शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

‘त्या’ गावांचे आदर्श पुनर्वसन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 23:45 IST

भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा जिल्हयातील इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत पिंडकेपार, सालेबर्डी, गिरोला व टेकेपार या गावांचे पुनर्वसनाचे काम व नागरी सुविधा या आदर्श करण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. बेला येथे या गावांच्या पुनर्वसनाचा भूमिपूजन सोहळा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनील मेंढे, तहसीलदार संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे, एनबीसीसीचे के.पी.एस.स्वामी व सरपंच उपस्थित होते.गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत मौजे पिंडकेपार ता. जि. भंडारा , पुनर्वसन गावठाण, बेला, मौजा सालेबर्डी, पुनर्वसन गावठाण शहापूर, मौजे करजखेडा, पुनर्वसन गावठाण गिरोला भिलेवाडी, मौजे टेकेपार, पुनर्वसन गावठाण चिरवहा या पुनर्वसनाचे भूमिपूजन पालकमंत्री यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, नागरी सुविधांचा हा टप्पा पूर्ण करण्यात येत आहे. नागरी सुविधांची कामे एनबीसीसी या कंपनीमार्फत करण्यात येत असून ती गुणवत्ता पूर्ण असतील. ही कामे १२ महिन्यात पूर्ण करण्यात येतील. हे पुनर्वसन आदर्श असेल असे ते म्हणाले.आमदार फुके म्हणाले, या ठिकाणी २६० भूखंड विकसित करण्यात येणार आहे. त्यापैकी २२० लाभार्थ्यांना मिळतील. येथील नागरिकांची वाढीव दराने मोबदला देण्याची मागणी आहे. याबाबत ६ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असून स्टे मिळाला नाही तर ७ तारखेपासून मोबदला वितरणाचे काम करण्यात येणार आहे. पुनर्वसनाचे काम उत्तम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोसीखुर्दच्या पुनर्वसनासाठी शासनाने २५८ कोटी मंजूर केले असून पुनर्वसित गावांसाठी १८ सुविधा पुरविल्या जात आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द असून विकासाच्या कामात सहकार्य दयावे, असे आवाहन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले. ३४ बाधीत गावांपैकी २८ गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. या चार गावांचे पुनर्वसन झाले नव्हते. पुनर्वसनाचे काम दजेर्दार होईल, असा विश्वास व्यक्त केला.