शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

त्याच शेतकऱ्यांना पुन्हा पुराची मदत कशी? वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST

यादीतील घोळवरून प्रचंड रोष : शासनाच्या निधीची लूट की

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम झाले आहे. धरणातील पाण्याने सिहोरा परिसरातील शेती बुडीत गेली आहे. नदीचे काठ आणि नाल्याच्या लगत असणारी शेती बुडीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रति हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली, तरी पुन्हा याच शेतकऱ्यांची नावे जुलै ऑगस्ट महिन्याच्या पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, असे तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत शिरले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात आर्थिक मदत वळती केली जात आहे; परंतु अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने संतापले आहेत. 

धरणात पाणी अडविण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील नदीचे काठ आणि बुडीत नाल्याच्या लगत असणारे शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले. नाल्यापासून १०० मीटर अंतरावर शेती आणि बांधकाम प्रतिबंधित करण्यात आले आहे.

पूरग्रस्त अनुदानाचा पुन्हा लाभ कसा ?बुडीत शेतीत उत्पादन आणि पक्के बांधकाम करण्यास बंदी आहे. ही शेती उपसा सिंचन प्रकल्पासोबत करारबद्ध झाली आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या बुडीत शेतीला पुन्हा शासन स्तरावरून नुकसानभरपाई देता येत नाही.

एका शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याही यादीतयाशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असता, यादीत या करारबद्ध शेतीचा समावेश करता येत नाही. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत भलतेच चित्र अनुभवास आले आहे. जे शेतकरी करारबद्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले असताना, यादीत नावांचा समावेश करण्यात आला नाही, तर जे शेतकरी करारबद्ध करण्यात आले आहेत, त्यांची एक नव्हे अनेक नावे यादीत आली.

अतिवृष्टीग्रस्त अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेतगतवर्षी शेतीचे अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे मोठे नुकसान झाले. नदी व नालाकाठावरील शेतीतील पीके खरडून वाहून गेली. प्रकरणी पंचनामे करण्यात आले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

वांगी, पिंपरी चुंनी, परसवाडा, चुल्हाड, देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा या गावांतील शेतीचे सर्वेक्षण करीत करारबद्ध करण्यात आली आहे. परंतु, उत्पादन दन निरंक असताना नुकसान झालेच कसे, असा सवाल आहे.

"ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प सोबत करारबद्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना कुणाच्या आशीर्वादाने लॉटरी लागली आहे. यादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे."- डॉ. जितेंद्र तुरकर, तालुकाध्यक्ष, राकाँ (शरद पवार गट), तुमसर.

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा