शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवसापासून कर्तव्य निभावणारे कृषी कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर कसे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:33 IST

कोरोना काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळांचे होणारे नुकसान तसेच भाजीपाल्याचा कुठेही तुटवडा भासू नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य ...

कोरोना काळात शेतकऱ्यांच्या भाजीपाला, फळांचे होणारे नुकसान तसेच भाजीपाल्याचा कुठेही तुटवडा भासू नये यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावले. या काळात कर्तव्य बजावताना ३५ कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून कोणतीच मदत मिळालेली नाही. यासाठी शासनाने ५० लाखांच्या विमा कवचासह कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेसह महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर राज्य राजपत्रित तांत्रिक कर्मचारी संघटनेने कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातही आजपर्यंत आठजणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ३५ कृषी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक अधिकारी, कर्मचारी आज कोरोना संसर्गाने बाधित झाले असून आज ते मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र, तरीही शासनाकडून कृषी कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय दिला जात नसल्याची ओरड आहे. त्यामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख सानुग्रह अनुदान तसेच अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी होत आहे. राज्यात आजपर्यंत ३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी विशेष लक्ष घालून कृषी कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.

बॉक्स

ट्रेझरी विभाग फ्रंटलाईन वर्कर कसा

जे शासकीय विभाग थेट लोकांच्या संपर्कात येतात त्यांना शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून ५० लाखांच्या विमा योजनेचा लाभ दिला आहे. यात पोलीस, आरोग्य, होमगार्ड, महसूल, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी इतकेच नव्हे, तर ट्रेझरी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांही फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश केला आहे, तर दुसरीकडे दररोज कृषी विभागाच्या कृषी सहायकांचा अनेक शेतकरी, स्थानिक पातळीवरील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागाचे स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांशी संपर्क येत असतानाही आजपर्यंत फ्रंटलाईन वर्कर नसल्याचे सांगितले जात आहेत. कोरोना काळात कृषी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याने सरकारवर टीका केली जात आहे.

कोट

जिल्ह्यात आतापर्यंत आठ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजही कृषी कर्मचारी कर्तव्य निभावत आहेत. मात्र, कृषी कर्मचाऱ्यांना लस द्यायला विलंब केला. शिवाय ५० लाख विमा याेजनेचा लाभ न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट आले आहे. दुसरीकडे फ्रंटलाईन वर्करमध्ये समावेश करून कृषी कर्मचाऱ्यांना विमा योजनेचा त्वरित लाभ दिला पाहिजे.

गोपाल मेश्राम, कोषाध्यक्ष, कृषी सहायक संघटना, भंडारा.

कोट

लाॅकडाॅऊन काळातील कृषी कर्मचारी खरे कोरोना योद्धे आहेत. राज्यात भाजीपाला, फळांचा कुठेही तुटवडा पडू नये यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कृषी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेवा निभावली. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्यांनी खऱ्या अर्थाने कोरोनातही कर्तव्य निभावले त्यांना शासनाने त्वरित न्याय द्यावा.

आनंद मोहतुरे, जिल्हाध्यक्ष, कृषी सहायक संघटना, भंडारा.