शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

साडेतीनशे वर्षांचा दिवाणघाट इतिहासजमा हाेण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 15:32 IST

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे, परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत.

ठळक मुद्देपवनीचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित

अशाेक पारधी

भंडारा : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवनी येथील वैनगंगेच्या तिरावर विविध घाट आहेत. यापैकी प्रसिद्ध असलेला दिवाणघाट साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला हाेता. मात्र, आता हा घाट अखेरच्या घटका माेजत असून आजपर्यंत कधीही या घाटाची डागडुजीच करण्यात आली नाही.

पवनी ऐतिहासिक आणि पाैराणिक शहर आहे. येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. परंतु येथील ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित आहे. पवनी नगराच्या सभाेवताल इंग्रजांनी यू आकाराच्या मातीच्या भिंतीवर अर्धवट बांधलेला परकाेट तसेच जवाहरगेट आणि वैनगंगा काठावरील घाट आहेत. पानखिडकी, ताराबाई, वैजेश्वर या घाटांसाेबतच दिवानघाट प्रसिद्ध आहे. साधारणत: तीनशे पन्नास वर्षांपूर्वी हा घाट बांधला. चाैकनी आकाराचे दगड व चुना वापरून बांधकाम करण्यात आले. परंतु नदीला आलेल्या महापुराने या घाटाची पूर्णता दुरवस्था झाली आहे.

पाैर्णिमा, हरितालिका, गणेशाेत्सव आदी सणांच्यावेळी दिवाणघाटावर माेठी गर्दी हाेते. परंतु येथील घाटाची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जाताे. घाटाचे बुरूज ढासळलेले असून केवळ एका ठिकाणाहून नदीपर्यंत पाेहोचता येताे. ताे कधी ढासळेल याची शाश्वती नाही. मासेमारी करणारे ढिवर बांधव साेडले तर इतर काेणाचीही हिम्मत हाेत नाही. पायऱ्यांना भेगा पडल्या आहे. बुरूज ढासळत असून दखल न घेतल्यास चार ते सहा महिन्यांत दिवाणघाट इतिहास जमा झाल्याशिवाय होईल.

तीन घाटांचा समूह दिवाणघाट

दाेन जवळजवळ व एक त्याच रांगेत बाजूला रांगेत असे तीन घाट मिळून बांधलेला समूह म्हणजे दिवाणघाट हाेय. भाेसले राजवटीत एक दिवाण नावाचे दानशूर व्यक्ती पवनी येथे राहत हाेते. त्यांना वैनगंगा नदीचा परिसर आवडला. त्यामुळे त्यांनी स्वखर्चाने घाट बांधला. ३५० वर्षे उलटून गेले तरी दिवाणघाट म्हणून त्याची ओळख आहे.

घाट पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न शून्य

पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता वैनगंगा नदीवरील घाटांमध्ये आहे. परंतु घाटाच्या पुनर्निर्मितीसाठी काेणतेही प्रयत्न झाले नाही. ना नगर परिषदेने जबाबदारी घेतली, ना पुरातत्त्व विभागाने. या घाटांची पुनर्निर्मिती झाली तर पर्यटनासाठी माेठी संधी आहे. पर्यटनाचा विकास झाल्यास गावातील आर्थिक उलाढाल वाढेल आणि राेजगाराची संधीही निर्माण हाेईल.

टॅग्स :Socialसामाजिक