शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
4
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
5
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
6
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
7
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
8
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
9
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
10
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
11
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
12
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
13
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
14
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
15
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
16
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
17
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
18
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
19
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
20
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ

भाजीपाल्यांच्या दराने बिघडले गृहीणींचे बजेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचाही फटका : ग्राहकांच्या खिशाला कात्री, मध्यप्रदेश, छत्तीसगढमधून भाज्यांची आवक घटली

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्ग आणि वातावरण बदलाचा सरळसरळ फटका भाजीपाला पिकांवर बसला आहे. सर्वच प्रकारचा भाजीपाला महागला असून गृहीणींचे आर्थिक बजेट बिघडले आहे. लॉकडाऊन काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाली असताना भाजीपाल्यांचे दर कडाडल्याने समस्येत भर पडली.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या प्रारंभी पिकांसह भाजीपाल्यांचीही लागवड केली. उत्पादन चांगले निघत असल्याने मे आणि जून महिन्यात बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक होत असली तरी मुबलक नव्हती. परिणामी भाजीपाल्यांचे दरही आवाक्यात होते. मात्र गत तीन आठवड्यांपासून ऊन-सावलीच्या खेळासह अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने भाजीपाल्याची वाढ खुंटली. त्यातच लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील शेतमालाच्या आयात-निर्यातीवर विपरीत परिणाम जाणवला.सध्या बाजारात कुठल्याही भाजीपाल्याची टंचाई नसली तरी दरवाढीने जनसामान्यांचे बजेट कोसळले आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातून भाज्यांची आवक कमी झाल्याचेही दिसून येते. येथील थोक सब्जी मंडीत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवकही वाढल्याचे दिसून येते. या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाही बसला आहे. कोरोनासंसर्ग, वातावरणातील बदल व मागणीच्या कारणामुळे भाज्यांचे दर वाढले आहे.सणासुदीचा काळजीवती म्हणजेच दीप पुजनापासून सणाला प्रारंभ होत असतो. विविध सणांच्या माध्यमातून पदार्थ बनविण्याची तयारीही जोमात असते. अशावेळी भाजीपाल्यांचीही मागणी वाढत असते. सणासुदीचा काळ सुरू झालेला असून त्याला महगाईची झळ निश्चितपणे बसणार आहे, यात शंका नाही. वाढलेले दर कमी होणार काय? असा प्रश्नही नागरिकांना पडला आहे.या कारणांमुळे भाज्यांचे भाव वाढलेतीन महिन्यांपूर्वी शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊननंतर जिल्हाबाहेरील भाजीपाला जिल्ह्यात येण्यास अडचण निर्माण झाली. कोरोना संसर्गाचा सरळ सरळ फटकाही भाजीपाला उत्पादकांनाही बसला. थोड्या काळासाठी रहदारीचा प्रश्नही बिकट बनला.यावर्षी पावसाने सातत्यपणा दाखविला. प्रत्येकच महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने भाजीपाला पिकांवर सक्रांत आली. काही ठिकाणी अपवाद वगळल्यास भाज्यांचा पुरवठा नियमित होता. परिणामी दोन महिन्यांपूर्वी दरवाढ दिसून आली नाही.कोरोना संकटात भाजीपाला बाजारपेठ बंद नसली तरी नागरिकांनी हव्या त्या प्रमाणात भाजीपाल्यांची मागणी केली नाही. हळूहळू त्यात वाढ दिसून आली. सध्या वातावरण बदलाचा फटका दरवाढील कारणीभूत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्या