शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

कशे करावे सातबारातून मृतकांचे नाव कमी? जिवंत सातबारा मोहिमेद्वारे घ्या लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:09 IST

गावागावांत चावडी वाचन : सातबारा अपडेट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतजमिनीचे वाद वाढत आहेत. खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर बनावट वारसदार दाखवून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले.

मृत खातेदारांच्या वारसांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची नावे सातबारावर नोंदवून घ्यावी, असे आवाहन मोहाडीच्या महसूल विभागाने केले आहे. आंधळगाव येथे समाधान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी माहिती दिली. मृत खातेदारांच्या वारसांना सहज, सुलभआणि तातडीने त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावे. या प्रक्रियेत कोणताही वादविवाद उद्भवू नये, हा मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. मृत खातेदारांच्या वारसांनी या मोहिमेचा लाभ घेणे गरजेचे आहे. ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार केला जाणार आहे.

मृत खातेदारांची यादीसर्व जिवंत व्यक्तींच्या नावांची सातबारावर नोंद केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत खातेदारांची माहिती तातडीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांना द्यावी. या माहितीच्या आधारे गावातील मृत खातेदारांची यादी तयार केली जाणार आहे.

५ एप्रिलपर्यंत चावडी वाचन होणारग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत १ ते ५ एप्रिल या पाच दिवसांत प्रत्येक गावात चावडी वाचन केले जाणार आहे. त्यानंतर ६ ते २० एप्रिल या काळात तलाठ्यांकडे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

फेरफारसाठी आवश्यक कागदपत्रेवारसासंबंधीचा मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वयंघोषणापत्र, पोलिस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा, आदी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा. 

महसूल अधिकारी करणार कागदपत्रांची पडताळणीग्राम महसूल अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करेल. तयार केल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेतील. त्यानुसार सातबारा दुरुस्त केला जाईल. सध्या १ एप्रिलपासून तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला आहे. २० एप्रिलपर्यंत तलाठ्यांकडे कागदपत्रे जमा करून यावर तोडगा काढण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा