शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचाही फटका : ग्राहकांच्या खिशाला कात्री, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाज्यांची आवक घटली

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्ग आणि वातावरण बदलाचा सरळसरळ फटका भाजीपाला पिकांवर बसला आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला महागला असून गृहीणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाली असताना भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने समस्येत भर पडली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली. त्यातच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतमालाच्या आयात-निर्यातीवर विपरीत परिणाम जाणवला.सध्या बाजारात कुठल्याही भाजीपाल्याची टंचाई नसली तरी दरवाढीने जनसामान्यांचे बजेट कोसळले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याचेही दिसून येते. येथील थोक सब्जी मंडीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवकही वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. कोरोनासंसर्ग, वातावरणातील बदल व मागणीच्या कारणामुळे भाज्यांचे दर वाढले आहे.सणासुदीचा काळजीवती म्हणजेच दीप पुजनापासून सणाला प्रारंभ होत असतो. विविध सणांच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याची तयारीही जोमात असते. अशावेळी भाजीपाल्यांचीही मागणी वाढत असते. सणासुदीचा काळ सुरू झालेला असून त्याला महगाईची झळ निश्चितपणे बसणार आहे, यात शंका नाही. वाढलेले दर कमी होणार काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.या कारणांमुळे भाज्यांचे भाव वाढलेतीन महिन्यांपूर्वी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊननंतर जिल्हाबाहेरील भाजीपाला जिल्ह्यात येण्यास अडचण निर्माण झाली. कोरोना संसर्गाचा सरळ सरळ फटकाही भाजीपाला उत्पादकांनाही बसला. थोड्या काळासाठी रहदारीचा प्रश्नही बिकट बनला.यावर्षी पावसाने सातत्यपणा दाखविला. प्रत्येकच महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला पिकांवर सक्रांत आली. काही ठिकाणी अपवाद वगळल्यास भाज्यांचा पुरवठा नियमित होता. परिणामी दोन महिन्यांपूर्वी दरवाढ दिसून आली नाही.कोरोना संकटात भाजीपाला बाजारपेठ बंद नसली तरी नागरिकांनी हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांची मागणी केली नाही. हळूहळू त्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण बदलाचा फटका दरवाढील कारणीभूत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्या