शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

आपातग्रस्तांना घरकुलांचा प्रस्ताव नाही

By admin | Updated: November 8, 2014 22:33 IST

सिंदपुरी येथील २५ कुटुंब टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करीत आहेत. या आपातग्रस्त कुटुंबीयांना घरकूल देणारा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. या कुटुंबीयांना न्याय देणार कोण,

चुल्हाड (सिहोरा) : सिंदपुरी येथील २५ कुटुंब टिनाच्या शेडमध्ये वास्तव्य करीत आहेत. या आपातग्रस्त कुटुंबीयांना घरकूल देणारा प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. या कुटुंबीयांना न्याय देणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील पंचायत समिती क्षेत्र असलेल्या अडीच हजार लोकवस्तीच्या सिंदपुरी गावात ऐन पावसाळयात तलावाची पाळ फुटल्याने पाणी घरात शिरले होते. यात शासकीय नोंदीनुसार २५ कुटूंब बेघर असल्याचा आकडा दर्शविण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या पाण्याचा फटका अनेक घरांना बसला आहे. तत्कालीन परिस्थितीत शासन आणि सामाजिक संघटनांनी आपातग्रस्तांना मदत दिली आहे. त्यांचे आयुष्य पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील उद्योजकांच्या मदतीने आपातग्रस्तांना टिनाचे शेड देण्यात आले आहेत. या शेडमध्ये सुनीता चौधरी, भैयालाल वैद्य, तीर्थराज कोहळे, राजु कोहळे, मिताराम ठाकरे, मनिराम ठाकरे, विजय शहारे, कमला ठाकरे, नामदेव कलाकार, तुलसा देवारे, रामदास देवारे, चरण देवारे, तुकडू कोसरे, आशा नागोसे, वच्छल्ला तितिरमारे, धनराज कोहळे, जयानंद कोहळे, जगदीश कोहळे असे २५ कुटुंब वास्तव्य करीत आहेत. या आपातग्रस्तांना टिनाचे शेड देण्यात आले असले तरी शौचालय बांधण्यात आले नाही. गाव निर्मल ग्राम घोषित आहे. परंतु आपातग्रस्तांना ही सोय देण्यात आली नाही. यामुळे महिलांची कुचंबना होत आहे. या आपातग्रस्तांनी विजेची सोय केली आहे. गेल्या पाच महिन्यापासून आपातग्रस्तांना घरकूल प्राप्त करू न देण्यासाठी कोणत्याही विभागाने अद्याप पुढाकार घेतला नाही.यामुळे नागरिकांना न्याय मिळणार की नाही असा संशय बळावला आहे. आपातग्रस्ताच्या न्यायासाठी अद्याप ग्राम पंचायतला घरकूलसंदर्भात संबंधित विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. यामुळे कुटुंब या शेडमध्ये किती दिवस संसाराचा गाडा रेटणार आहेत. हे सांगता येत नाही. टिनाच्या शेडमध्ये सुविधा नसल्याने वास्तव्य करणारे कुटुंब भयभीत आहेत. त्यांच्या मुलाचे शिक्षण प्रभावित होत आहेत. एकाच खोलीत अनेकांचा संसार आहे. वास्तव्य करणारे बहुतांश शेतकरी असल्याने जनावरांचा प्रश्न भेडसावत आहे. कालांतराने टिनाचे शेड जीर्ण होणार आहेत. प्रशासन गंभीर नसल्याने आपातग्रस्तांच्या चिंता वाढलेल्या आहेत. लोकप्रतिनिधींनी आता या कुटुंबीयांकडे फिरविली आहे. या कालावधीत कुणी अधिकारी फिरकले नाहीत, अशी स्थिती या कुटुंबीयांची आहे. या कुटुंबीयांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असताना आशेचा किरण दाखविणारे मायबाप लोकप्रतिनिधी अदृश्य झाली असल्याने धाक धुकी वाढली आहे. गावकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. घरकुलांचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे. ग्राम पंचायत, पंचायत समिती तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा असा हा प्रवास आहे. या कुटुंबीयांना पुनर्वसनाचा पॅकेज दिला जाणार नाही, असे आधीच सांगण्यात आले आहे. यामुळे न्याय कुणाच्या दारात मागावे, या विवंचनेत कुटुंब आहेत. नैसर्गिक आपत्तीने कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. आता आधार देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. या कुटुंबीयांना आश्वासनाची खैरात नको, असा सूर कुटुंबीयात आहे. दिल्ली, मुंबई दरबार गाजविण्यासाठी लोकप्रतिनिधी आवाज बुलंद करण्याची गरज आहे. बोला, कोण पुढे येणार आहे. (वार्ताहर)