शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पवनीचा ऐतिहासिक दिवाण घाट मोजतोय अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 14:10 IST

भोसलेकालीन दिवाण घाट पवनी शहराचे वैभव आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. पर्यटन विकासाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची पाठ : देखभाल दुरुस्तीअभावी घाट खचलेल्या अवस्थेत

अशोक पारधी

भंडारा : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक नगरी पवनीत पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक स्थळे आहेत. धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पवनी शहरासह प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पालाही पर्यटक भेटी देतात. मात्र, पवनी शहरातील पर्यटन स्थळांची अवस्था पाहता, अनेकांचा भ्रमनिरास होतो. 

वैनगंगेच्या तीरावर अनेक घाट असून, यातील दिवाण घाट प्रसिद्ध आहे. मात्र, हा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असल्याने पर्यटकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. चिरेबंदी दगडात बांधलेल्या या घाटाला बुरूज आणि बुलंद दरवाजा आहे. परंतु आता या घटाचे वैभव नष्ट होऊ पाहत आहे. चिरेबंदी दगड उखडले असून बुरूजही ढासळले आहेत. 

पवनीनगराचे सभोवताल असलेल्या इंग्रजी यू आकाराचे प्राचीन मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला भोसलेकालीन पराकोट व जवाहर गेट, वैनगंगा नदी तीरावरील घाट, सुस्थितीत असलेले शेकडो मंदिर, उत्खननात सापडलेले बौद्ध स्तुपाचे अवशेष, गरुड खांब, इंदिरा सागर गोसीखुर्द धरण, उमरेड पवनी कऱ्हांडला अभयारण्य, रुयाळ सिंदपुरी येथील महासमाधीभूमी स्तूप असे कित्येक स्थळ पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यापैकी पवनीनगरातील प्राचीन वारसा असलेल्या स्थळांना विशेष महत्त्व आहे, परंतु लोकप्रतिनिधी व नगरपालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्राचीन वारसा नामशेष होण्याचे मार्गावर आहे.

प्रामुख्याने ३५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या घाटापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट पूर्णतः नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. नगराच्या उत्तर दिशेला वैनगंगा नदी तीरावर दिवाण घाट, पान खिडकी, ताराबाई घाट, वैजेश्वर घाट बांधलेले आहेत. चौकोनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आलेले आहे. आतापर्यंत नदीला आलेल्या महापुरामुळे घाटाची दुरवस्था झालेली आहे. लोकप्रतिनिधी, नगरपालिका प्रशासन व नगरसेवकांनी वैजेश्वर घाटाला विशेष महत्त्व देऊन पर्यटन विकास निधी वापरून घाटाला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले व भंडारा मार्गावरून ये-जा करणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या दिवाणघाटाच्या डागडुजीकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. दोन घाटाचा समूह असलेला दिवाण घाट आकर्षक आहे. त्यापैकी एक घाट पूर्णतः खचलेल्या स्थितीत आहे. दुसरा घाट व बुरुज ढासळत आहे. दखल न घेतल्यास चार-सहा महिन्यांत दिवाण घाट पूर्णतः ढासळलेले असेल.

प्राचीन वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न नाही

मकर संक्रांत, कार्तिक, हरतालिका व गणेशोत्सव अशा सणांचे वेळी भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने दिवाण घाटाकडे आकर्षित होतात, परंतु भग्नावस्था पाहून प्रशासनावर रोष व्यक्त करतात. नगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत अनावश्यक बांधकामावर कोट्यवधींचा निधी खर्च केला, परंतु प्राचीन वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत नाही. पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र शासनाने व पालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले पवनीनगर वैनगंगा नदी काठावरील घाट आणि शेकडो मंदिर, यामुळे विदर्भाची काशी म्हणून प्रख्यात आहे. ऐतिहासिक वारसा जतन करून, भावी पिढीला प्राचीन कलेचा संदेश देता यावा. पर्यटन विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल व युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, हा दृष्टिकोन ठेवून ऐतिहासिक वारसा जतन करावा, अशी माफक अपेक्षा आहे.

टॅग्स :Socialसामाजिकhistoryइतिहास