शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दुकानांवर नजर; बोगस खते, बियाणे विकाल तर तुरुंगात जाल!

By युवराज गोमास | Updated: May 2, 2024 16:58 IST

Bhandara : जिल्हाभरात आठ भरारी पथके गठीत; राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना

भंडारा : खरीप हंगाम तोंडावर येवून ठेवला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते, कीटकनाशके, बियाण्यांमध्ये फसवणूक झाल्यास संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तीन वर्ष तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुकास्तरावर सात व जिल्हास्तरावर एक असे आठ भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे खरिपासाठी जमिनीची नागरटी करून शेत तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. याशिवाय उन्हाळी धान कापणीला तसेच मळणीला लवकरच प्रारंभ होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. परंतु, अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतीची कामे सध्या रेंगाळत चालली आहेत. उन्हाळी कामे संपताच खरीपाच्या कामाला प्रारंभ होणार आहे.

...तर परवानाही होणार निलंबित

खरीप हंगामात जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी बोगस बियाणे, खताची विक्री केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.बियाणे, खताची बोगस विक्री केल्याचे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करत परवानाही निलंबित केला जाऊ शकतो.

प्रत्येक तालुक्यात एक पथक

जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर आदी ७ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रताणे सात भरारी पथकांचे गठण कृषी विभागाचे आदेशान्वये करण्यात आले आहे. यासोबतच तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, वेळीच तक्रार प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.

जिल्हास्तरावर एक स्वतंत्र पथक

तालुकास्तरावर सात भरारी पथकांसह जिल्हास्तरावरही स्वतंत्र एक भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित

शासनाचे सूचनेनुसार जिल्हास्तरावर एक गुणनियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ७०५८२१७९७७ या क्रमांकाचा मोबाईल नंबरवर बियाणे, खते, किटकनाशके आदींच्या गुणवत्तेसाठी तक्रार करता येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांची खात्री करूनच किंवा इतर शेतकऱ्यांनी यापूर्वी लागवड केल्यानंतर मिळालेले परिणाम लक्षात घेवून बियाण्यांची खरेदी करणे अपेक्षीत आहे.

शेतकऱ्यांनी खते, बियाणे, कीटकनाशके मान्यतापात्र कृषी सेवा केंद्रातूनच खरेदी करावीत. तसेच खरेदी केलेल्या पावत्या जपून ठेवाव्यात. खते असोत वा बियाणे त्यांच्या पॅकिंगबाबतची माहिती वाचून घ्यावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाकडे ७०५८२१७९७७ या मोबाईल नंबरवर तक्रार करावी. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आठ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहे.- विराग देशमुख, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, भंडारा.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी