शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

अन् स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

By admin | Updated: January 25, 2016 00:42 IST

मनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली.

दोन तासात पालटले रुप जिल्हा प्रशासन, नगर पालिका ग्रीन माईण्ड्स संघटनेचा संयुक्त उपक्रमुुइंद्रपाल कटकवार  भंडारामनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली. स्वच्छता असली की, सुसंस्कृतपणा आपोआप येतो, ही कल्पना स्वच्छतेच्या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अस्वच्छता अवघ्या दोन तासात बाळगलेल्या जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनेने दुर केली.या स्वच्छता उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगरपालिकेचा स्वच्छता विभाग व ग्रीन माईण्ड्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी कार्याला हातभार लावला. सकाळी ९ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा समोरुन बाजूचे स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यात संजय एकापुरे यांच्या सहकार्याने मिळालेल्या जेसीबीच्या सहायाने रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ठिगारे काढण्यात आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील केरकचरा दीड तासात साफ केला. तसेच सुरक्षा भिंतीवर रंगरंगोटी करुन पाणी वाचवा - पाणी जिरवा, बेटी बचाओ - बेटी पढाओ, स्वच्छता ठेवा, झाडे वाचवा आदी नैसर्गिक संदेशही चित्राच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. यावेळी विकास मदनकर, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव, रवि नशिने, नितीन कुथे, विशाल गुल्हाणे, देवेंद्र गभणे, रंजित उजवणे, संध्या किरोलीकर, प्रतिमा काबरा, मयुर गायधने, विजया काबरा, इंद्रायणी वासनिक, जया काबरा, रिना पशिने, इंदिरा काबरा, संगीता चौधरी, दीपा काकडे, नीलिमा मैने, सुरेखा मडामे, साधना त्रिवेदी, परी पशिने, आर्या वासनिक यांच्यासह नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उपक्रमात उपस्थिती दर्शविली.जिल्हाधिकारी बंगल्यामागील अस्वच्छता कायमजिल्हाधिकारी कार्यालय परिसर आज शेकडो लोकांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी राहतात त्या शिवनेरी बंगल्यामागील अस्वच्छतेचा विळखा मागील कित्येक वर्षांपासून कायम आहे. बंगल्यामागील नाली व समोरील कचरा उचलण्यात आलेला नाही. वळणावर नादुरुस्त मुत्रीघर असून दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येकडेही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा संघटनेचे लक्ष जाणार काय?