शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

कशे करावे सातबारातून मृतकांचे नाव कमी? जिवंत सातबारा मोहिमेद्वारे घ्या लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:09 IST

गावागावांत चावडी वाचन : सातबारा अपडेट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतजमिनीचे वाद वाढत आहेत. खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर बनावट वारसदार दाखवून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले.

मृत खातेदारांच्या वारसांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची नावे सातबारावर नोंदवून घ्यावी, असे आवाहन मोहाडीच्या महसूल विभागाने केले आहे. आंधळगाव येथे समाधान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी माहिती दिली. मृत खातेदारांच्या वारसांना सहज, सुलभआणि तातडीने त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावे. या प्रक्रियेत कोणताही वादविवाद उद्भवू नये, हा मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. मृत खातेदारांच्या वारसांनी या मोहिमेचा लाभ घेणे गरजेचे आहे. ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार केला जाणार आहे.

मृत खातेदारांची यादीसर्व जिवंत व्यक्तींच्या नावांची सातबारावर नोंद केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत खातेदारांची माहिती तातडीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांना द्यावी. या माहितीच्या आधारे गावातील मृत खातेदारांची यादी तयार केली जाणार आहे.

५ एप्रिलपर्यंत चावडी वाचन होणारग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत १ ते ५ एप्रिल या पाच दिवसांत प्रत्येक गावात चावडी वाचन केले जाणार आहे. त्यानंतर ६ ते २० एप्रिल या काळात तलाठ्यांकडे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

फेरफारसाठी आवश्यक कागदपत्रेवारसासंबंधीचा मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वयंघोषणापत्र, पोलिस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा, आदी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा. 

महसूल अधिकारी करणार कागदपत्रांची पडताळणीग्राम महसूल अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करेल. तयार केल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेतील. त्यानुसार सातबारा दुरुस्त केला जाईल. सध्या १ एप्रिलपासून तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला आहे. २० एप्रिलपर्यंत तलाठ्यांकडे कागदपत्रे जमा करून यावर तोडगा काढण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा