शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

वेळेच्या संभ्रमामुळे शेकडो मतदार मुकले मतदानाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:39 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.

ठळक मुद्देघोळच घोळ : चूक कुणाची अधिकाऱ्यांची की मतदारांची

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.सोमवारला सकाळी ७ पासून मतदानाला प्रारंभ करण्यात आला. उष्णतेचा धसका घेत अनेक मतदार सकाळी किंवा सायंकाळच्या सुमरास मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. सकाळी ९ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ५.९८ एवढी होती. त्यामुळे मतदारांनी उन्हाची दाहकता कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी गेले. प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार वृत्तपत्रांमध्ये मतदानाची वेळ सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजतापासून मतदारांची गर्दी दिसून आली. सायंकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया बंद करण्यात आली. ६ च्या पूर्वीच बहुतांश मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी गर्दी केली असता मतदानाची वेळ संपल्याची सांगून मतदारांना परत पाठविण्यात आले.शहरातील संत शिवराम महाराज विद्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेट दिली असता अनेक मतदार प्रवेशद्वारासमोर उभे होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांची पोलिसांशी हुज्जत सुरु होती. त्यांनी हा प्रकार ‘लोकमत’ला सांगितला. त्यानंतर सदर प्रतिनिधीने मतदान केंद्र गाठले असता त्यांना त्यांना मतदान केंद्राबाहेर गर्दी दिसली. उपस्थित कर्मचाºयांना सांगूनही त्याचा काहीएक फायदा झाला नाही.त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त मतदारांनी परत जाण्याचे ठरविले. दरम्यान, तहसीलदार संजय पवार मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानापासून वंचित असलेल्या मतदारांनी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. मात्र त्यांना देखील वेळेसंबंधी संभ्रम असल्यामुळे मतदान केंद्रातील अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर कळवितो, असे सांगून ते मतदान केंद्रात गेले. तिथे अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून मशिन सिलबंद करण्यात आले आहे. मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजतापर्यंतच आहे, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा तहसीलदारांनी उपस्थित मतदारांना सांगितली. त्यामुळे निराश झालेल्या मतदारांनी मतदान न करताच घरची वाट धरली.