शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गावांचे आदर्श पुनर्वसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:45 IST

भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनील मेंढे, तहसीलदार संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, एनबीसीसीचे के.पी.एस.स्वामी व सरपंच उपस्थित होते.गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत मौजे पिंडकेपार ता. जि. भंडारा , पुनर्वसन गावठाण, बेला, मौजा सालेबर्डी, पुनर्वसन गावठाण शहापूर, मौजे करजखेडा, पुनर्वसन गावठाण गिरोला भिलेवाडी, मौजे टेकेपार, पुनर्वसन गावठाण चिरवहा या पुनर्वसनाचे भूमिपूजन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, नागरी सुविधांचा हा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. नागरी सुविधांची कामे एनबीसीसी या कंपनीमार्फत करण्यात येत असून ती गुणवत्ता पूर्ण असतील. ही कामे १२ महिन्यात पूर्ण करण्यात येतील. हे पुनर्वसन आदर्श असेल असे ते म्हणाले.आमदार फुके म्हणाले, या ठिकाणी २६० भूखंड विकसित करण्यात येणार आहे. त्यापैकी २२० लाभार्थ्यांना मिळतील. येथील नागरिकांची वाढीव दराने मोबदला देण्याची मागणी आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असून स्टे मिळाला नाही तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचे काम उत्तम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोसीखुर्दच्या पुनर्वसनासाठी शासनाने २५८ कोटी मंजूर केले असून पुनर्वसित गावांसाठी १८ सुविधा पुरविल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून विकासाच्या कामात सहकार्य दयावे, असे आवाहन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. ३४ बाधीत गावांपैकी २८ गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या चार गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. पुनर्वसनाचे काम दजेर्दार होईल, असा विश्वास व्यक्त केला.