शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कसे आहात, ठीक आहे, दोन शब्द आप्तांचे देतात दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:37 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे ...

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरत नाही तोच दुसरी लाट आली. एवढी भयानक की, मृत्यूचे तांडव सुरू झाले. स्मशानातही जागा मिळणे कठीण झाले. मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने अनेकांचे जिवलग हिरावले. कुणाचे सर्वस्व गेले. दररोज अप्रिय घटना कानावर पडत आहेत. आज त्याचा मृत्यू झाला, काल अगदी जवळचा मित्र गेला. कुणाचा पती तर कुणाचा वडील कोरोनाच्या करालदाढेत गेला. कोरोना एवढा निष्ठुर की अगदी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीच्याही अंत्यसंस्काराला जाणे दुरापास्त. अशा या भयभीत वातावरणात स्वत:ची काळजी घेत आप्तस्वकीयांची ख्यालीखुशाली विचारली जात आहे.

दररोज कुणाचा ना कुणाचा फोन येतो. कसे आहात एवढे दोन शब्द सुरुवातीलाच विचारले जाते. ठीक आहे, असे शब्द कानावर पडले की, दोघांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटतात. कुणी सर्दी, पडसे, ताप आहे असे सांगितले की, काळजीच्या स्वरात लवकर टेस्ट करून घे, दवाखान्यात जा, असा सल्ला देतात. कुणी नातेवाईक रुग्णालयात दाखल असेल तर त्याची ख्यालीखुशाली विचारली जाते. अनाहूतपणे कुणाचा फोन आला तर दोन क्षण मनात चर्र होते. समोरचा काय सांगेल याची चिंता त्याचे दोन शब्द कानी पडेपर्यंत लागलेली असते. अशा वातावरणात आज प्रत्येक जण चिंतेत दिसत असून आप्तस्वकीयांच्या ख्यालीखुशालीने चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणत कोरोना कधी संपेल, याची प्रतीक्षा करीत आहे.