शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

हुडहुडीने ग्रामीण भागात 'शेकोटी' पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 22:07 IST

आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने .....

ठळक मुद्देआबालवृद्ध त्रस्त : आजाराने रुग्णांच्या संख्येत वाढ, वातावरणाने पिकांना धोका

आॅनलाईन लोकमतआंधळगांव : आबालवृद्धांना थंडीचा त्रास तर गावात शेकोटीचा जोर. दोन महिने झाले हिवाळा सुरू होवून मात्र नवीन वर्ष लागताच थंडीचा जोर वाढल्याने आंधळगाव परिसरातील सर्व ग्रामीण भागात थंडीची हूडहूडी भरल्याचे चित्र दिसत आहेत, त्यामुळे गावे सुन्न होवून प्रत्येक घरी, चौकात शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे.ग्रामीण भागात रूम हिटरची व्यवस्था शुन्य असल्याने शेतकरी, मजूर व इतर गृहिणी हे घरी असणाºया सरपणाच्या काड्यांचा गठ्ठा तयार करून शेकोटीसाठी दुपारी शेत-शिवारात जावून जमा करतात. वातावरणाने १५ दिवसापासून आपले रंग बदलवून वेगळा ढगाळ वातावरण तयार केल्याने शेतकरी रब्बी पिकावर रोगाचा प्रादूर्भाव होईल. या चिंतेत होता. अगोदरच खरीप हंगामाच्या धान पिकाने शेतकºयांचे वेळेवर हातात येणारे धानपिक हिसकावून घेतले. सध्या मात्र आभाळ स्वच्छ होत असल्याने थंडी वाढू लागली आहे व अचानक चार-पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढल्याने पहाटे, रात्री तर दिवसभर थंडीचा गारवा वाढला आहे.हिवाळ्यात काही दिवस अशीच थंडी राहिली तर यावर्षी रब्बी पिक हंगाम चांगला राहिल, अशी आशा शेतकºयांना आहे. पिकासाठी सध्याची थंडी पोषक असल्याने तुर, चणा, हरभरा, मुंग, गहू या पिकांची चांगली आवक होईलही आशा शेतकऱ्यां ना आहे तर ही थंडी आबाल, वृद्धांना, लहान बालके, दमा रुग्ण, हड्डीजोड रुग्ण यांना घातक ठरू शकते. त्यामुळे बरेच आबालवृद्ध डॉक्टरांच्या दवाखान्यात ये-जा करताना दिसतात तर थंडी वाढल्याने कृषी केंद्रधारक रब्बी पिकासाठी रासायनिक खताची मागणी करीत आहेत तर जनता थंडीच्या बचावासाठी शेकोटीचा सहारा घेत आहेत.