शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

साडेतीनशे वर्षांचा दिवाणघाट इतिहासजमा हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 15:32 IST

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे, परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत.

ठळक मुद्देपवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

अशाेक पारधी

भंडारा : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी येथील वैनगंगेच्या तिरावर विविध घाट आहेत. यापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला हाेता. मात्र, आता हा घाट अखेरच्या घटका माेजत असून आजपर्यंत कधीही या घाटाची डागडुजीच करण्यात आली नाही.

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. पानखिडकी, ताराबाई, वैजेश्वर या घाटांसाेबतच दिवानघाट प्रसिद्ध आहे. साधारणत: तीनशे पन्नास वर्षांपूर्वी हा घाट बांधला. चाैकनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आले. परंतु नदीला आलेल्या महापुराने या घाटाची पूर्णता दुरवस्था झाली आहे.

पाैर्णिमा, हरितालिका, गणेशाेत्सव आदी सणांच्यावेळी दिवाणघाटावर माेठी गर्दी हाेते. परंतु येथील घाटाची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जाताे. घाटाचे बुरूज ढासळलेले असून केवळ एका ठिकाणाहून नदीपर्यंत पाेहोचता येताे. ताे कधी ढासळेल याची शाश्वती नाही. मासेमारी करणारे ढिवर बांधव साेडले तर इतर काेणाचीही हिम्मत हाेत नाही. पायऱ्यांना भेगा पडल्या आहे. बुरूज ढासळत असून दखल न घेतल्यास चार ते सहा महिन्यांत दिवाणघाट इतिहास जमा झाल्याशिवाय होईल.

तीन घाटांचा समूह दिवाणघाट

दाेन जवळजवळ व एक त्याच रांगेत बाजूला रांगेत असे तीन घाट मिळून बांधलेला समूह म्हणजे दिवाणघाट हाेय. भाेसले राजवटीत एक दिवाण नावाचे दानशूर व्यक्ती पवनी येथे राहत हाेते. त्यांना वैनगंगा नदीचा परिसर आवडला. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने घाट बांधला. ३५० वर्षे उलटून गेले तरी दिवाणघाट म्हणून त्याची ओळख आहे.

घाट पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न शून्य

पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता वैनगंगा नदीवरील घाटांमध्ये आहे. परंतु घाटाच्या पुनर्निर्मितीसाठी काेणतेही प्रयत्न झाले नाही. ना नगर परिषदेने जबाबदारी घेतली, ना पुरातत्त्व विभागाने. या घाटांची पुनर्निर्मिती झाली तर पर्यटनासाठी माेठी संधी आहे. पर्यटनाचा विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल आणि राेजगाराची संधीही निर्माण हाेईल.

टॅग्स :Socialसामाजिक