शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

त्याच शेतकऱ्यांना पुन्हा पुराची मदत कशी? वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST

यादीतील घोळवरून प्रचंड रोष : शासनाच्या निधीची लूट की

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम झाले आहे. धरणातील पाण्याने सिहोरा परिसरातील शेती बुडीत गेली आहे. नदीचे काठ आणि नाल्याच्या लगत असणारी शेती बुडीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रति हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली, तरी पुन्हा याच शेतकऱ्यांची नावे जुलै ऑगस्ट महिन्याच्या पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, असे तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत शिरले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात आर्थिक मदत वळती केली जात आहे; परंतु अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने संतापले आहेत. 

धरणात पाणी अडविण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील नदीचे काठ आणि बुडीत नाल्याच्या लगत असणारे शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले. नाल्यापासून १०० मीटर अंतरावर शेती आणि बांधकाम प्रतिबंधित करण्यात आले आहे.

पूरग्रस्त अनुदानाचा पुन्हा लाभ कसा ?बुडीत शेतीत उत्पादन आणि पक्के बांधकाम करण्यास बंदी आहे. ही शेती उपसा सिंचन प्रकल्पासोबत करारबद्ध झाली आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या बुडीत शेतीला पुन्हा शासन स्तरावरून नुकसानभरपाई देता येत नाही.

एका शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याही यादीतयाशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असता, यादीत या करारबद्ध शेतीचा समावेश करता येत नाही. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत भलतेच चित्र अनुभवास आले आहे. जे शेतकरी करारबद्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले असताना, यादीत नावांचा समावेश करण्यात आला नाही, तर जे शेतकरी करारबद्ध करण्यात आले आहेत, त्यांची एक नव्हे अनेक नावे यादीत आली.

अतिवृष्टीग्रस्त अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेतगतवर्षी शेतीचे अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे मोठे नुकसान झाले. नदी व नालाकाठावरील शेतीतील पीके खरडून वाहून गेली. प्रकरणी पंचनामे करण्यात आले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

वांगी, पिंपरी चुंनी, परसवाडा, चुल्हाड, देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा या गावांतील शेतीचे सर्वेक्षण करीत करारबद्ध करण्यात आली आहे. परंतु, उत्पादन दन निरंक असताना नुकसान झालेच कसे, असा सवाल आहे.

"ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प सोबत करारबद्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना कुणाच्या आशीर्वादाने लॉटरी लागली आहे. यादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे."- डॉ. जितेंद्र तुरकर, तालुकाध्यक्ष, राकाँ (शरद पवार गट), तुमसर.

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा