शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचाही फटका : ग्राहकांच्या खिशाला कात्री, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाज्यांची आवक घटली

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्ग आणि वातावरण बदलाचा सरळसरळ फटका भाजीपाला पिकांवर बसला आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला महागला असून गृहीणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाली असताना भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने समस्येत भर पडली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली. त्यातच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतमालाच्या आयात-निर्यातीवर विपरीत परिणाम जाणवला.सध्या बाजारात कुठल्याही भाजीपाल्याची टंचाई नसली तरी दरवाढीने जनसामान्यांचे बजेट कोसळले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याचेही दिसून येते. येथील थोक सब्जी मंडीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवकही वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. कोरोनासंसर्ग, वातावरणातील बदल व मागणीच्या कारणामुळे भाज्यांचे दर वाढले आहे.सणासुदीचा काळजीवती म्हणजेच दीप पुजनापासून सणाला प्रारंभ होत असतो. विविध सणांच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याची तयारीही जोमात असते. अशावेळी भाजीपाल्यांचीही मागणी वाढत असते. सणासुदीचा काळ सुरू झालेला असून त्याला महगाईची झळ निश्चितपणे बसणार आहे, यात शंका नाही. वाढलेले दर कमी होणार काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.या कारणांमुळे भाज्यांचे भाव वाढलेतीन महिन्यांपूर्वी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊननंतर जिल्हाबाहेरील भाजीपाला जिल्ह्यात येण्यास अडचण निर्माण झाली. कोरोना संसर्गाचा सरळ सरळ फटकाही भाजीपाला उत्पादकांनाही बसला. थोड्या काळासाठी रहदारीचा प्रश्नही बिकट बनला.यावर्षी पावसाने सातत्यपणा दाखविला. प्रत्येकच महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला पिकांवर सक्रांत आली. काही ठिकाणी अपवाद वगळल्यास भाज्यांचा पुरवठा नियमित होता. परिणामी दोन महिन्यांपूर्वी दरवाढ दिसून आली नाही.कोरोना संकटात भाजीपाला बाजारपेठ बंद नसली तरी नागरिकांनी हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांची मागणी केली नाही. हळूहळू त्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण बदलाचा फटका दरवाढील कारणीभूत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्या