शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साडेतीनशे वर्षांचा दिवाणघाट इतिहासजमा हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 15:32 IST

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे, परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत.

ठळक मुद्देपवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

अशाेक पारधी

भंडारा : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी येथील वैनगंगेच्या तिरावर विविध घाट आहेत. यापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला हाेता. मात्र, आता हा घाट अखेरच्या घटका माेजत असून आजपर्यंत कधीही या घाटाची डागडुजीच करण्यात आली नाही.

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. पानखिडकी, ताराबाई, वैजेश्वर या घाटांसाेबतच दिवानघाट प्रसिद्ध आहे. साधारणत: तीनशे पन्नास वर्षांपूर्वी हा घाट बांधला. चाैकनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आले. परंतु नदीला आलेल्या महापुराने या घाटाची पूर्णता दुरवस्था झाली आहे.

पाैर्णिमा, हरितालिका, गणेशाेत्सव आदी सणांच्यावेळी दिवाणघाटावर माेठी गर्दी हाेते. परंतु येथील घाटाची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जाताे. घाटाचे बुरूज ढासळलेले असून केवळ एका ठिकाणाहून नदीपर्यंत पाेहोचता येताे. ताे कधी ढासळेल याची शाश्वती नाही. मासेमारी करणारे ढिवर बांधव साेडले तर इतर काेणाचीही हिम्मत हाेत नाही. पायऱ्यांना भेगा पडल्या आहे. बुरूज ढासळत असून दखल न घेतल्यास चार ते सहा महिन्यांत दिवाणघाट इतिहास जमा झाल्याशिवाय होईल.

तीन घाटांचा समूह दिवाणघाट

दाेन जवळजवळ व एक त्याच रांगेत बाजूला रांगेत असे तीन घाट मिळून बांधलेला समूह म्हणजे दिवाणघाट हाेय. भाेसले राजवटीत एक दिवाण नावाचे दानशूर व्यक्ती पवनी येथे राहत हाेते. त्यांना वैनगंगा नदीचा परिसर आवडला. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने घाट बांधला. ३५० वर्षे उलटून गेले तरी दिवाणघाट म्हणून त्याची ओळख आहे.

घाट पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न शून्य

पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता वैनगंगा नदीवरील घाटांमध्ये आहे. परंतु घाटाच्या पुनर्निर्मितीसाठी काेणतेही प्रयत्न झाले नाही. ना नगर परिषदेने जबाबदारी घेतली, ना पुरातत्त्व विभागाने. या घाटांची पुनर्निर्मिती झाली तर पर्यटनासाठी माेठी संधी आहे. पर्यटनाचा विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल आणि राेजगाराची संधीही निर्माण हाेईल.

टॅग्स :Socialसामाजिक