शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

पवनीतील ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 00:58 IST

विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पवनी नगरातील प्राचिन आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे असे पुरातत्त्व विभाग,

पर्यटन विकास कसा होणार : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, गतवैभवाची प्रतीक्षा अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्क पवनी : विदर्भाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पवनी नगरातील प्राचिन आणि ऐतिहासिक वास्तूचे जतन व्हावे असे पुरातत्त्व विभाग, लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन यापैकी कोणालाही वाहत नाही. ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित असल्याने त्यांची पडझड होत आहे. त्यामुळे पवनीतील पर्यटन विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नगराला इंग्रजी यु आकाराचे भिंतीचे बंदिस्त केलेले असल्याने पवनीचा खरा चेहरा बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवासी नागरिकांना दिसत नाही. त्यामुळे नगराचा विकास खुंटलेला आहे, असे नागरिकांना वाटते. नगरात शेकडोच्या संख्येने मंदिर आहेत. त्यापैकी विदर्भातील अष्टविनायक पंचमुखी गणेश मंदिर, वैजेश्वर मंदिर, मुरलीधराचे मंदिर दत्त मंदिर, धरणीधर गणेश मंदिर, रांझीचा गणेश मंदिर, चंडिका माता मंदिर, जगन्नाथ मंदिर, दुर्गा माता मंदिर, कालका व ज्वाला माता मंदिर, भंगार माता मंदिर, एकविरा माता मंदिर, धोबी तलाव माता मंदिर, मस्तान शाँ दर्गा, निलकंठेश्वराचे मंदिर असे कित्येक मंदिर प्रसिद्ध आहेत. गरूड खांब लक्ष वेधून घेतात. जवाहर गेट व ऐतिहासिक परकोट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. भारतीय पुरातत्व विभागाने उत्खननात शोधलेले जगन्नाथ मंदिर परिसरातील भव्य बौद्ध स्तुपांचे अवशेष या सर्वांसोबत वैनगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले ऐतिहासिक घाट पर्यटकांना आकर्षित करतात. भंडारा-गांदिया, गडचिरोली मार्गाने पुलावरून येणारा प्रत्येक प्रवासी दिवानघाटाकडे पाहिल्याशिवाय पवनी नगरात प्रवेश करीत नाही. वैनगंगा नदीतटावर दिवाणघाट, वैजेश्वर घाट पानखिडकी घाट, तराबाई घाट या घाटांचे बांधकाम भोसल्यांचे राजवटीत करण्यात आल्याचे सांगितल्या जाते. तेव्हापासून आतापर्यंत दिवाण घाट स्रानासाठी व कपडे धुन्यासाठी वापरल्या जात होता परंतु घाटाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. घाटावर बांधण्यात आलेले बुरूज व दरवाजे खचून ढासळू लागले आहेत. पालिकेने घाट धोकाायक असल्याचे जाहिर केले आहे. मात्र घाटावर लोकांची ये-जा सुरू आहे. कित्येक दशकानंतर भंडारा विधानसभा क्षेत्राला पवनीमधून अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांना प्रतिनिधीत्व मिळाले. पर्यटन विकासाला चालना मिळून पवनीचा विकास होईल असा विश्वास पवनीकरांना वाटत होता परंतू पडझड होत असलेल्या ऐतिहासिक वास्तूसाठी अडीच तीन वर्षात राज्य शासनाकडून निधी मिळू शकला नाही. पालिका प्रशासन अद्यापही सिमेंट काँक्रीट रस्ते व नाल्या यात गुंतलेला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जतनासाठी अद्यापही योजना तयार करण्यात आलेली नाही. असेच धोरण राहिले तर ऐतिहासीक वास्तू नामशेष होईल व पवनीचा पर्यटन विकास खुंटेल, असे मानने वावगे ठरणार नाही.