शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

कशे करावे सातबारातून मृतकांचे नाव कमी? जिवंत सातबारा मोहिमेद्वारे घ्या लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:09 IST

गावागावांत चावडी वाचन : सातबारा अपडेट होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : शेतजमिनीचे वाद वाढत आहेत. खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर बनावट वारसदार दाखवून फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी केले.

मृत खातेदारांच्या वारसांनी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची नावे सातबारावर नोंदवून घ्यावी, असे आवाहन मोहाडीच्या महसूल विभागाने केले आहे. आंधळगाव येथे समाधान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांनी माहिती दिली. मृत खातेदारांच्या वारसांना सहज, सुलभआणि तातडीने त्यांच्या शेतजमिनीशी संबंधित अधिकार मिळावे. या प्रक्रियेत कोणताही वादविवाद उद्भवू नये, हा मोहिमेमागचा मुख्य उद्देश आहे. मृत खातेदारांच्या वारसांनी या मोहिमेचा लाभ घेणे गरजेचे आहे. ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार केला जाणार आहे.

मृत खातेदारांची यादीसर्व जिवंत व्यक्तींच्या नावांची सातबारावर नोंद केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी मृत खातेदारांची माहिती तातडीने ग्राम महसूल अधिकाऱ्यांना द्यावी. या माहितीच्या आधारे गावातील मृत खातेदारांची यादी तयार केली जाणार आहे.

५ एप्रिलपर्यंत चावडी वाचन होणारग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत १ ते ५ एप्रिल या पाच दिवसांत प्रत्येक गावात चावडी वाचन केले जाणार आहे. त्यानंतर ६ ते २० एप्रिल या काळात तलाठ्यांकडे कागदपत्रे द्यावी लागणार आहेत.

फेरफारसाठी आवश्यक कागदपत्रेवारसासंबंधीचा मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख, स्वयंघोषणापत्र, पोलिस पाटील, सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासबाबतचा पुरावा, आदी आवश्यक कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे सादर करावा. 

महसूल अधिकारी करणार कागदपत्रांची पडताळणीग्राम महसूल अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करेल आणि मंडळ अधिकाऱ्यांमार्फत वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करेल. तयार केल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफारवर निर्णय घेतील. त्यानुसार सातबारा दुरुस्त केला जाईल. सध्या १ एप्रिलपासून तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला आहे. २० एप्रिलपर्यंत तलाठ्यांकडे कागदपत्रे जमा करून यावर तोडगा काढण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा