शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

वेळेच्या संभ्रमामुळे शेकडो मतदार मुकले मतदानाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:39 IST

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.

ठळक मुद्देघोळच घोळ : चूक कुणाची अधिकाऱ्यांची की मतदारांची

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांनाही मतदानापासून वंचित राहावे लागले.सोमवारला सकाळी ७ पासून मतदानाला प्रारंभ करण्यात आला. उष्णतेचा धसका घेत अनेक मतदार सकाळी किंवा सायंकाळच्या सुमरास मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. सकाळी ९ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ५.९८ एवढी होती. त्यामुळे मतदारांनी उन्हाची दाहकता कमी झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मतदान करण्यासाठी गेले. प्रशासनाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार वृत्तपत्रांमध्ये मतदानाची वेळ सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी ५.३० वाजतापासून मतदारांची गर्दी दिसून आली. सायंकाळी ६ वाजता मतदानाची प्रक्रिया बंद करण्यात आली. ६ च्या पूर्वीच बहुतांश मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अनेकांनी गर्दी केली असता मतदानाची वेळ संपल्याची सांगून मतदारांना परत पाठविण्यात आले.शहरातील संत शिवराम महाराज विद्यालयात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेट दिली असता अनेक मतदार प्रवेशद्वारासमोर उभे होते. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांची पोलिसांशी हुज्जत सुरु होती. त्यांनी हा प्रकार ‘लोकमत’ला सांगितला. त्यानंतर सदर प्रतिनिधीने मतदान केंद्र गाठले असता त्यांना त्यांना मतदान केंद्राबाहेर गर्दी दिसली. उपस्थित कर्मचाºयांना सांगूनही त्याचा काहीएक फायदा झाला नाही.त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकाºयांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त मतदारांनी परत जाण्याचे ठरविले. दरम्यान, तहसीलदार संजय पवार मतदान केंद्रावर पोहोचले. मतदानापासून वंचित असलेल्या मतदारांनी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. मात्र त्यांना देखील वेळेसंबंधी संभ्रम असल्यामुळे मतदान केंद्रातील अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर कळवितो, असे सांगून ते मतदान केंद्रात गेले. तिथे अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर त्यांना मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून मशिन सिलबंद करण्यात आले आहे. मतदानाची वेळ सायंकाळी ६ वाजतापर्यंतच आहे, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा तहसीलदारांनी उपस्थित मतदारांना सांगितली. त्यामुळे निराश झालेल्या मतदारांनी मतदान न करताच घरची वाट धरली.