शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
7
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
8
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
9
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
10
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
11
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
12
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
13
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
14
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
15
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
16
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
17
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
18
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
19
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
20
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो

अन् स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

By admin | Updated: January 25, 2016 00:42 IST

मनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली.

दोन तासात पालटले रुप जिल्हा प्रशासन, नगर पालिका ग्रीन माईण्ड्स संघटनेचा संयुक्त उपक्रमुुइंद्रपाल कटकवार  भंडारामनात जिद्द असले की, कुठलीही बाब अशक्य नाही, अशाच विचार सरणीला वेग देत आज रविवारी सकाळी शेकडो हातांची शक्ती स्वच्छता अभियानासाठी सरसावली. स्वच्छता असली की, सुसंस्कृतपणा आपोआप येतो, ही कल्पना स्वच्छतेच्या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अस्वच्छता अवघ्या दोन तासात बाळगलेल्या जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनेने दुर केली.या स्वच्छता उपक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, नगरपालिकेचा स्वच्छता विभाग व ग्रीन माईण्ड्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांनी कार्याला हातभार लावला. सकाळी ९ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसराचा समोरुन बाजूचे स्वच्छता करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. यात संजय एकापुरे यांच्या सहकार्याने मिळालेल्या जेसीबीच्या सहायाने रस्त्याच्या कडेला असलेले मातीचे ठिगारे काढण्यात आले. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील केरकचरा दीड तासात साफ केला. तसेच सुरक्षा भिंतीवर रंगरंगोटी करुन पाणी वाचवा - पाणी जिरवा, बेटी बचाओ - बेटी पढाओ, स्वच्छता ठेवा, झाडे वाचवा आदी नैसर्गिक संदेशही चित्राच्या माध्यमातून रेखाटण्यात आले. यावेळी विकास मदनकर, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव, रवि नशिने, नितीन कुथे, विशाल गुल्हाणे, देवेंद्र गभणे, रंजित उजवणे, संध्या किरोलीकर, प्रतिमा काबरा, मयुर गायधने, विजया काबरा, इंद्रायणी वासनिक, जया काबरा, रिना पशिने, इंदिरा काबरा, संगीता चौधरी, दीपा काकडे, नीलिमा मैने, सुरेखा मडामे, साधना त्रिवेदी, परी पशिने, आर्या वासनिक यांच्यासह नगर पालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उपक्रमात उपस्थिती दर्शविली.जिल्हाधिकारी बंगल्यामागील अस्वच्छता कायमजिल्हाधिकारी कार्यालय परिसर आज शेकडो लोकांच्या मदतीने स्वच्छ करण्यात आला. मात्र जिल्हाधिकारी राहतात त्या शिवनेरी बंगल्यामागील अस्वच्छतेचा विळखा मागील कित्येक वर्षांपासून कायम आहे. बंगल्यामागील नाली व समोरील कचरा उचलण्यात आलेला नाही. वळणावर नादुरुस्त मुत्रीघर असून दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येकडेही कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तथा संघटनेचे लक्ष जाणार काय?