शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सिहोरात घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत. रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची जमवा जमव केल्यानंतर अनुदान प्राप्ती करिता विलंब होत असताना प्रचंड मनसताप सहन करण्याची वेळ या लाभार्थ्यावर येत आहे.

ठळक मुद्देअनेकांचे अर्धवट बांधकाम : रमाई आवास योजनेचा निधी अडला, लाभार्थ्यांची फरपट

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : रमाई आवास योजने अंतर्गत सिहोरा परिसरातील घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नसल्याने अर्धवट बांधकाम असणाऱ्या घरकुलातच लाभार्थ्यांना वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यात असंतोष पसरला आहे.सिहोरा परिसरातील प्रत्येक गावात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु गरीब, गरजु लाभार्थ्यांना योजने अंतर्गत हक्काचा निवारा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी या योजनेमुळे घरकुल लाभार्थी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. घरकुल योजनेत शासन स्तरावर प्रथम आणि द्वितीय हप्त्याची राशी जलद गतीने देण्यात येत आहे. यानंतर निधी देताना आखडला जात आहे.लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत.रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची जमवा जमव केल्यानंतर अनुदान प्राप्ती करिता विलंब होत असताना प्रचंड मनसताप सहन करण्याची वेळ या लाभार्थ्यावर येत आहे. लाकडाऊनपासून अनेकांना अनुदानाची राशी प्राप्त झालेली नाही. अनेक लाभार्थ्यांची अंतिम हप्त्याची अनुदान राशी थकीत आहे.या परिसरातील गावात अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे छत अर्धवट आहेत. ताडपत्रीचा आधार देवून त्याचे वाटचाल सुरू आहे. पावसाळ्यात या घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु घरकुलाचे पुर्णत्वाकरिता शासनाकडून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे गरीबाचे घरकुल स्वप्न भंगत होताना दिसून येत आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादूर्भाव वाढल्याने लाभार्थी गाºहाणे सांगण्याकरिता पंचायत समिती स्तरावर जावू शकत नाही. त्यांची व्यथा कुणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे न्याय मिळत नाही.गरीब आणि सामान्य जनतेला न्यायाकरिता पंचायत समितीत हेलपाटे मारावे लागत आहे. रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची राशी मिळाली नसल्याने डोळ्यात अश्रू येत आहेत. अर्धवट घरात आयुष्य घालवण्याची वेळ आली आहे. शासन स्तरावर दखल घेण्याची मागणी आहे.घरकुलांचा वाढता अनुशेषगोंडीटोला गावात गोवारी समाज बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेचा बोटावर मोजण्या इतपत लाभ मिळाला आहे. २०-२५ पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यांना न्याय देण्याकरिता सामाजक कार्यकर्ते किशोर रहांगडाले यांनी यापुर्वी पाठपुरावा केला आहे. गावात पडक्या घरात त्यांचे वास्तव्य असल्याचे जीवन जगने धोकादायक झाले आहे. यामुळे समाज बांधवात असंतोष आहे.रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते मिळाले नाही. घरकुलांचे बांधकाम अडले आहे. शासन स्तरावर तात्काळ अनुदान दिले पाहिजे.-किशोर रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता बिनाखी.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना