शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 16:58 IST

Bhandara : जिल्हाभरात आठ भरारी पथके गठीत; राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना

भंडारा : खरीप हंगाम तोंडावर येवून ठेवला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर सात व जिल्हास्तरावर एक असे आठ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे खरिपासाठी जमिनीची नागरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. याशिवाय उन्हाळी धान कापणीला तसेच मळणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. परंतु, अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतीची कामे सध्या रेंगाळत चालली आहेत. उन्हाळी कामे संपताच खरीपाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

...तर परवानाही होणार निलंबित

खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

प्रत्येक तालुक्यात एक पथक

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आदी ७ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रताणे सात भरारी पथकांचे गठण कृषी विभागाचे आदेशान्वये करण्यात आले आहे. यासोबतच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, वेळीच तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथक

तालुकास्तरावर सात भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शासनाचे सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाचा मोबाईल नंबरवर बियाणे, खते, किटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच किंवा इतर शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केल्यानंतर मिळालेले परिणाम लक्षात घेवून बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षीत आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यतापात्र कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे ७०५८२१७९७७ या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आठ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.- विराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी