शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तलाठी कार्यालय, सेतू केंद्रांवर शेकडो नागरिकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:03 IST

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना : सुविधांअभावी नागरिकांत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्य शासनाने नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्जाला सुरूवात झाली असून १५ जुलै अंतिम तिथी आहे. यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून धावपळ वाढली आहे. भंडारा शहरात मंगळवारी सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तर सेतू केंद्रात तहसीलदारांच्या उत्पन्न व डोमिसाईल प्रमाणपत्रासाठी शेकडो नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तासन् तास नागरिक रांगेत उभे होते. दरम्यान, कोणत्याही सुविधा प्रशासनाने न पुरविल्याने नागरिकांत संतापाचे वातावरण दिसून आले.

मंगळवारला तलाठी उत्पन्नाचा दाखला मिळविण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले तसेच सेतू केंद्रावरही नागरिकांच्या रांगा आणि तोबा गर्दीचे चित्र पाहावयास मिळाले. कार्यालयात जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.

सकाळी ८ वाजतापासूनच काही नागरिक दोन्ही कार्यालयांसमोर दिसून आले. अनेकांनी अन्न व पाण्यापासून ताटकळत माहिती दिली. अर्ज करण्याचा कालावधी कमी असल्याने गर्दी वाढल्याचे सांगण्यात आले. गर्दीचे चित्र दूरवरून दिसून येताच अनेकांनी काढता पाय घेतला. सायंकाळपर्यंत पुरुषांचीहीची अशी तोबा गर्दी दिसून आली. नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले. गैरसोयीचा सामनाही नागरिकांना करावा लागत असल्याचे दिसून आले.

१०० रुपयांच्या स्टॅम्पसंबंधी सूचना नाहीतअनेक महिलांचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरच्या नावात बदल असतात. त्यामुळे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार असल्याची चर्चा दिवसभर होती. मात्र, अशा प्रतिज्ञापत्रासाठी कोणत्याही सूचना नाहीत, अशी माहिती नायब तहसीलदार आनंद हट्टेवार यांनी दिली.

रात्री ११ पर्यंत सुरू होते तलाठी कार्यालययोजनेच्या पहिल्याच दिवशी सोमवारला भंडारा सिव्हील लाईन परिसरातील तलाठी कार्यालयासमोर महिला व पुरुषांची गर्दी होती. महिला चिमुकल्यांसह उपस्थित होत्या. महिलांच्या सोबतीला काहींची मुले तर काहींचे पती सुद्धा उपस्थित असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नागरिकांनी सोबत आणलेली वाहने रस्त्यावरच उभी केल्याने त्या भागातील वाहतूक प्रभावित झाली होती. रात्री ११ वाजतापर्यंत तलाठी कार्यालय सुरू होते, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

बहिणी म्हणतात...तलाठी मुख्यालयी रहावेही योजना आम्ही महिलांसाठी चांगली आहे. मात्र योजनेतील अटी व शर्तीमुळे धावपळ होत आहे. ग्रामीण भागातील तलाठ्यांना मुख्यालयी राहणे सक्त्तीचे केले जावे. तरच आमची रोजी बुडणार नाही.- ललिता देशमुख, भंडारा.

योजना बंद पडू नयेमुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हा महिलांना मासिक १५०० रुपयांची आर्थिक मदत मिळेल. हा मोठा आधारच होणार आहे. मात्र ही योजना मध्येच बंद पाडली जाऊ नये. तलाठी कार्यालय व सेतू केंद्रांवर पाणी उपलब्ध करावे. - स्वाती सेलोकर, भंडारा

योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ दिली जावीसध्या या योजनेसाठी १५ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. परंतु लाभासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी पुरेसा वेळ नाही. त्यामुळे मुदत वाढवावी.आरटीओ कार्यालयाशेजारील सेतू केंद्रात नागरिकांची अशी झुंबड उडाली.- लता बोरकर, भंडारा 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा