शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांचे आदर्श पुनर्वसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:45 IST

भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनील मेंढे, तहसीलदार संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, एनबीसीसीचे के.पी.एस.स्वामी व सरपंच उपस्थित होते.गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत मौजे पिंडकेपार ता. जि. भंडारा , पुनर्वसन गावठाण, बेला, मौजा सालेबर्डी, पुनर्वसन गावठाण शहापूर, मौजे करजखेडा, पुनर्वसन गावठाण गिरोला भिलेवाडी, मौजे टेकेपार, पुनर्वसन गावठाण चिरवहा या पुनर्वसनाचे भूमिपूजन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, नागरी सुविधांचा हा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. नागरी सुविधांची कामे एनबीसीसी या कंपनीमार्फत करण्यात येत असून ती गुणवत्ता पूर्ण असतील. ही कामे १२ महिन्यात पूर्ण करण्यात येतील. हे पुनर्वसन आदर्श असेल असे ते म्हणाले.आमदार फुके म्हणाले, या ठिकाणी २६० भूखंड विकसित करण्यात येणार आहे. त्यापैकी २२० लाभार्थ्यांना मिळतील. येथील नागरिकांची वाढीव दराने मोबदला देण्याची मागणी आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असून स्टे मिळाला नाही तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचे काम उत्तम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोसीखुर्दच्या पुनर्वसनासाठी शासनाने २५८ कोटी मंजूर केले असून पुनर्वसित गावांसाठी १८ सुविधा पुरविल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून विकासाच्या कामात सहकार्य दयावे, असे आवाहन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. ३४ बाधीत गावांपैकी २८ गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या चार गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. पुनर्वसनाचे काम दजेर्दार होईल, असा विश्वास व्यक्त केला.