शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

कसे आहात, ठीक आहे, दोन शब्द आप्तांचे देतात कोरोना संकटात दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला.

ठळक मुद्देख्यालीखुशाली : महामारीच्या तांडवात समाजमन भयभीत, संकटाच्या काळात आप्त स्वकीयांमध्ये वाढला संवाद

ज्ञानेश्वर मुंदेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आज हा गेला, काल शेजारच्याचा मृत्यू झाला, तो आयसीयुमध्ये भरती आहे. अशा वार्ता चोहोबाजूंनी कानावर पडत आहेत. कसे आहात, ठीक आहे, हे आप्तस्वकीयांचे दोन शब्द कोरोना संकटात दिलासा देतात. कोरोना महामारीच्या तांडवाने समाजमन भयभीत झाले आहे. प्रत्येक जण एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला. कोरोना एवढा निष्ठुर की अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला जाणे दुरापास्त.  अशा या भयभीत वातावरणात स्वत:ची काळजी घेत आप्तस्वकीयांची ख्यालीखुशाली विचारली जात आहे. दररोज कुणाचा ना कुणाचा फोन येतो. कसे आहात एवढे दोन शब्द सुरुवातीलाच विचारले जाते. ठीक आहे, असे शब्द कानावर पडले की, दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. कुणी सर्दी, पडसे, ताप आहे असे सांगितले की, काळजीच्या स्वरात लवकर टेस्ट करून घे, दवाखान्यात जा, असा सल्ला देतात.  कुणी नातेवाईक रुग्णालयात दाखल असेल तर त्याची ख्यालीखुशाली विचारली जाते. अनाहूतपणे कुणाचा फोन आला तर दोन क्षण मनात चर्र होते. समोरचा काय सांगेल याची चिंता त्याचे दोन शब्द कानी पडेपर्यंत लागलेली असते. अशा वातावरणात आज प्रत्येक जण चिंतेत दिसत असून आप्तस्वकीयांच्या ख्यालीखुशालीने चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत कोरोना कधी संपेल, याची प्रतीक्षा करीत आहे.भंडारा जिल्ह्यात महिनाभर कोरोनाचे तांडव सुरू होते. अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. आजही अनेक जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. दुसरीकडे रुग्णालयात बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी अनेकांनी पायपीट केली आहे. अशा परिस्थितीतून जात असताना गत चार दिवसांपासून थोडा दिलासा मिळत आहे. रुग्ण संख्या घटत आहे. घटती रुग्ण संख्या पाहून समाधानाची लकेर चेहऱ्यावर उमटत आहे. या कोरोनाने एकमात्र केले आप्त स्वकीयांना संकटाच्या काळात एकत्र आणून संवाद वाढविला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या