी अर्ज सादर केले व योजनेचा लाभ घेतला. राजेश्वर येरणे यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत माहिती देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. गावकऱ्यांनी मागदर्शन करुन ग्रामस्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच गावात घरोघरी शौच्छालये बांधण्याबाबत प्रोत्साहित करुन त्यापासून मिळणाऱ्या लाभाची माहिती दिली. कारध्याचे सरपंच शितल करंडे यांनी या अभियानाची प्रशंसा केली व शासनाद्वारे योजनांचा जनतेनी लाभ घेण्याकरिता पुढाकारांनी समोर यावे तरच गावाचा विकास होऊ शकेल, असे आवाहन केले. प्रश्न मंजुषा प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले. या प्रश्न मंजुषा कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. गावामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने युआयडी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात आधार कार्ड धारकांची नोंदणी ५० ग्रामस्थांनी केली. प्रास्ताविक बी.पी. रामटेके यांनी अभियानाचे महत्व सांगून फिल्मोत्सवाअंतर्गत बेला व कारधा येथे आज रात्री माहितीपट व चित्रपट दाखविण्यात येणार आहे त्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रारंभी ग्रामस्वच्छता रॅलीचा शुभारंभ सरपंच शितल करंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. या रॅलीत प्रकाश विद्यालय, काळे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, ग्रामस्थ यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी ग्रामस्वच्छतेची शपथ उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भालचंद्र रामटेके यांनी केले. या कार्यक्रमास क्षेत्रीय प्रचार कार्यालय भारत सरकार वर्धाचे संजय तिवारी, चंद्रपूरचे रामचंद्र सोनसल तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)