शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

त्याच शेतकऱ्यांना पुन्हा पुराची मदत कशी? वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 14:17 IST

यादीतील घोळवरून प्रचंड रोष : शासनाच्या निधीची लूट की

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातून गेलेल्या वैनगंगा नदीवर धरणाचे बांधकाम करण्यात आले. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणाचे बांधकाम झाले आहे. धरणातील पाण्याने सिहोरा परिसरातील शेती बुडीत गेली आहे. नदीचे काठ आणि नाल्याच्या लगत असणारी शेती बुडीत क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रति हेक्टरी आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात आली असली, तरी पुन्हा याच शेतकऱ्यांची नावे जुलै ऑगस्ट महिन्याच्या पूरग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे वंचित पूरग्रस्त शेतकरी संतापले आहेत.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, असे तीनदा पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत शिरले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात आर्थिक मदत वळती केली जात आहे; परंतु अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे यादीत नसल्याने संतापले आहेत. 

धरणात पाणी अडविण्यात आल्यानंतर सिहोरा परिसरातील नदीचे काठ आणि बुडीत नाल्याच्या लगत असणारे शेतीचे सर्वेक्षण करण्यात आले. नाल्यापासून १०० मीटर अंतरावर शेती आणि बांधकाम प्रतिबंधित करण्यात आले आहे.

पूरग्रस्त अनुदानाचा पुन्हा लाभ कसा ?बुडीत शेतीत उत्पादन आणि पक्के बांधकाम करण्यास बंदी आहे. ही शेती उपसा सिंचन प्रकल्पासोबत करारबद्ध झाली आहे. धापेवाडा प्रकल्पाच्या बुडीत शेतीला पुन्हा शासन स्तरावरून नुकसानभरपाई देता येत नाही.

एका शेतकऱ्याचे नाव दुसऱ्याही यादीतयाशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असता, यादीत या करारबद्ध शेतीचा समावेश करता येत नाही. प्रसिद्ध करण्यात आलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत भलतेच चित्र अनुभवास आले आहे. जे शेतकरी करारबद्ध नाहीत, अशा शेतकऱ्यांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले असताना, यादीत नावांचा समावेश करण्यात आला नाही, तर जे शेतकरी करारबद्ध करण्यात आले आहेत, त्यांची एक नव्हे अनेक नावे यादीत आली.

अतिवृष्टीग्रस्त अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेतगतवर्षी शेतीचे अतिवृष्टी व पूरपरिस्थीतीमुळे मोठे नुकसान झाले. नदी व नालाकाठावरील शेतीतील पीके खरडून वाहून गेली. प्रकरणी पंचनामे करण्यात आले. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही.

वांगी, पिंपरी चुंनी, परसवाडा, चुल्हाड, देवरी देव, सुकळी नकुल, बपेरा या गावांतील शेतीचे सर्वेक्षण करीत करारबद्ध करण्यात आली आहे. परंतु, उत्पादन दन निरंक असताना नुकसान झालेच कसे, असा सवाल आहे.

"ज्यांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीतून वगळण्यात आले आहे. धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प सोबत करारबद्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना कुणाच्या आशीर्वादाने लॉटरी लागली आहे. यादीत मोठा घोळ करण्यात आला आहे. या याद्यांची चौकशी झाली पाहिजे."- डॉ. जितेंद्र तुरकर, तालुकाध्यक्ष, राकाँ (शरद पवार गट), तुमसर.

 

टॅग्स :farmingशेतीbhandara-acभंडारा